वाडी : नागपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव श्री संत जगनाडे महाराज बदल करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करून, ते जसेच्या तसे ठेवण्याची मागणी श्री संताजी अखिल तेली सभा संघटनेने वाडी नगर परिषदचे उपमुख्याधिकारी गौरव गाडगे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केली.
या संदर्भात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल बजाईत म्हणाले की, नागपूर येथील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव सरकारनेच श्री संत जगनाडे महाराज सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे ठेवले आहे. नाव बदलण्याबाबत कोणत्याही संघटनेने कोणताही निषेध, आंदोलन, विनंती इत्यादी केलेली दिसून येत नाही. असे असूनही व्यावसायिक प्रशिक्षण शिक्षण कार्यालयाच्या पत्र क्रमांक ६/नियोजन/ ए. पी. संस्था नावात बदल/२०२४/२५/१९३८ / दिनांक १८ मार्च २०२५ द्वारे अलीकडेच जारी केलेल्या परिपत्रकानुसार या नावातील बदलासाठी मते, माहिती, आक्षेप मागवण्यात आले आहेत.
श्री संत जगनाडे महाराज हे तेली समाजासाठी तसेच इतरांसाठी एक प्रगतिशील संत मानले जातात. श्री संत जगनाडे महाराजांनी त्या काळातील जातिव्यवस्थेतील कुप्रथा, कर्मकांड इत्यादींबद्दल जागरूकता निर्माण केली आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारे जागरूकता मोहीम सुरू केली. त्यांनी समाजाला शिक्षित आणि जागृत करण्याचे महान कार्य केले. वारकरी संप्रदायाचे संत जगनाडे महाराज यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनकारी कार्याची दखल घेऊन सरकारने शासकीय आयटीआयला त्यांचे नाव दिले. नागपूर जिल्ह्यात तसेच विदर्भात तेली समुदाय मोठ्या संख्येने आहे. सरकारच्या या निर्णयाचे समाजानेही नाव स्वागत केले. मग कोणत्याही प्रकारची मागणी किंवा आंदोलन नसतानाही सरकारी आयटीआयचे बदलण्याचा उद्देश काय ?
महाराष्ट्रातील संतांच्या पुरोगामी विचारसरणीचा आदर करून, नागपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था या सरकारी संस्थेचे नाव श्री संत जगनाडे महाराज असे करण्याची मागणी उपमुख्याधिकारी गौरव गाडगे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या निवेदनाद्वारे करण्यात आली. ही विनंती मुख्यमंत्री कार्यालयाला तातडीने पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी अनिल बजाईत जिल्हाध्यक्ष अनिल दहागणे सह रोशन वैद्य, उमेश साहू अजय ईखार, विजय मालेवार, देवा क्षीरसागर, सचिन लिचडे, अर्जुन जांभुळकर, चेतन वर्तकर, मोतीरामजी शहारे, संजय जीवनकर, देविदास साठवणे, मनोज भुरे, इत्यादी उपस्थित होते.