जगनाडे महाराजांनी आणली जगासमोर तुकारामांची गाथा - मोरे महाराजांचे प्रतिपादन
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाआरती
नगर - 'वारकरी संप्रदायाचा 'ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालासी कळस..' जगाच्या कल्याणासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज अभंग व गाथेचा अनमोल व अमृतरुपी ठेवा दिला आहे. या अमृतरुपी अभंग व तुकाराम महाराजांची गाथा तंतोतंत लेखन करून जगासमोर आणण्याचे महान कार्य राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांनी केले आहे, असे प्रतिपादन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज माणिक बुवा महाराज मोरे यांनी केले.
श्रीराम हजारे, नीलेश चिपाडे, देविदास साळुंखे, अशोक जोशी, गणेश पलंगे, बाली जोशी, प्रमोद वाळके, जब्बर शेख, सुरेंद्र सोनवणे, काशीनाथ गाडेकर, सुरेश देवकर, माधवराव ढवळे, अरुण ढवळे, चेतन डोळसे, प्रकाश कोडम, बबनराव मानुरकर, मनोज नागवी, मीरा डोळसे आदी उपस्थित होते.
तुकाराम महाराजांचे दर्शन झाल्याची भावना
हरिभाऊ डोळसे म्हणाले, 'संत तुकाराम महाराजांचे वंशज माणिक बुवा महाराज मोरे यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सदिच्छा भेट दिली. आम्हाला संतपूजनाचे भाग्य लाभले. जगद्गुरु तुकोबाराय व राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराजांचे गुरू-शिष्याचे नाते होते. आज मोरे महाराजांच्या रूपाने संत तुकाराम महाराजांचे दर्शन झाले. '
