पश्चिम महाराष्ट्रातील तेली समाजाचे नेतृत्व कॉम्रेड रजनीकांत किर्वे
प. महाराष्ट्रातील डाव्या विचारसरणीचे एक लढवय्य नेते होते. समता, स्वातंत्र या विचार सरणीचे बांधव संपत्ती त्यांच्या उंबरठ्यावर आली होती. हुबळी येथील कै. काशिनाथ अंबाजी नांदगीरीकरांचे जावई. त्यांचे कुटुंबही तोलामोलाचे होते. पण या सर्वाकडे पाठ फिरवून, कामगार, शेतमजुर यांचे प्रश्न घेऊन ते रस्त्यावरची लढाई लढत होते. सामान्य माणसाची एक तळपती तलवार म्हणुन ते सर्वा बरोबर नव्हे तर सर्वा समोर. या त्यांच्या कार्यामुळे संयुक्त महाराष्ट्र आंदोलना दरम्यान झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत डाव्या पक्षांनी त्यांना उमेदवारी देऊ केली होती. आगदी फार कमी मतानी यशाने हुलकावणी दिली परंतु नंतर ही त्यांनी समाज सेवा सोडली नाही. कामगार व शेतमजुर ही त्यांच कार्यक्षेत्र ते लढवत राहिले.
