शहराच्या मुख्य रस्त्यावरून आम्ही कस्तुरे चौकात आलो. दादा भगतांच्या घरातील मंडळींनी दर्शन घेतले. विणेकर्यांना नारळ दिला. दादांच्या वाड्यासमोर पांडुरंगाचे मंदिर, त्या मंदिरात पालखी विराजमान झाली. याच राऊळात पालखी दोन दिवस मुक्काम करणार होती. ही बातमी पुण्यातील सर्व समाजबांधवांना समजली सर्वजण दर्शनास येत होते. या सोहळ्याला यथाशक्ती देणगी देत होते.
मीटिंगच्या ठरलेंल्या विषयावर चर्चा वगैरे होऊन मीटिंग संपणार तोच राऊत उभे राहिले. आपली आहे ती ओळख सांगितली. संताजी महाराज यांची पालखी आपल्या संस्थेद्वारे पंढरपूर येथे जावी. याबाबत कार्यकारिणीने विचार करावा. मग यावर चर्चा सुरू झाली. वारकर्यांची मते होती तशीच कार्यकारीणीची मते होती. सर्वांनी बहुमताने त्यानी मांडलेला ठराव फेटाळला. राऊतांना दु:ख झाले. ही आपली मंडळी, पण हीसुद्धा साथ देण्यास असमर्थ आहेत.
१९४२ सालच्या स्वातंत्र्य लढ्यात महादेव बांदेकर सहभागी झाले होते. या वेळी त्यांना सात महिने करावासही झाला होता. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच पालकमंत्री ना. दिपक केसरकर यांनी बांदेकर यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहुन कुटूंबीयांचे सांत्वन केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार कदम, तलाठी नलावडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
खालील लेखामध्ये तेली गल्लीचे संपादक श्री. मोहन देशमाने यांच्या मागील महिण्याच्या म्हणजे जुलै 2016 च्या अंकातीलकाही भाग व इतर मुद्दे यामध्ये घेतले असुन समाजाने खरे तर याच मुद्यावर चिंतन करणे गरजेचे आहे. हा लेख म्हणजे सध्याची खरी वस्तुस्थिती आहे. समाजाची वाटचाल कोठे व कशी चालली आहे याचे ज्वलंत उदाहरण मोहनराव देशमाने यांनी त्यांच्याच शब्दात प्रखरपणे मांडले आहे. एक प्रकारची समाजजागृतीच त्यांनी आपल्या लेखणीद्वारे केली आहे.
आणि ती पुन्हा थोड्याशा वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि ती सत्य परिस्थिती आहे.
श्री. रामदास धोत्रे, उपाध्यक्ष महाराष्ट्र तेली महासभा
मा. केशारकाकु क्षिरसागर पुण्यात येत तेंव्हा त्यांच्याशी चर्चा करून अनेक प्रश्न सोडवत होतो. समाजा बरोबरचे प्रश्न यांचा मागोवा घेत होतो. मा. जयदत्त क्षिरसागर मा. रामदासजी तडस यांच्या बरोबर मुंबई व इतर ठिकाणी भेटी होत तेंव्हा तेली ताकद व तेली प्रश्न समोर येत आशा वेळी समाजाचा एक न भुतो आसा मेळावा निश्चित झाला. मेळाव्याचे ठिकाण सुदुंबरे हे ठरले अतिरेकी व्यवस्थेच्या विरोधात उभे राहून संत तुकारामांच्या विरोधातील कायदे पायदळी तुडवणारे महान संत संताजी यांच्या समाधी स्थळी सुदूंबरे हे जसे समाधी स्थळ आहे तसेच नजीकच्या देहू याच देहूत संत संताजींनी धन दांडग्या व जात दांडग्यांना तेली ताकद दाखवली. सुदुंबरे येथे महामेळावा निश्चित झाल्या नंतर केशरकांकुचे आशिर्वाद जयदत्त अण्णांचे मार्गदर्शन व तडस साहेबांचे नियोजन हे आम्हा पुणे शहर ग्रामिण बांधवांना आयोजक म्हणुन उपयोगी पडले.