Sant Santaji Maharaj Jagnade
अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या विशेष शैक्षणिक सुविधा बंद कराव्यात अशी तरतूद राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरणातील मसुद्यात केली होती. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी या वर टीका केल्यामुळे राज्य शासनाने अनुसूचित जाती व जमाती बाबतच्या तरतुदी त्या मसुद्यातून वगळल्या आहेत.
ओबीसींच्या भरवशावर आपण राज्याचे मुख्यमंत्री झालात याचेही आम्हाला अभिमान वाटत होते. परंतु वर्ष लोटूनही विरोधी पक्षात असताना ज्या ओबीसींसाठी आपण आक्रमकपणा घ्यायचे त्या ओबीसी समाजाच्या एकही विषयाला अद्यापही हात घातला नाही. यावरून आपण ओबीसी समाजाचा वापर मतासाठी तर केला नाही ना असे वाटू लागल्याचा उल्लेख ही पत्रात केला आहे.
पुर्वी ही पालखी हिंगण गाव हुन जात असे पण ती राहुरी येथून जावू लागली. खास पालखी साठी बुर्हानगर येथिल देवीच्या भगता कडुनच पालखीचा दांडा येत असतो. ही तयार करण्याचा मान सुतारांचा आसतो. त्या साठी लागणारे खीळे लोहाराकडूनच येतात. जंगम पालखीला गोंडे लावतात हा मान त्या त्या घरातल्याना दिला जातो. तेली समाज हे सर्व करवुन घेतो. व समाज जागेत पालखी ठेवली जाते.
बुर्हानगरच्या बाळोजी भगतांच्या वंशजांनी बनवलेल्या पालखीतच देवीला स्थापन्न करतात. जानकोजी भगतांची समाधीजेथे आहे तेथे एक दिवस ठेवतात रात्री हाजारो गोंधळी, हजारो भक्त सहभागी होतात. शिंलागणास निघण्यापुर्वी पालखी मंदिराच्या होम कुंडा जवळ असते. देवीस दुधाची भोग केली जाते. देवीला पातळे नेसवली जातात नंतर जानकोजी भगत यांच वशंज स्वत:च्या कमरेस बांधुन आनलेला पेंडभाजीचा नैवद्य देवीला दाखवितात.
बुर्हानगर येथे आज ही त्यांचे वंशज आहेत आजचे वंशज श्री. अर्जुन किसन भगत यांच्याशी चर्चा करित असताना काही एैतिहासीक घटना ही सांगितल्या बाळाजी भगत यांचा पराक्रमा प्रमाणे एक कथा ही प्रचलीत आहे. जानकोजी भगत आपला तेल घाना घेत होते. त्यांना मुल बाळ होत नव्हते. देवीला नवस बोलोवा हा विचार करून त्या रात्री झोपी गेले. गाढ झोपेत असताना एक लहान बालिका दिसली. ती जानकोजीच्या जवळ आली. ते मोठ्याने झोपेत ओरडत होते, ए अबिंके ए जागे होताच स्वप्न बायकोला सांगितले