सारोळा येथे गणेश मंदिर परिसरात तेली युवा संघटनेतर्फे 201 झाडं लावण्यात आली त्यावेळी गणेश मंदिराचे पुजारी राजू महाराज तेली युवा संघटनेचे पदाधिकारी श्री प्रविण वाघलव्हाळे,नितीन मिसाळ,ईश्वर पेंढारे,मंगेश वाघमारे,विशाल नांदरकर,साई चोथे, संतोष सुरळे,नवनाथ राऊत,कृष्णा पेंढारे,किरण पन्हाळे,योगेश चौधरी,योगेश चांदसूर्य ,विनायक सोनवणे,सचिन सोनवणे,योगेश वाडेकर, इत्यादी पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण केले प्रत्येकाने 10 झाडं या प्रमाणे जवळपास 201 झाडं लावले .
तेली समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ जगदगुरू श्री संताजी महाराजांच्या आशीर्वादाने श्री संताजी सेना अकोला जिल्हा महिला आघाडीच्या वतीने तेली समाजातील होतकरू महिलांकरिता शिवण क्लास च्या शुभारंभाचा श्रीगणेश करण्याचे आयोजन केले आहे.
तरी आपण सामाजिक हेतू ने प्रेरित असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहुन आम्हाला उपकृत करावे ही सविनय विनंती.
रेल्वेची लाईनच बंद करावयाची 1/2 कि.मी. रेल्वे रूळांना ग्रीस लावले. आणि ही इंग्रजांची यंत्रणा ही बंद पाडली. इंग्रजी संस्कार देणारी व स्वातंत्र्याला धोका देणारे संस्कार दणारे पी.टी. हायस्कुल तेव्हा होते. एकमध्यरात्री त्या हायस्कुललाच आग लावली. व इंग्रजांची फोडा नीती भस्मसात केली. 1818 साली शनीवारवाड्यात इंग्रजांनी फोडा व झोडा नितीचा वापर करुन युनियन जॅक फडकवला. त्या इंग्रजांच्या कारभाराच्या जागा शासकीय इमारती त्यावर युनियन जॅक फडकत असे. श्री. कर्पे यांनी सोबत्यांना घेऊन युनियन जॅक उतरवुन तिरंगा फडकवीला. याबद्दल अंगावर वळ उमटले तरी मारहाण इंग्रजांनी केली. पण तरी त्यांनी कबुली दिली नाही. आणि बाहेरच्या सोबत्यांची नांवे सागितली नाही. आनंदाने एक वर्ष शिक्षा भोगली.
भिंगार हा नगरचा भाग मोगल काळातही मोगलांचे केंद्र व ब्रिटीश काळातही भिांगर कॅम्प ही इंग्रजांची शक्ती. गावाच्या वेशीजवळ तेलाचे घाणे. घाण्यातले तेल विक्रीसाठी लगेच बाहेर दुकाने. दुकान तरी कसले ढिगा सारखी ठेवलेली पेंड. पातेल्यात तेल संपले इंग्रज अधिकारी येणार पैसे न देता माल नेणार उलट बंदुकीचा धाक. काशिनाथ नामदेव देवकर हा नामदेव देवकरांचा मुलगा. त्या तरूण रक्ताला हे खटकल. गावातील तालमीत येजा त्यात ब्रिटीश विरोधी सुर दिसुन आला. हा जाच आपलाच नाही तर हा जाच या देशाला आहे. आणी तो दुर करण्यास धडपड चालु आहे. ते यात सामिल झाले.
नगरमधील अकोला दुर्गम भाग. अकोला मधील राजुर हे अती दुर्गम. या गावात समाज बर्यापैकी भाऊशेठ पाबळकर हे जागृत बांधव.तेलघानी बारा महिने नसे. इतर वेळी दारातील चार जनवरे डोंगरात घेऊन जावे. दुध मिळे. हे कितीतरी पिढ्या चालले. जुलूमी इंग्रजांनी जंगलेच सरकारी ठरवली. गायरानात बंदी आणली. हा कायदा भंग करण्यास क्रांतीसिंह नाना पाटील यांनी गांधींच्या आदेशावर चरणबिळाशी (सांगली) येथे जंगल सत्याग्रह केला. त्याचे पडसाद येथे ही उमटले. राजूरच्या युवकांनी 1930 मध्ये जंगल सत्याबग्रह करून इंग्रजांच्या कार्याचा भंग केला. त्याबद्दल इंग्रजांनी शिक्षाही दिली. परंतु या जुलूमी राजवटीविरुद्ध जागो जागी बुलेटिन वाटणे, वाचून दाखविणे, आदिवासी लोकांना स्वातंत्र्याचे महत्व सांगणे यात हे आघडीवर होते.