Sant Santaji Maharaj Jagnade
नागपुर - प्रत्येक जातीत साडेबारा उपशाखा असतात. जातीभेद आणि त्यानंतर शाखांमधील भेदांनी समाज अधिक विखुरतो. संत जगनाडे महाराजांनी जातीप्रथेचाच निषेध नोंदविला होता. किमान जातीमधील उपशाखांमध्ये संघर्ष नसावा म्हणून समता परिषद कार्य करते.
छोटा नागपुरिया तेली उत्थान समाज केंद्रीय समिति ने पदयात्रा के जरिए लोगों को हक अधिकार के लिए जागरुक करने का संकल्प लिया है । तेली समाज के लोगों तक इस पदयात्रा के जरिए समाज के मुख्य संरक्षक
प्रामुख्याने तेली समाज मोठय़ा प्रमाणात पूर्व नागपुरात आहे. पण बदलत्या काळात अनेक तेली बांधव पश्चिम नागपुरात स्थायिक झाले. विखुरले गेल्यामुळे त्यांचा समाजाशी असणारा संबंध-संपर्क कमी झाला. समाज एकसंघ राहावा, या हेतूने ही संघटना शंकरराव भुते यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली.
लोकांच्या घर बांधण्याचा प्रश्न सुटावा म्हणून ही संस्था कार्य करते. स्वत:चे घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण जागा मिळविण्यापासून घर बांधेपर्यंंत मोठे सोपस्कार असतात. त्यात अर्थसहाय्य असल्याशिवाय काहीच करता येत नाही. घरासाठी अर्थसहाय्य करणे, भूखंड योग्य किमतीत उपलब्ध करून तेथे नागरी सोई निर्माण करण्याचे कार्य संस्थेने केले आहे.
नागपुर सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे. विवाहात प्रचंड खर्च होतो, त्यामुळे पालक हवालदिल होतात. अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांची आयुष्यभराची पुंजी मुलांच्या विवाहात संपून जाते. यावर तोडगा काढण्यासाठी संताजींच्या विचारांनी प्रेरित होऊन सामूहिक विवाहाची संकल्पना जवाहर विद्यार्थी गृहाच्या साह्याने तयार करण्यात आली.