Sant Santaji Maharaj Jagnade
समाजाचे एक जेष्ठ विचारवंत व विदर्भ तेली समाज संघर्ष समितीचे प्रमुख श्री. मधुकर वाघमारे मला नागपुर भेटीत म्हणाले होते. संत संताजीचे संदर्भ फार कमी ठेवलेत फार मोठी अडचन मांडणी करताना होते. आणी मी ते अव्हान स्विकारले तेंव्हा त्या बाबत वाचन व चिंतन करू लागलो. तेंव्हा संत संताजी विषयी शोध घेतला बरेच रस्ते सापडले. त्या रस्त्यावर एक महान पुरूष समोर आला. तेल्याने मावळत बाजुला रहावे. त्याच्या घाण्याचा आवाज ही येऊ नये. तेल्याने मंदरातील देवाला तेल द्यावे त्या तेलाने स्वत: जळुन देवाचा अंधार नष्ट करावा.
संत तुकाराम श्रिमंत घरात जन्मले होते. दुष्काळ हा पैसे कमविणयाची महान संधी आसते. त्या संधीचे सोने करण्यापेक्षा त्यांनी आपली धान्याची कोठारे दुष्काळ ग्रस्तांना दिली. याही पुढे जाऊन तुकोबांनी नक्की काय करावयाचे याचे चिंतन करून आपल्या वाट्याला येणार्या सावकारी कागदपत्रे नदीत फेकुन कर्जदारांना कर्ज मुक्त केले. या दोन गोष्टी तुकोबा व संताजी एक होण्यास कारणीभुत ठरल्या आहेत.
होता संतु म्हणुन वाचला तुका, तुकोबांच्या चौदा टाळकर्या पैकी एक टाळकरी संत संताजी संत तुकोबा गाथा पालन कर्ते म्हणजे संत संताजी. मी सुद्धा वरिल समजत होतो. पण संत संताजी सर्व दिशांनी जेंव्हा समजुन घेऊ लागलो तेंव्हा मला संत संताजी वरिल पद्धतीने मांडणे हेच मुळात त्यांच्यावर फार मोठा अन्याय करण्या सारखे आहे. हे माझेच मला समजुन आले. संत संताजी पुर्ण समजले नाहीत पण जे समजले संभाळले व वाटले सुद्धा. त्या शब्दांच्या शस्त्राने पुढे शेकडो वर्ष माणसाला जगता येऊ लागले. पण ही संत संताजींनी संभाळलेली शस्त्रे आज आपणच त्यांना दुर लोटत आहोत. तेंव्हा पुन्हा एक वेळ संत संताजी समजुन घेऊ.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
संताजी स्मृती :- धुळ्याचे तापीराम चौधरी यांनी सुमारे 10 वर्ष मासिक चालविले. त्यांच्या निंधनानंतर मुलगा अमोल ने ते काही काळ चालविले. सध्या प्रकाशन बंद आहे.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
हरीभाऊ डोळसेंचा संताजी सेवा :- नगर म्हटले की हरीभाऊ डोळसे इतके समीकरण रुढ झाले आहे. त्यांनी काही काळ संताजी सेवा मासिक चालविले सध्याते बंद आहे. ते पुन्हा सुरू व्हावे ही अपेक्षा नगरकरच नव्हे तर सर्व समाज बांधव बाळगून आहेत.