मदनसिंग चावरे, जिल्हा सरचिटणीस अनुसूचित जातीजमाती भाजपा
राष्ट्रपिता महात्मा गांधी, भुदान यज्ञाचे प्रणेते जगविख्यात आचार्य विनोबाजी भावे, उद्योगपती बजाज, सेवाव्रती डॉ. सुशील नायर आणि सहकार महर्षी स्व. दादाजी देशमुख यांच्या कर्मभुमीत देवळी येथे दि. 1 एप्रिल 1954 रोजी रामदासजी तडस यांचा जन्म झाला. वयाची 62 वर्ष पुर्ण करणार्या या पैलवानाचा आजचा उत्साह एखाद्या तरुणास लाजवेल एवढा आहे. आज रामदासजींचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना समस्त जनतेसोबत माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
पश्चिम महारष्ट्रात समाजाची फार मोठी शोकांतिका आहे. गावाच्या शहराच्या मुख्य प्रवाहा पासुन नेतृत्व व कर्तृत्व बंदिस्त झाले. अशी वस्तुस्थीती असताना ही वाडा, नाने, पौड, राहु या हाताच्या बोटावर मोजले जावे आशा गावावर समाजाचा कायम स्वरूपी पकड आहे. त्या गावचा विकास तेली समाजाच्या घरातुन सुरू होतो. ही वास्तवता आज ही आहे. यातुन नेतृत्वाची मक्तेदारी तुम्ही जर आम्हाला दिली तर आम्ही गावाचा कारभार तुमच्या पेक्षा कणभर श्रेष्ठ करु शकतो.
वर्धा माझे माहेर पण अाता माहेर राहिलेलच नाही आम्ही दोघेच भाऊ बहिण, आई, बाबा, भाऊ, बहिणी सर्वच गेले त्यामुळे माहेरी कुणीच नाही पण माहेर या शब्दात खुप ओलावा प्रेम, सद्भाव, शक्ती सार काही समावलेल आणि हे माहेरपण अनुभवायला मिळालं रामदासजी तडस यांच्याकडे.
महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या प्रदेशात तेली आणि इतर समाजात भरपुर जणान कडे पाटीलकी आहे. या पदाचा आणि जातीचा काही ही संबंध नाही.
बऱ्याच जणांना 'पाटील' या अधिकारपदाची सुरुवात शिवरायांनी केली, असे वाटते. सत्य इतिहास असा नसून 'पाटील' हे पद शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून अस्तित्वात होते. शिवरायांचे पणजोबा बाबाजी भोसले हे वेरूळ गावचे पाटील होते. मुळात 'पाटील' या पदाचा उगम सातवाहन काळात झालेला दिसतो. सातवाहनांच्या काळात सातवाहन राजांनी महसूल वसुलीसाठी 'पट्टखील' हे पद निर्माण केले होते.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 6) - मोहन देशमाने
पुन्हा एक वेळ विठ्ठलाच्या पयरीवरचा समन्वय मी मांडतोय. या एैतिहासिक ठेवा विसरला म्हणुन आपण जाळ्यात अडकलो डॉ. धावडे यांच्या संशोधना नुसार या देशाच्या कर्ती माणसे बौद्ध धर्माची होती. तेली समता व बंधुभाव घेऊन अनेक देशात गेली. ती समता त्यांनी परक्या देशात पेरली व त्यांनी पेरलेली समता सिलोन तिबेट, ब्रह्मदेशात आज ही सतेज रूपाने आहे. शंकराचार्यंच्या काळात समन्वय झाला आणि या समन्वयातुन काही वर्षात आम्ही सांगतो तोच धर्म. आम्ही सांगतो तेच शास्त्र आम्ही सांगतो तोच देव. आम्ही कोण तर आम्ही देवाचे बाप आहोत. ही गुर्मी आपल्या पुर्वजांचे जीवन माती मोल करणारी विकृतीलाच संस्कृती मानत होतो. तीला पायदळी तुडवताना संत नामदेवांनी विठ्ठल निवडला या वेळी विठ्ठल शिव विचाराचा होता.