Sant Santaji Maharaj Jagnade
शिंगणापुर तिळवणतेली समाज व संताजी तरूण मंडळ व समस्त ग्रामस्थ राजुर यांच्या पाच दिवसांच्या राजूहुन शनि शिंगणापूरला निघालेल्या पायी तेल कावड दिंडी प्रवासाच्या दिंडींचे स्वागत सोनई येथे भव्य मिरवणुकीन स्वागत करण्यात आले. तेल कापड पायी यात्रा ही अखंडपणे चालु राहुन तरुणांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रोत्साहन द्यावे व सहभाग घेण्याचे आवाहन शनि-शिंगनापुरचे पो.नि. कैलास देशमाने यांनी केले व पुढील शनी-शिंगणापुर ते राजुर प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
चिंचवड :- चिखली येथिल कै. माधवराव अंबिके हे व्यवसायामुळे जवळच असलेल्या चिंचवड येथे स्थाईक झाले. एक धार्मीक वृत्ती असल्याने ते श्री. संत संताजी पालखी सोहळ्यात सामील झाले. पालखी नुकतीच सुर झाली. मोहन नगर मध्येच पालखी सोहळ्याचे संस्थापक कै. धोंडीबा राऊत व कै. सदाशिवराव पवार रहात होते. यांच्या बरोबर काम करिताना त्यांना समजले पालखी शुन्यातुन सुरवात करावी लागली. पालखी गतीमान करण्यात सहभाग. ही पालखी रजीस्ट्रेशन ही करण्यात आघाडीवर जनमानसातुन नीधी संकलन करण्यास सर्वा बरोबर होते. यातुन पालखीला प्रभावी पणा आला, सुदूंबरे संसथा अध्यक्ष पद हे ह.भ.प.दहितुले बुवा यांना मिळाले.
रमेश भोज, विश्वस्त तेली समाज पुणे मो. नं. 9604767068
लग्न झाल्यानंतर वर्षाच्या आतच दोघा नवरा - बायको यांचे पटत नाही दोघांच्या आवडी निवडी फारच वेगळ्या असल्याकारणाने त्यांचे विचारही साहजीक वेगळेच असणार. त्यामुळे रोजच कटकट, वाद, कामावर येता जाता वाद आगदी किरकोळ कारणावरून भांडण. त्यामुळे दोघेही विचार करतात की पुढे पुर्ण आयुष्यभर वाद घालण्यापेक्षा वेळीच आपण वेगळे झालेलो बर म्हणुन दोघेही एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेण्यास तयार होतात. अशा प्रकारे घटस्फोट घेणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हि संख्या कमी करणे फार गरजेचे होऊन बसले आहे.
दलित व आदिवासींवरील जातीय अन्याय अत्याचार रोखण्यासाठी अॅट्रॉसिटी विरोधी कायदा करण्यात आला आहे. पुर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींच्या व आदिवासींच्या संरक्षणासाठी हा कायदा वापरण्यात येतो. परंतू गावगाड्यातील अस्पृश्य नसलेल्या तेली, न्हावी, धोबी, कुंभार, सुतार, पिंजारा, वडार, मनियार यासारख्या सर्व धर्मातील कनिष्ठ व अल्पसंख्य बलुतेदार-ओबीसी जातींवरही मोठ्या प्रमाणात जातीय अत्याचार होत असतात. म्हणून या जातींच्या संरक्षणासाठी अॅट्रॉसिटी ऍक्ट चा विस्तार करावा, अशी मागणी ओबीसी सेवासंघाचे श्री. मोहन देशमाने यांनी केली आहे.
श्री. भगवान बागूल (पत्रकार), मालेगाव (नाशिक ) मो. 9823340409
समाजजीवनात व राष्ट्रजीवनात काही आदर्श हे एैतिहासिक व आदर्शवत असतात. अनेक पिढ्या त्यापासून प्रेरणा घेतात एवढेच नव्हे तर ते इतिहासाचे साक्षीदार असता. यातील ज्या व्यक्तिंमुळे हा इतिहास घडतो त्या व्यक्ती आदराचा विषय बनतात तेली समाजाच्या उत्कर्षासाठी झटणारी मुंबईची शनेश्वर फाऊंडेशन ही संस्था समाजआदरास विषय बनली आहे. त्या संस्थेच्या व्यक्ति म्हणजे तेल्यांचे बाबा आमटे बनले असे म्हंटले तर वावगे होऊ नये. असे काय आहे. या संस्थेच्या कार्याबाबत ? त्या कार्यापासुन तुम्ही आम्ही काय बोध घेणार ? प्रगतिच्या अनेकं योजने दुर असलेल्या तेली समाजाला अशा संस्थांचे कार्य दिशा देणारे ठरले. अशा अनेक संस्थांच्या उभारणीने प्रगत समाजाच्या समान पातळीवर नेण्यास मदत होईल.