Sant Santaji Maharaj Jagnade
जिल्ह्यातील सहा तालुके आणि मुळशी तालुक्यातील कासारसई गांवातील समाजबांधव कार्यकर्ते यांचे सहकार्याने कुटुंब परिचय पुस्तिका तयार झालेली आहे.समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. समाजबांधवांचे ऋण व्यक्त करुन यापुढेही समाजसेवेसाठीशनीमहाराजांची व संताजी महाराजांची क्रुपा लाभावी असे विचार मा. श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ पुणे जिल्हाध्यक्ष यांनी प्रास्ताविकातुन मांडले.
तेली समाज वधु -वर मेळावा वधु -वर फाॅर्म
mumbai teli samaj vadhu var melava from 2015
भव्यदिव्य मेळावा संपन्न करण्यास कमाल ७० लाख ते ७ लाख रूपये आज खर्च करावे लागतात. महाराष्ट्र भर साजरे होणारे जे मेळावे आहेत त्या सर्वांचा किमान खर्च हा १० ते १२ कोट रूपयांचा असावा. तो गोळा करण्यास लागणारी मानव शक्ती ही अफाट खर्च होत आसते. परंतु वधु -वर मेळावा ही संकल्पना समाज बांधवांनी न सांगता न ठरविता राबवली असेल तर ती श्री संत संताजींच्या समाधी स्थळी. सुदूंबरे येथे. श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदूंबरे ही संस्था मुळात समजाची मातृृसंस्था.
महाराष्ट्र तेली महासभेने विश्वास दिला म्हणुन उभा राहिलो पदाधिकारी नेमून त्यांना दिशा ही दिली. परंतु समाजात जाताना त्या बांधवांचे अनेक प्रश्न कारण या पुर्वी काहींनी त्यांना अनुभव चांगले दिलेच नव्हते. त्यामुळे ती त्यांची चुक नव्हती . तर त्यांचे सत्य मत बरोबर होते. या मंडळींना कृतीतुन विश्वास दिला. पुस्तक मुद्रित करण्यासाठी गोळा झालेला निधी ज्ञानराज पतसंस्थेत मुदत ठेवीत जमा केला.
सत्यवान शेठ कहाणे हे एक वयाची ७५ वर्षांची वाटचाल पुर्ण करणारे घरातील कै. वसंतराव, श्री. शशीकांत, श्री. मुरलीधर यांना बरोबर घेऊन उद्योगात उभे राहिले. भुसार माल ठोक व करकोळ विक्री करू लागले यातुन ऑईल मिल व इतर व्यवसायात आपला ठसा उमटवला. संघटन, समाज सेवा, त्याग कमावर निष्ठा ही आपली विचार ठेवण निर्माण केलेले बांधव, मंडल आयोगाची राखीव जागा मिळण्याच्या कामा पुर्वी ते खेडगावच्या ग्रामपंचायत सदस्यपदी निवडूण गेले. सामान्य माणसासाठी धडपडणे, त्यांचे प्रश्न सोडवणे त्या साठी प्रसंगी संघर्ष करणे ही प्रणाली वापरली त्यातुन आपला ठसा उमटवला यामुळे खेड तालुक्यातील राजकीय क्षेत्रात आदराचे स्थान निर्माण झाले. या मुळे ओबीसी असुनही राजकीय मडळींना त्यांची नोंद घ्यावी लागली. यातुनच पुणे जिल्हा परिषदेवर स्विकृत सदस्य म्हणुन निवड झाली. खेड व इतर जिल्हा तालुक्यांच्या आर्थिक विकासाची बांधीलकी स्विकारून उभ्या राहिलेल्या राजगुरनगर सहकारी बँकेत ते संचालक म्हणुन निवडून आले या बँके द्वारे गरजुनां व प्रामाणीक खातेदारांना सहकार्याचा केंद्र बिंदु त्यांनी मांडला त्यामुळे ते या बँकेच व्हाईस चेअरमन ही काही वर्ष होते. निष्ठा त्याग व धडपड जवळ असल्याने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या डायरेक्टर बोर्डावर ही ते काम करीत होते.