जालना, दि.१ : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संताजी जगनाडे महाराज यांचे विचार हे प्रेरणादायी असून, संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. आज समाजाला खऱ्या अर्थाने संत विचारांची गरज आहे असे प्रदिपादन ह.भ.प. योगीराज महाराज यांनी केले. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जालना शहरात कन्हैयानगरात जानेवारी रोजी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी योगीराज महाराज लोखंडे हे म्हणाले की, जगदुरू तुकाराम महाराज यांचे शिष्य संताजी महाराज जगनाडे असून, त्यांनी पंचम वेदाची गाधालेखन केली. यावेळी जालना शहरातील मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade