संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९८ व्या जयंतीनिमित्त अहमदनगर मनपात महापौर सौ शेंडगे यांच्या हस्ते प्रतिमापूजन
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग गाथा स्व हस्ताक्षराने लिहून अजरामर करणारे तुकाराम महाराजांचे शिष्य संताजी जगनाडे महाराज यांनी आयुष्यभर गुरुप्रती आपली निष्ठा जपली आणि संत तुकोबारायांचे साहित्य त्यांची गाथा आणि अभंगवाणी आजच्या पिढीपर्यंत संताजी जगनाडे महाराज यांच्यामुळेच पोहोचू शकली अशा शब्दात महापौर सौ रोहिणी शेंडगे यांनी जगनाडे महाराज यांच्या कार्याची स्तुती केली. यावेळी शहर प्रमुख संभाजी कदम, विजय काळे, गोकुळ काळे यांची भाषणे झाली. यावेळी सोमनाथ देवकर , विजय काळे, दिलीप साळुंके, गोकुळ काळे, राजू म्हस्के , नितीन फल्ले , मिलिंद क्षीरसागर , बाळासाहेब शिंदे, संतोष मेहेत्रे, बाळकृष्ण दारुणकर, महापौर सौ शेंडगे यांचे स्वीय सहायक शशिकांत देवकर उमेश काळे, मकरंद घोडके दीपक भागवत आदी उपस्थित होते.
