लाकडी घाण्याचे आरोग्यदायी तेल !
आपल्याला होणारे बहुतांश आजार, हे शरिरातील त्रिदोषांच्या असमतोलामुळे होतात. आहाराचे संतुलन बिघडण्यात रिफाईंड तेल बर्याचदा कारणीभूत ठरते. रिफाईंड तेल निर्माण करण्यासाठी ‘गॅसोलिन’, ‘सिंथेटिक’, ‘अॅन्टिऑक्सिडंट’, आदी प्रकारची रसायने उपयोगात आणली जातात. ‘रिफाईंड’ तेलाचा अजिबात वास येत नाही; कारण त्यात एकही प्रकारचे जीवनसत्त्व शेष रहात नाही. त्यातील चिकटपणाही नाहीसा झालेला असतो; कारण त्यातील ‘फॅटी अॅसिड’ आधीच बाहेर काढले जाते, तसेच या तेलात ‘व्हिटॅमिन ई’ आणि ‘मिनरल्स’ही नसतात. ‘रिफाईंड’ तेल हे मानवी शरिरास अत्यंत हानीकारक असते. तसेच त्यात मानवी शरिराला घातक घटक असतात. ‘रिफाईंड’ तेलामुळे मानवी शरिरात ‘एल्.डी.एल्.’ नावाचा घातक घटक निर्माण होतो. यामुळे मानवी शरिरामध्ये ‘ब्लॉकेजेस’ निर्माण होऊन हृदयविकारासारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. ‘रिफाईंड’ तेल पहिल्यांदा ३०० आणि दुसर्यांदा ४६४ डिग्री सेल्सियसला उकळवले जाते. त्यामुळे ते अधिकच विषारी बनते.
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा
