Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

आम्ही कोण म्हणुन काय पुसता .... !!!

मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

    गेली दोन वर्षा पासुन रस्त्यावर नसलेले अंदोलन कुठे तरी धुमसत होते. तेवढ्यात महाराष्ट्र शासनाने पुरंदरेंना महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहिर केला. तो होताच त्याला प्रचंड असा विरोध सुरू झाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधाच्या नाकावर टिचुन महाराष्ट्र भुषण हा पुरस्कार जाहीर केला. इथेच विस्तवाला फुंकर मारली. पुरोगामी विचाराचे चळवळ वाले काही संघटना दाबलया गेल्यात त्यांचा आवाज दडपला गेला हा मुक्त संदेश होता. पण पुरंदरे विषयी एवढा राग का याचे उत्तर मी शोधत होतो त्याच दरम्यान प्रा. अ.ह. साळुंखे यांचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात त्यांनी अभ्यास करून ज्या बाबी पुराव्यानीशी मांडल्या. पुरंदरे यांनी शिवचरित्र्यात संधी मिळेल तेथे मराठा समाजाची अब्रू वेशीवर कशी टांगली. पुरंदरे आपल्या शब्द सामर्थावर पराक्रम मांडताना मराठ्यांना हिन कसे बनवतात हे पुराव्या निशी त्यांनी मांडले. याच वेळी ब्रामहणांचा उद्धात्तीकरण करिताना त्यांनी केलेली धडपड स्पष्ट पणे समोर येते. आशा पुरंदरेंना पुरस्कार ही चिड त्या समाजा समोर येते. परंतु तेली, माळी, नाभीक, महार, लोहार, चांभार, अशा जातीतील मंडळींचा इतिहासच पुसन टाकुन आपल्याला शिवाजीच्या पराक्रमी इतिहासातुन नामशेष केले. याचे साधे सोयर सुतक ही वाटले नाही. आपण कुणाच्या तरी कळपाचे चाकर झालो. ही वास्तवता विसरता येत नाही. म्हणुन ही मांडणी करतो.

दिनांक 22-12-2016 11:46:04 Read more

शनि शिंगणापुरात तेली समाजाच्या तेली कावडीचे भव्य स्वागत

    शिंगणापुर तिळवणतेली समाज व संताजी तरूण मंडळ व समस्त ग्रामस्थ राजुर यांच्या पाच दिवसांच्या राजूहुन शनि शिंगणापूरला निघालेल्या पायी तेल कावड दिंडी प्रवासाच्या दिंडींचे स्वागत सोनई येथे भव्य मिरवणुकीन स्वागत करण्यात आले. तेल कापड पायी यात्रा ही अखंडपणे चालु राहुन तरुणांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रोत्साहन द्यावे व सहभाग घेण्याचे आवाहन शनि-शिंगनापुरचे पो.नि. कैलास देशमाने यांनी केले व पुढील शनी-शिंगणापुर ते राजुर प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

दिनांक 22-12-2016 00:48:05 Read more

हा शौर्याची इतिहास गाडणारे कोण ?

इतिहास घडवीणारा तेली समाज व भवानी मातोचा पलंग  ( भाग 4 ) 

tulja bhavani palang & teli samaj

    माझ्या उमेदीच्या काळात बाळासाहेब पुरंदरे शिवचरित्र एकदा नव्हे तर 3/4 वेळा वाचले. किती स्फुर्ती मिळत होती ती अनुभवली. जेष्ठ चित्रकार दिनानाथ दलाल यांची चित्रे माझा जीव की प्राण होते. गणपती मंडळांना तर मी या रेखा चित्रावरून अनेक देखावे बनवुण दिले. पण जेंव्हा श्री संत संताजी व तेली समाज हा विषय गेली 30 वर्ष पाहू लागलो तेंव्हा कळू लागले. आरे ही तर एक बखर यात नुसता ब्राह्मण गौरव जाता जाता मराठा पराक्रम. पण यात तेली, माळी, सुतार, नाभीक, लोहार, मातंग, महार या जाती मधील बांधवांनी जो पराक्रम केला त्याची जाणीव सर्व पुस्तकात एक अक्षराने नाही. कारण आसे ही असावे बखर कार या समाजाचे नसावेत. दुसरे कारण असे असावे मुद्रण कला अस्तवात आल्यावर इतिहास संशोधन करण्यासाठी अनेकांनी विश्‍वासाने कागद पत्रे दिली ती लगेच नष्ट  झाली का तर इतिहास हा त्यांना सोईचा लिहायचा हेाता. यातुन संत तुकाराम सुटले नाहीत तर इतरांची काय अवस्था असेल हे स्पष्ट होते. तरी सुद्धा आज जे त्यांच्या अतीरेकी कार्यवाहीतून जे शिल्लक आहे त्यावर संशोधन करणे तेवढेच गरजेचे आहे.

दिनांक 22-12-2016 00:09:06 Read more

भवानी मातेचा पलंग हा फक्त पलंगे कुटूंबांचा नव्हे

इतिहास घडवीणारा तेली समाज व भवानी मातोचा पलंग  ( भाग 3 ) 

bhavani mata & teli samaj

    हा पलंग जो आहे त्याचा इतिहास सुद्धा पुसट ठेवला आहे. आणी आम्ही नगर सबजेल चौकातील नगर पलंगे बांधव घेऊन जातत एवढेच समजतो. तो घोडेगाव येथे बनविला जात तोे येथे लाकडाचे कारीव काम करणार्‍या समाजाकडे असे त्यांना ठाकूर किंवा तुलवे म्हणत त्यांना त्याबद्दल दोन घरे वतन म्हणुन आहेत. ही घराणी कालांतराने पुणे येथे स्थालांरीत झाली. घोडेगाव, ता. अंबेगाव, जि. पुणे येथिल तेली समाज बांधव हा पलंग बनवुन घेतात बनवलेला पलंग हा तेली समाज संस्थेत ठेवतात येथे भावीक दर्शन घेतात. घोडेगाव येथिल जेष्ठ व जाणकार बांधव यांच्याकडे चौकशी केली असता समजले 

दिनांक 22-12-2016 00:03:39 Read more

तेली बांधवांनीच जपली भवानी माता.

इतिहास घडवीणारा तेली स माज व भवानी मातोचा पलंग  ( भाग 2 ) 

bhavani mata & teli samaj

    नगर जवळच्या बुर्‍हानगर येथे भवानी मातेचे मंदिर आहे. या मंदिरातून निघालेल्या पालखीत भवानी माता तुळजापूर येथे शिलांगनच्या उल्सवात बसलेली आसते.  हा मान भगत घराण्याला शेकडो वर्ष मिळतआहे. पुराणात नुसती वांगी आसतात अशी एक म्हण आहे. इतिहासाचार्य राजवाडे आपल्या संशोधनात म्हणतात व्यास हा एक अतीबुद्धीमान माणुस होता. त्याने त्या वेळच्या कथा, त्या वेळच्या दंतकथा, त्यावेळच्या लोककथा, या पिढी पासुन त्या पिढीकडे हस्तांतरीत झालेल्या कथा. संग्रहीत केल्या आणी त्यांना आपल्या विचार प्रणाली प्रमाणे, बदलत्या काळा प्रमाणे आकार देऊन लेखन केले. आणी यांच ग्रंथावर उभा देश व्यापला याचा आर्थ एकच व्यासानी त्यातून हवे ते बाजुला सारून आपली हुकमत निर्माण केली.

दिनांक 21-12-2016 23:56:41 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in