Sant Santaji Maharaj Jagnade
रमेश सदाशिव भोज
आपल्या झंझावती शैलीचा ठसा उमटविणारे रामदासजी तडस साहेब होय आम्ही त्यांना साहेबच म्हणतो कारण ते आमचे अगोदरही साहेबच होते आताही आहेत आणि भविष्यात अनंत कालापर्यंत साहेबच रहाणार आहेत. हे अगदी त्रिवार सत्य आहे. कारण पुर्वीनपासुनच त्यांचे आशिर्वाद आमच्या पाठीशाी आहेत. ते आपल्या समाजात जन्मले हे आपल्या समाजाचे भाग्यच म्हणावे लागेल, त्यांचा परिसस्पर्शा समाजाला झाला आणि संपुर्ण तेली समाजाचे भाग्यच उजाळले असे म्हणण्यातकाहीच वावगे ठरणार नाही. स्वत:च्या बुद्धीमत्तेच्या जोरावर सर्वच क्षेत्रात उत्तम प्रकारे कार्य करून अनेक समाज बांधवांना त्यांनी सर्व प्रकारची मदतच केली आहे. त्यांच्यामुळेच आपल्या तेली समाजाचे नाव संपुर्ण देशात सध्यातरी निघत आहे. यांच्यामुळेच आपला समाज नावारूपाला आलेला आहे. त्याचे कारण म्हणजेच साहेबांचे आपल्या समाजावरील प्रेम त्यांचे आशिर्वाद त्यांचे सहकार्य.
देवळी नगरपालीकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार व आज खासदार हा त्यांचा राजकीय प्रवास. सामाजीक प्रवास म्हणजे सलग १५ वर्ष तेली महासभा प्रांतिक अध्यक्ष. ते अध्यक्ष झाले तेंव्हा विदर्भ व मराठवाडा येथेच काम सुरू होते. परंतू त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला कार्यकर्त्यांना व समाजाला विश्वास दिला. आपल्या शाखा, आपल्या पोटशाखा मतभेद, आर्थिक भेद हे बाजुला ठेवू, एक तेली म्हणुन एकत्र येऊ उच्चवर्णीय जे एकत्र येतात. ते याच भुमीकेतुन तसे एकत्र येण्यास जरूर उशीर झाला पण आपण. लवकरच सावध होवू. ही जिद्द उरात ठेवून त्यांनी समाज घडविला. हे सर्वांना मान्य करावे लागेल कार्यकर्ते विश्वास ही त्यांची साठवण आहे.
समस्त तेली समाजास सुचीत करण्यात येते की, झी वाहीनी वर दाखविल्या जाणार्या कन्यादान या मालीकेतील कलाकार किर्तने हे असे म्हणतात की"मी तेली नावांचा अधिकारी जो भ्रष्ट आहे त्याचा हाताखाली मी काम करणार नाही"यामुळे तेली समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा मुंबई, ठाणे विभाग व महाराष्ट्रातील समस्त तेली समाज, झी टीव्ही चॅनल व मालिकाकार यांचा जाहीर निषेध करीत आहोत.
वायगांव (नि.) ता. जि. वर्धा. येथिल नियोजीत श्री. संत संताजी जगनाडे महाराज नियोजीत सभागृह जागेवरिल काटेरी कुंपना व भुमीपुजन हास्ते मा. खा. श्री. रामदासजी तडस, मा. श्री. सुरेशभाऊ वाघमारे , मा. श्री. मिलींदभाऊ भेंडे, मा. श्री. प्रविण काटकर, मा. सौ. ज्योत्स्नाताई मंगरुळकर, मा. श्री. दामोदरराव पाटील, मा. श्री. नमोहरराव घोडखांदे मा. श्री. संभाजी महाकाळकर, मा. श्री. डॉ. प्रदिपजी घोडखांदे, मा. श्री. बाबाराव घोडे, मा. श्री. बाळकृष्णजी मंगरुळकर, मा. सौ. शकुंतलाबाई मंगरुळकर, मा. श्री. केशवराव हिंगे, श्री. नानाजी ढोले श्री. हेमंतभाऊ मंगरुळकर श्री गणेशभाऊ वांदाडे श्री. गणेशभाऊ देवतळे, श्री. गजुभाऊ रेवतकर, व गावातील सर्व समाज बांधव
नाशिक :- २१ व्या शतकातील भारताच्या भवितव्याबद्दलचा दृष्टिकोन मांडतांना माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम व मा. पंतप्रान नरेंद्रजी मोदी यांनी सांगीतले की २०२० ते २०३० मध्ये भारतदेश वयाने २८ वर्षाचा होणार आहे. तर लंडन अमेरीका आर्यलंड व युरोपियन देश ४५ वयाचे होणार आहेत. या क्रातीकारी दशकात सुसंस्कृत उच्च विद्याविभुषीत पिढी भारतात येत आहे. आपल्याला ट्रान्सफर व्हायचे आहे. या क्रांतीमध्ये जायचे आहे. म्हणुननच इंग्रजीवर प्रभुत्व असणारी पिढी घडवायची आहे.