वधु - वर फॉर्म

अहमदनगर जिल्हा अत्याचार ग्रस्त जिल्हा म्हणुन शासनाने जाहीर करावा

07 November 2014 Other 14 views
नगर : - मराठावादी असलेले पाचपुते एका रात्रीत ब्राह्मणांच्या कळपात गेले यांनी तेली समाजाची आब्रु वेशीवर टांगली. या जात दांडग्याचे ना खेद ना दु:ख ही तेली समाजाची मानसिकता याच जिल्ह्यात खर्डा, नेवासा, जवखेडे या ठिकाणी आशाच जात दांडग्यांनी दलितांचे शब्दशहा तुकडे तुकडे केले. अशा या जिल्ह्यात ४ ते ५ लाख देऊन अस्तीत्वात नसलेल्या मराठा - कुणबी ही जात प्रमाणपत्र घेऊन जवळ जवळ सर्व जिल्हा परिषद व महानगर पालीकेचे सभासद मराठा झाले. खरा ओबीसी घरात बसला हीच मंडळी १६ टक्के मराठ्यांचे आरक्षण मिळवण्यात आघाडीवर आशा जात दांडग्यांचा हा जिल्हा ही वास्तवी ओळख निर्माण झाली. म्हणुन अहमदनगर जिल्हा अत्याचार ग्रस्त जिल्हा म्हणुन शासनाने जाहीर करावा. असे ओबीसी सेवा संघा तर्फे प्रदिप ढोबळे, ज्ञानेश्वर खराडे, प्रा. दिगंबर लोहार, मोहन देशमाने, रमेश भोज, प्रभाकर देवकर, प्रदिप कर्पे यांनी आपली भुमीका स्पष्ट केली

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar