Sant Santaji Maharaj Jagnade
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 6) - मोहन देशमाने
पुन्हा एक वेळ विठ्ठलाच्या पयरीवरचा समन्वय मी मांडतोय. या एैतिहासिक ठेवा विसरला म्हणुन आपण जाळ्यात अडकलो डॉ. धावडे यांच्या संशोधना नुसार या देशाच्या कर्ती माणसे बौद्ध धर्माची होती. तेली समता व बंधुभाव घेऊन अनेक देशात गेली. ती समता त्यांनी परक्या देशात पेरली व त्यांनी पेरलेली समता सिलोन तिबेट, ब्रह्मदेशात आज ही सतेज रूपाने आहे. शंकराचार्यंच्या काळात समन्वय झाला आणि या समन्वयातुन काही वर्षात आम्ही सांगतो तोच धर्म. आम्ही सांगतो तेच शास्त्र आम्ही सांगतो तोच देव. आम्ही कोण तर आम्ही देवाचे बाप आहोत. ही गुर्मी आपल्या पुर्वजांचे जीवन माती मोल करणारी विकृतीलाच संस्कृती मानत होतो. तीला पायदळी तुडवताना संत नामदेवांनी विठ्ठल निवडला या वेळी विठ्ठल शिव विचाराचा होता.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 5) - मोहन देशमाने
डॉ. बाबासाहेब अंबेडकरांनी घटना लिहीली नसती किंवा ती क्षत्रिय किंवा ब्राह्मण समाजात जन्म घेतलेल्याने लिहिली असती तर समता हा संविधानाचा गाभा राहिला नसता हे वास्तव आपण जेंव्हा सात काळजाच्या कप्यात कोरत नाही. तो पर्यंत असेच घडणार काँग्रेस संस्कृती व भाजपा संस्कृती या दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. यात ओबीसी संस्कृतीचे मालक कोण ही खरी भांडणे आहेत. हे आसे नसते तर घटनेत जे दिले होते ते ओबीसींचे आहे. सांगावयास सन 1978 साल का यावे लागले. 45 टक्के हिंदू आहेत. या आपल्या हिंदू बांधवांचा विकास करणारा मंडल आयोगाला मान्यता सोडाच त्याला विरोध करणारी संघ संस्कृती आज पर्यंत जी यंत्रणा राबवत आहे ती 45 टक्के ओबीसींच्या कल्याणाची आहे का ?
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 4) - मोहन देशमाने
तेली गल्ली मासिक व या मासिकाच्या विचार धारेला बंद पाडा. याचे प्रयोग समाज पातळीवर अनेकांनी करून पाहिले. अगदी जहिराती देऊ नका वर्गणीदार होऊ नका. आसाही प्रचार केला तो खाजगीत व जाहिर सभेत ही झाला. तरी सुद्धा समाजाने आमची भुमीका अभिमाने स्विकारली. हे जेवढे सत्य आहे. तेवढे हे ही एक सत्य आहे की आमची समाजाच्या हित व अहित बाबत खंबीर भुमीके मुळे समाजाचे नेतृत्व सावध होत आहे. सुर्य उगवला पाहिजे तो कोणाच्या डालग्यातील कोंबड्याने बांग दिली ही गोष्टच गौण आहे. काँग्रेसने फसवले भाजपाने ओरबडले ही बाब समाजाला सांगण्याची माणसीकता निर्माण होत आहे.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 3) - मोहन देशमाने
आंबेडकर विद्यापीठाचे शिल्पकार, स्त्रि मुक्तीचे शिल्पकार, ओबीसींचे शिल्पकार म्हणुन पवारांना किती ही मोठे केले. त्यांच्या बरोबर परिषदेमधील समता किती ही जवळ गेली तरी. त्यांचे मराठा पण हे कधीच झाकोळले नव्हते. आणी झाकोळले जात नाही. कारण या सर्व त्यांच्या पाऊल वाटा आहेत. मराठा बाणा ही त्यांची द्रुतगती आहे. या बाबत विचार मांडत असताना पवारांच्या मागे धावणारे त्यावेळी महामेळावे भरवत होते. त्यांना पवारा विरोधात साधा ब्र ही सहन होत नव्हता. पण जेंव्हा समाजाचे म्होरके घरात बसले तेंव्हा कुठे यांना जाग आली. जागे झालेली ही मंडळी नवा आधार स्तंभ शोधत होते. आम्ही 12 टक्के आहोत मागुन देत नसाल तर आम्ही हिसकावून घेऊ अशी गर्जना समाज पातळीवर करीत होते. आपली डरकाळी आपलेच समाज बांधव एैकून घेत आहेत याची काळजी घेऊन टाळ्या घेत होते.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 2) - मोहन देशमाने
तेली समाजाच्या आघाडीच्या मासीकात परवा एक लेख वाचला तेंव्हा मला जानेवारी 2014 मधील प्रसंग आठवला. तो प्रसंग घडला तेंव्हाच सांगीतले विचार दडपू नका कारण हे बुमर्यांग तुम्हाला ही दडपुन टाकेल. रहाता जि. नगर येथे श्री संत संताजी पुण्यतीथी होती. जिल्हा पातळी वरील नेते हजर होते. ही घटना घडण्यापुर्वीची समाज अवस्था पाहू विकासाचा महापुरूष म्हणून त्यावेळचे गुजराथचे मुख्यमंंत्री मा. नरेंद्र मोदी भावी पंतप्रधान म्हणून समोर होते. ते जन्माने तेली आहेत. आणी याच वेळी भाजपाने त्या त्या जातीतले नेते निवडून त्या जाती आपल्या पंखा खाली घेण्यास महा रस्ता निर्माण केला होता.