Sant Santaji Maharaj Jagnade
तैलिक वैश्य समाज सभा सामुहिक विवाह सम्मेलन आयोजी किया गया है । सभी समाज बांधव सादर आमंत्रित है । दिनांक 21 मई 2016 शनिवार, समय प्रातः 7 बजेसे । स्थान श्रमजीवी महाविद्यालय, पेट्रोल पम्प मे पीछे, वैशाली नगर, अजमेर,
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 3) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
देवळी गावात शिक्षण घेता घेता खेळ खेळताना मनात अजुन एक गोष्ट नोंदवली गेली. कबड्डी, खोखो या सारखे खेळ सांघीक आहेत तर कुस्ती हा खेळ मुळात एकट्या पुरता आणी मराठी मातीचा हा मर्दानी खेळ. ते गावातील आखाड्यात रमु लागले जोर बैठका करीता करीता ते तांबड्या मातीत उतरले. या मातीत चितपट कुस्ती करिताना डावपेच लागतात. समोरचा ही तसाच आसतो. तो तसा आसतो म्हणुन त्याच्या डावाला प्रती डाव करणे यातच यश आसत. आगदी एस.एस.सी. परिक्षा उतर्रण होई पर्यंत ते तांबड्या मातीत असत. अजुबाजुच्या कुस्त्यांच्या फडावर ते सामील होत. आपल्या तयारीची चुणूक दाखवत आसत. चंद्रभानजी तडस यांनी आपल्या मुलाचे गुण हेरले.
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 2) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
वर्धा ते यवतमाळ रस्त्यावर देवळी एक छोटे गाव या गावात चंद्रभानजी तडस व कौशल्याबाई या कुंटूंबात त्यांनी जन्म घेतला. घराला घर पण येण्यासाठी पुर्वपार असलेल्या शेतीत राबावे. लहरी पावसाच्या भरवश्यावर जे मिळेल त्यावर घर चालवावे घरातील पेटती चुल विझु नये ही मात्र दोघांची धडपड रोजची आसे. देवळीच्या प्राथमीक शाळेत ते शिकत होते. शाळेला सुट्टी असेल तेंव्हा रामदासजी आई बरोबर शेतात जात. आगदी एप्रिल, मे चे कडकडीत उन्ह ही अंगावर झेलत आसत.
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 1) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
एक तेल्याचे पोर, एक शेतकर्याचे पोर, ते ही विदर्भातले, मध्यप्रदेशात तेंव्हा हा विदर्भ सी.पी.अॅण्ड बेरर म्हणुन समजला गेलेला हा भाग. निसर्गाने झिडकारलेला, शासानाने तडीपार केलेला हा भाग. आचार्य विनोबा भावे, उद्योगपती बजाज, सेवाव्रती सुशील नायर सहकार महर्षी दादासाहेब देशमुख यांची कर्मभुमी या भुमीत 1 एप्रिल 1954 मध्ये खा. रामदासजी तडस यांचा जन्म झाला.
प्रकाश गिधे, म. तेली महासभा, खेड तालुका
विशेषत: सह्याद्रिच्या दर्या, खोर्यात, उजाड माळावर वसलेल्या गावात तेली समाज मुठभर वस्ती. या वस्तीतला तेली पाटला समोर हात बांधुन उभा. गावचा सरपंच दोन शब्द बोलतो ही सुद्धा वार्याची झुळूक आहे. असा अनुभवणारा समाज. आमदार किंवा खासदारांना मते देयची आसतात. त्यांची साधी भेट ही घेता येत नाही. राखीव जागेवरील पद बोगस मराठा कुणब्यांनी पळवले आहे. आशा खचलेल्या, पिचलेल्या, कोंडीत पकडलेल्या तेली बांधवांना खासदार तडस साहेबांच्या रूपाने एक संजीवनी मिळाली आहे. कारण आहेरे समजल्या जणार्या जातीतच आमदार, खासदार असतात ही आमची रोजच्या जगण्यातील वास्तवता त्यांनी संपवली आहे. लोकसंख्येने 12 टक्के असलेला हा समाज ही सत्तेचा शिल्पकार होऊ शकतो हे सिद्ध झाले आहे.