मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
बाबरी उध्वस्त करण्यासाठी उमा भारती, शंकरसिंह वाघेला, कल्याणसिंह वातावरण करण्यासाठी सर्वा पुढे होते 6 डिंसेबर रोजी बाबरी उध्वस्त केली. त्याच्या 10 दिवसा अगोदर मंडल गोठवण्या साठी ब्राह्मणाने कोर्टात तजवीज केली. मंडलला गाडण्याचे व कमंडलच चांगभले करणयासाठी आग डोंब उसळला. 1948 ला महात्मा गांधींना गोळ्या मारल्या नंतर त्यावेळी सातारा जिल्ह्यात ब्राह्मणांची घरे जाळली. बरेच देशोधडीस लागले. त्यातील सातारा मधील एक ब्रह्मण गुजराथ मध्ये गेले. त्यांनी चहा विकणार्या नरेंद्र मोदी यांना घडविले. ही घडवणुक इतकी पक्की केली की हिंदू साठी लढणे यातील हिंदू म्हणजे ब्राह्मण्य या ब्राह्मण्याचा सर्व इतिहास तपासला तर हेच समोर येते. यात तयार झालेले मोदी गुजराथ जळत असताना निवांत पहात होते. ज्या हिंदुत्वाने ज्या अतिरेकी धर्म वेड्यांनी लबाडीने फसवून आमचा इतिहास पुसन टाकला, आमची चेतना संपवली ज्यांनी धर्माच्या नावा खाली देवाला निर्माण केले. त्या देवाला देवाळात कोंडून ते सांगतील ते शास्त्र ते सांगतील तो देव ते म्हणतील तसा देव मग आम्ही जन्मा पासुन मेला तरी त्याला कर्म कांडात गुतवून काल्पनिक सुखा साठी जगावे लावले ब्राह्मण्य म्हणजे नेमके हेच ब्राह्मण्य. हे ब्राह्मण्य इ.स. 1200 च्य दरम्यान नष्ट झाले उरली होती आवशेष कारण राजा त्यांनी ठरवायचा त्या राजाने ब्राह्मण्य जपायचे ते जपले नाही तर दुसरा राजा तयार कावयाचा यातुन बहुसंख्येने असलेला ओबीसी पिड्यान पिड्या पिचला गेला. मुसलीम व इंग्रजांच्या काळात ब्राह्मण्याने त्यांच्याशी शेवटी मिळते घेत. राहिलेल्या हिंदुवर हुकूमत ठेवली. स्वातंतत्र्यात जर खरा धोका ब्राह्मण्याला कोणता झाला असेल तर हाच तो असा की राजा ठरविण्याचा अधीकार संपला. देशाचा कारभार हिंदु धर्मशास्त्रा नुसार नवहे तर समतेवर उभ्या असलेल्या संविधानाने चालतो. याच संविधानाने मंडल आला. याच ओबीसी आरक्षणाला नेहरू, पटेल, यांनी विरोध केला होता. याच तरतुदीला संपवण्यासाठी जनसंघाचा भाजपा झाला. या भाजपाने कमंडलने मंडल गाडण्यासाठी मोदी प्रोजेक्ट केले. मोदींना पुढे करताना विकासाचा चेहरा जेवढा त्यांचा होता. त्या पेक्षा त्याचा ओबीसी जन्म महत्वाचा होता. कारण क्षत्रिय जातीत गुंतुन पडलेल्या त्या जाती पासुन त्रासलेल्या समाजांना आपला आधार वाटला हा भ्रमाचा भोपळा आज फुटू लागला. कारण देशात जाट, मराठा, पटेल या जातींनी मंडलला प्रखर विरोध केला. आज हेच समाज दांडगाईने ओबीसीं बनु पहातात. काही मराठा-कुणबी बनलेत आम्हाला आरक्षण द्या जर आम्हाला नसेल तर आम्ही कुणालाच देऊ देणार नाही. ही वातावरण निर्मीती ब्राह्मण्याला हवीच आहे. कारण हा ब्राह्मण्याचा अजंठा त्यांनी कर्धी गुप्त कधी उघड केला आहे. उदयाचा राहिलेला ओबीसी गुलामगीरी गुंतवण्यासाठी मराठा, पटेल, जाट या जाती रस्तयावर कश्या उतरल्या जातील या साठी ब्राह्मण सावध रहाणार आहे. आणि मंडलचे नव्हे तर कमंडलचे पंतप्रधान ही भविष्याची घडण आज सुद्धा आहे. नव्या आत्याचाराला ओबीसी आनंदाने सामोरे जावेत इतकी कपट निती वापरली जात आहे. या साठी डोळस असावे लागेल.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade