राजश्री भगत, अध्यक्षा अखील भारतीय म. प्र. व अल्पबचत महासंघ
तुका आभाळा ऐवढा वर्धा जिल्ह्यासारख्या छोट्या जिल्ह्यातुन आमच्या समाजाचा माणुस दिल्लीच्या तख्तावर खासदार म्हणुन विराजमान झाल्याचा संपुर्ण समाजाला अभिमान आहे. त्याच्या उज्वल भवितव्यसाठी व दिर्घायुष्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करते. व अखिल भारतीय महिला प्रधान व अल्पगचत प्रतिनिधी महासंघाची अध्यक्षा या नात्याने संपुर्ण प्रतिनिधी महासंघाची अध्यक्षा या नात्याने संपुर्ण भारतातील ५ लक्ष अल्पबचत एजंटातर्फे त्यांचं अभिष्ठ चिंतन करते.
प्रकाश लोखंडे, अ. नगर
या वेळी देश पातळीवरील तैलिक महासभेची सह विचार सभा सुरू झाली या सभेला महाराष्ट्रा सह देश पातळीवरील समाज बांधव प्रथमच नगर येथे आले होते. सभेची सुरूवात झाल्या नंतर देश पातळीवर अध्यक्षांची निवड सुरू झाली. या वेळी सर्वानुमते कै. केशर काकुची निवड अध्यक्षा म्हणुन झाली. भोजना नंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांची निवड करावयाची होती. काकू, रायपुरे यांनी माझ्या सह एक दोन जना बरोबर चर्चा केली. असंघटीत समाजाला संघटीत करू शकणारा संघटक वृत्तीचा अध्यक्ष हवा आसे सुजान बांधव आमदार रामदास तडस यांच्या शिवाय कोणच नव्हते. आणि या सह विचार सभेत सर्वा समोर हा विषय ठेवला आसता सभेने एक मताने मा. रादास तडस यांची निवड महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदी केली. या वेळी मा. सौ. प्रिया महिंद्रे, कै. नंदु क्षिरसागर, श्री. अशोक काका व्यवहारे, श्री. अंबादास शिंदे व इतर मान्यवर उपस्थीत होते.
सौ. मंगल जाधव महिला आघाडी महाराष्ट्र
मला आठवतो त्यांचा दोन वर्षापुर्वीचा वाढदिवस त्यांनी त्यांच्या गावी वर्धाजवळ, ठेवला होता त्या निमित्त प्रांतिक महासभेची मिटींग व त्यांच्या गावात सामाजिक कार्यक्रम अयोजित केला होता खुप चोख व्यवस्था केली होती.
मेहनत सचोटी व माणुसकी हे गुण त्यांच्या त्या दिवसभराच्या कार्यक्रमात दिसुन आले ही त्यांची तत्व त्यांच्या यशाच बळ आहे.
समाजाच्या मतावर धनदांडगे व जातदांडगे मोठे होतात ते निवडणूकी नंतर समाज हिताचा निर्णय घेत नाहीत. उलट समाजाला मत भेदात ठेवून गुंतवत ठेवतात ही खरी आपल्या मागासलेपणाची पाळेमुळे. ही नष्ट करण्याचा विडा तडस साहेबांनी उचलला देवळी नगर पालीकेचे नगर सेवक नगराध्यक्ष १२ वर्षे आमदार व आज खासदार ही वाट त्यांनी निर्माण केली. होय मी तेली आहे. आणि मी तेली म्हणुन निवडणुक रिंगणात आहे मी जिंकणार ते तेली म्हणुन मी झटणारा तेली समाजासाठी ही जिद्द त्यांनी निर्माण केली. ही जिद्द त्यांनी आम्हा सर्वांना दिली.
रमेश सदाशिव भोज
आपल्या झंझावती शैलीचा ठसा उमटविणारे रामदासजी तडस साहेब होय आम्ही त्यांना साहेबच म्हणतो कारण ते आमचे अगोदरही साहेबच होते आताही आहेत आणि भविष्यात अनंत कालापर्यंत साहेबच रहाणार आहेत. हे अगदी त्रिवार सत्य आहे. कारण पुर्वीनपासुनच त्यांचे आशिर्वाद आमच्या पाठीशाी आहेत. ते आपल्या समाजात जन्मले हे आपल्या समाजाचे भाग्यच म्हणावे लागेल, त्यांचा परिसस्पर्शा समाजाला झाला आणि संपुर्ण तेली समाजाचे भाग्यच उजाळले असे म्हणण्यातकाहीच वावगे ठरणार नाही. स्वत:च्या बुद्धीमत्तेच्या जोरावर सर्वच क्षेत्रात उत्तम प्रकारे कार्य करून अनेक समाज बांधवांना त्यांनी सर्व प्रकारची मदतच केली आहे. त्यांच्यामुळेच आपल्या तेली समाजाचे नाव संपुर्ण देशात सध्यातरी निघत आहे. यांच्यामुळेच आपला समाज नावारूपाला आलेला आहे. त्याचे कारण म्हणजेच साहेबांचे आपल्या समाजावरील प्रेम त्यांचे आशिर्वाद त्यांचे सहकार्य.