Sant Santaji Maharaj Jagnade
पुण्या परिसरातील पवार पुण्यात व्यवसायाने स्थीर झाले. आपला व्यवसाय संभाळत ते समाज कार्यात उभे राहिले ते दोन वेळा ८२ भवानी पेठे येथिल तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष होते. समाजाच्या कार्या बरोबरच त्यांचे इतर सामाजीक कार्य पुण्याचे वैभव म्हंटले तर योग्य ठरेंल स्वारगेट जवळील रेखीव नगर म्हणुन सुभष नगर म्हणून संबोधले जाते. त्याची उभारणी त्यांनी केली. पुणे सातारा रोड वरील आदर्श सोसायटी राजश्री शाहू सोसायटी ही त्यांचीच धडपड.
आशा बिकट परस्थितीत त्यांनी अध्यक्षपद स्विकारले. धर्मकारण व समाजकारण ही विचाराची बैठक पुर्वजांनी निर्माण करून वाढवलेली तीच पद्धत सुरू ठेवली राजकारण, अर्थकारण व समाजाकरण ही तेली महासभेची बैठक. या दोन्ही समाज संस्थेत समन्व्य साधुन जो सर्वाचा सर्वगटांचा, सर्व पक्षांचा म्हणजे समाजाचा भव्य महामेळावा झाला. तो यांच्याच काळात. स्वागताची, महाप्रसादाची जबाबदारी संस्थेकडे आली. लाखो बांधव एकाच वेळी पुण्यतिथीला येणे हा इतिहास घडवायचा होता.
संताजी फांऊंडेशन पुणे, ही तेली समाजातील एक सामाजिक जाणिव असलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना झाल्या पासून आजपर्यंत या संस्थेमध्ये मी काम करत आहे. संस्थेचे संस्थापक सदस्य श्री. प्रकाशशेठ पवार यांच्या योग्य मार्गदर्शना खाली संस्थेचे कामकाज अतिशय सुरळीत पणे चालु आहे. संताजी फाऊंडेशन ही संस्था कोणत्याही प्रकारच आर्थिक सहाय्य न घेता स्वखर्चांने उच्चशिक्षितांचे वधु-वर मेळावे वर्षातून दोन वेळा आयोजित करते.
सर्वच विश्वस्त आसतात मुळात ही संस्था रजीस्टर नाही व रजीस्टर केली जाणार नाही. पावती नाही पैसे मागने नाही. ही वाटचाल वेगळी व आदर्श युक्त आहे. सदर कार्य काल सातत्याने परिपुर्ण व्हावा या साठी सर्वश्री रोहिदास हाडके, पाडुंरंग चव्हाण, हरिष देशमाने, विष्णू चव्हाण प्रकाश कोकणे, सुरेंद्र राऊत यांचा विशेष सहभाग आसतो.
यासाठी विविध कार्यक्रम राबविले गेलेे. संस्थेसाठी समाज बांधवांनी वाघोली येथे जागा घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते शक्य झाले नाही आणि कार्यकाल थांबू लागले. संस्था मान्यता थांबली म्हणनू पुन्हा सुरूवात केली. सर्वश्री सुभाष काका देशमाने, शिवाजीराव ठोंबरे यांच्या विचार प्रक्रियेतुन नवी संस्था उदयास आली आज श्री. पंडीतराव पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संस्था रजीस्ट्रेशन सुरू आहे.