सामाजिक क्रांतीविना वैचारिक क्रांती अशक्य : येरणे
समाज बांधवांनी सामाजिक क्रांती घडवून आणणे ही काळाची गरज आहे. अन्यथा बहुसंख्य असलेला हा समाज मूठभर लोकांच्या पायदळी तुडवला जाईल त्यामुळे समाज बांधवांनी सामाजिक क्रांती घडवून वैचारिक क्रांती घडवून आणावी यातच समाजाचा उद्धार असल्याचे प्रतिपादन साहित्यिक संत वाङमयाचे अभ्यासक संजय येरणे यांनी केले. संताजी स्नेही मंडळ चामोर्शीच्यावतीने संत श्री जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने समाज प्रबोधन व कीर्तन कार्यक्रम बाजार चौक नगरपंचायत चामोर्शी येथे आयोजित केले होते. याप्रसंगी अध्यस्थानावरुन ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त प्रा. रमेश पिसे, कीर्तनकार सप्त खंजिरी वादक बाल समाज प्रबोधनकार भाविका खंडाळकर नागपूर या उपस्थित होत्या.
सत्कार व सन्मान करण्यात आला.
तसेच नवनिर्वाचित नपं उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, नगरसेवक निशांत नैताम, राहुल नेताम, काजल नैताम, आशिष पिपरे, सोनाली पिपरे, स्नेहा सातपुते यांचा सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार व बहुमान करण्यात आला.
