Sant Santaji Maharaj Jagnade
वाकड येथिल समाजबांधव श्री. रामहरी चिलेकर हे एक शेतकरी कुटूंबातील बांधव कै. ज्ञानोबा तुकाराम व मातोश्री सुशीला ज्ञानोबा चिलेकर या आई वडिलांच्या संस्कारात वाढलेल. आपण समाजाचे दे लागते ते आपण दिलेच पाहिजे ही प्रणली रूजलेली याच मुळे ते समाजाच्या विविध उपक्रमा सक्रीय सहभाग घेतात त्यांचे नातलग बंडोपंत शेलार व श्री काळूशेठ शेजवळ यांच्या सानिध्यात सामाजीक निष्ठा प्रबळ झालेली. मला काही तरी करावयाचे आहे ही प्रणाली यांच्याकडे आहे ही बाब श्री संत संताजी पालखी सोहळ्याच्या पदाधीकार्यांच्या नजरेस आली त्यांनी विनंती केली तेंव्हा श्री रामहरी ज्ञानोबा चिलेकर यांनी पंढरपुर येथिल समाज वास्तु सोर सुमारेदिड लाख रूपयांचे बांधकाम वडीलांच्या स्मरणार्थ बांधुन दिले. या साठी श्री. संतोष, श्री. सुनिल व आई यांंनी सहकार्य केले. पालखी सोहळा संस्था या सर्वांचे आभारी आहे.
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 6)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
घरच्या कर्त्या बांधवाला घर चालवायचे आसते. त्याला सर्वांच्या मतांचा विचार करून निर्णयक्षम व्हावे लागत. सगळेच विकृत किंवा संस्कारी नसतात सगळेच कमवतेनसतात. परंतु त्यातुन मार्ग काढावा लागतो हीच बाब समाज संघटनेत लागु आहे. जेंव्हा व्यक्ती निष्ठ संघटना बनते. जेंव्हा ती दरबारी रूबाबत वावरते तेंव्हा तिला समान्यांचे प्रश्न समजतील का हे नक्की नसते. कै. गोपीनाथ मुंडेच्या समाजाचे प्रश्न आ. महादेव जानकर यांचे समाजाचे प्रश्न, आ. विनायक मेटे यांचे समाजाचे प्रश्न त्यांनी सोडविताना सामाजीक प्रश्नांना जवळ केले ? यातुन समाज जोडला दरबारा सारखी पदाधीकारी न बाळगता समाजीक प्रश्नाला जावुन भीडणारे तयार केले. व्यक्तीचे पदाधीकारी न बनता ते समाजीक प्रश्नांचे बनले. खिशात पैसा आहे. चार चाकी गाडी आहे. म्हणुन पदाधीकारी नव्हे तर डोक्यात सामाजीक प्रश्न किती आहेत. हे ओळखुन त्यांनी समाजाचे विघटन न करता संघटन केले ?
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 5)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
चिंतन शिबीराचे फड अनेक ठिकाणी झाले. मिटींगां नेहमीच होतात. त्यात आढावा बैठकांची रेलचेल ही होत आहे. तेंव्हा वीस वर्षींचा एक प्रसंग सांगतो. राजुर, ता. अकोले येथील स्टँडवर मे महिण्यात उतरलो. स्टँडच्या आवारात तेली समाजातील एका स्वातंत्र्य सैनिकाच्या दुकानात गेलो. त्यांनी जवळच असलेल्या ह.भ.प. कवाडे कडे पाठविले. ते वयोवृद्ध बांधव एकच वाक्य बोलले. अरे हा समाज लग्न व लाडू यातुन बाहेर पडु शकणार नाही. हे त्यांचे शब्द 20 वर्षांनंतर ही बाजुला जात नाहीत.
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 4)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
सामाजीक बैठक सोडुन ही संघटना राजकारणाकडे वळली. काळानुरूप बदल झाला ती सुद्धा गरज समजु. काही वर्ष सर्व राजकीय पक्षाचे सर्व विचारंची मंडळी यात हेती. पक्षीय विचारा पेक्षा समाज विचार मोठा होता. पण आज काय झाले आहे. जो पक्ष सत्तेवर आहे त्यांच्याकडे आपले तोंड आहे. ते ही असावे परंतु आपण समाजसाठी काही मागीतले नुसत्या मागण्या करून देण्यासाठी ते खुर्चीत बसले नाहीत या साठी सत्तेतील व विरोधातील मंडळींचा एक दबाव गट करून पदरात काही मिळवले पाहिजे. ही वाटचाल संघटने द्वारे केली का ? यावर चिंतन झाले का ?
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 3)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
नंदूरबारच्या मिटींगमध्ये महाराष्ट्र तैलिक महासभा काँग्रेसच्या दावणीतुन भाजपाच्या पायावर ठेवली हे मी स्पष्ट मांडले आहे. महाराष्ट्रात तेली समाजाची 10 ते 12 टक्के मते आहेत. त्यात विदर्भात हे मतदान 25 ते 40 टक्के मतदार संघातुन आहे. भाजपाने विदर्भात जी आघाडी घेतली त्याला. तेली मतदार महत्वाचा आहे. एक खासदार व 4 आमदार त्या परिसरातुन निवडले गेले. भाजापाच्या पायावर समाज ठेवण्यापुर्वी दबाव गट ठेवला आसता तर संख्या बळ वाढले आसते. लोकसंख्येने अल्प असलेल्या ब्राह्मण समाजाची लोकसंख्या साडेतीन टक्के आहे. त्यांचे 13 आमदार व आज 10 मंत्री आहेत.