Sant Santaji Maharaj Jagnade
डॉ. अमोल वसंत भांडकर :- पाथर्डीच्या वसंत भांऊचे हे डॉ. अमोल चिरंजीव हे मुळात एम.डी. पदवी मिळवलेले आहेत. विमान नगर परिसरातील दर्जेदार हॉस्पीटल मध्ये ते एक तज्ञ डॉक्टर म्हणुन ओळखले जातात. वडगांव शेरी येथिल पाण्याच्या टाकी जवळील सुंदराबाई हायस्कुल समोर स्वत:चा सुसज्य दवाखाना आहे. स्वत: स्किन स्पेशालीस्ट आहेत. नैसर्गीक केसा सारखे ते केस रोपन ही करतात कै. बबनराव भांडकर व श्री. वसंत भांडकर यांची समाजसेवेची एैतिहासिक परपंरा ही चालवत आहेत. पुण्या सारख्या शहरात स्क्रीन स्पेशालीस्ट कमी आहेत यात यांचा पहिल्या पाच मध्ये नंबर लागतो.
श्री. जगन्नाथ चंद्रभान लुटे यांचा जन्म श्रावण शुद्ध पंचमी शके दि. 25/08/1933 रोजी येवला , जि. नाशिक येथे झाला. त्यांचे मुळ गाव वावी, ता. सिन्नर, जि. नाशिक हे असून, त्यांचे बालवाडी चे शिक्षण आळंदी येथे झाले. त्यानंतर त्यांनी वावी येथे शेतकरी शाळेमध्ये चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे चौथीनंतरचे शिक्षण तेली संताजी बोर्डींग नाशिक येथे झाले.
1947 साली वडीलांच्या निधनानंतर वावी येथे त्यांच्या काकांनी त्यांना मुळ किराणा व्यवसायामध्ये उतरवले. त्यानंतर 1949 साली त्यांच्या काकांचे ही निधन झाले. अर्थात त्या नंतर सर्व कुुटुंबाची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. त्या दरम्यान त्यांचा मुळ व्यवसाय असलेल्या किराणा दुकानावर इन्कमटॅक्स व सेलटॉक्सच्या केसेस दाखल झाल्या. त्या कारणावरून त्यांना आपले दुकान बंद करावे लागले.
आठवडे बाजाराचे रूपांतर केले दिवटेंनी मॉल संस्कृतीत
पिड्यान पिड्या जोपासलेला तेल घाना घानवडीतुन उपसुन बाहेर ठेवण्याची वेळ आली तेव्हां समाजबांधवांनी पर्याय शोधले. यातील एक पर्याय म्हणजे भुसार मालाची ठोक खरेदी विक्री, गावात शहरात किराणा दुकान, अल्प भांडवलावर परिसरातील आठवडे बाजारात पाल ठोकुण किराणा माल विक्री. या आठवडे बाजारातुन अनेकांनी नंतर झेप जरूर घेतली आहे. परंतु आठवडे बाजार करता करता मॉल संस्कृतीला आपले करून त्या व्यवसायात मांड ठेवून वावरणारे कोणच मला भेटले नाही. हि सत्य बाब जवळ असताना या माझ्या सत्याला मान्य करता येणार नाही अशी वाटचाल संगमनेर येथील दिवटे परिवाराने करून दिली. त्यांच्या या वाटचालीचा मागोवा.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 4)
फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात एका बांधवांची भेट झाली आगदी त्यांनी दमबाज भाषेत सांगितले. बरे लिहा टिका लिहु नका. जर आसे घडलेच तर ते कुठे अडकवतील व कुठे संपवतील हे सांगता येणार नाही. दहशदवाद जो म्हणतो, दादागीरी जी म्हणतो ती हिच. तेली गल्ली मासिकाच्या सप्टेंबर 2013 च्या अंकात मी मांडले होते. (पवार व चव्हाण या नेत्याबाबत) असल्या दादागीरीचा पुरता तळपाट होतो. मराठा समाजाच्या दादागीरीचा शेवट काय झाला हे आपण पाहिलेत. मग समाज घडवायला निघलोत जाहिर सभेतगर्जना आपण करतो. तेली हा एक आहे हे पटवतो. काळानरुप वागा भेद गाडा म्हणातो पण प्रत्यक्ष काय ? कोयना नगर येथे जो तिळवणचे बोळवण करा सांगितले. पनवेल येथे कुत्र्याची उपमा दिली गेली. कल्याण येथे किडा मुंग्यांची उपमा दिली. ही व्यक्तव्य करणार्या पदाधीकारी बांधवांची भुमीका रास्त आहे ?
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 3)
मी सुरूवातीलाच मांडले मत असावीत या मतातुन संघटना उभी रहाते. सन 2010 पुर्वी जे मोजके शिलेदार खा. तडस साहेबाकडे होते त्यांना केशरकाकुंचे मार्गदर्शन होते. त्यांच्या विचाराचा प्रभाव होता तडस साहेबांची संघटन प्रणाली होती. पुण्या सारख्या परिसरात शेकडो जन यात झोकुन देऊन उभे होते. त्यांचे नेतृत्व आकाराला येऊ लागले होते. पण पुढील वाटचालीत यातील बरीच वयोवृद्ध झाले काहींना निर्णय प्रक्रिये पासुन दुर ठेवले. काहींना घरचा रस्ता दाखवला गेला. याच ठिकाणी नाराजीची लागन मुळ धरू लागली.