Sant Santaji Maharaj Jagnade
खेड तालुक्यातील चांदूस हे गांव, भाम नदी ओलंडताच ठाकुर पिंपरीचा फाटा, या फाट्या पासूनच डोंगराची सोबत लागते. 4/5 कि.मी. जाताच डोंगर दर्यातला खाच खळग्यांच्या रस्ता. बरेच अंतर चालुन गेल्यावर आड रानात विक्रांत ढाबा व फॅमीली गार्डन रेस्टॉरंट या आडबाजूच्या रस्त्यावर मला श्री. विजय शंकर व्यवहारे भेटले. त्यांच्या सोबत घरी गेलो तेंव्हा एक धक्का बसला. सौ. दगडाबाई शंकर व्यवहारे वय वर्षे 73 होत्या. ओळख होताच सांगीतले मी तळेगावच्या श्री. सहदेव मारूती मखामले यांची मोठी बहिण. मला प्रसंग आठवला सन 1977-78 मध्ये एका साहित्य संम्मेलनाला कविता पाठवली तर सयोजकांनी जिव्हाळ्याचे पत्र पाठवुन निंमत्रण दिले. आणी सहदेव मखामले यांनी प्रथम मला रंगमंचावर उभे केले. माझ्या पुस्तकाला ही प्रस्तावना दिली. तर एका जेष्ठ कवींची या भगीनी त्या जेंव्हा सौ. व्यवहारे म्हणुन चांदूस येथे आल्या तेंव्हा नुसतीच डोंगरे, नुसताच उभा पाऊस. त्या पावसात कशी ही वाढलेली झाडे. व झुडपे श्री. शंकरराव बाळकृष्ण व्यवहारे हे घरचा तेल घाना घेत. तेल पेंड निर्माण करून त्यांची विक्री करी. उशाला बखळ शेतीजमीन तेवढी शेती करित होते. त्यांना 2 मुले व 4 मुली यांचे हे सुखी कुटूंब डोंगर दर्यात वावरत होते.
वधु-वर मेळावे काळाची गरज म्हणुन मेळावे सुरू नव्हते. किंवा आजच्या सारखी वधु-वर मेळाव्या ही गोरख समाज सेवा अस्तीत्वात नव्हती. तेव्हां विस्कळीत समाजात कै. शंकरराव कर्डीले उभे होते. गणेश पेठेत ते घर चालविण्यासाठी धडपडत. बाकीचा सर्व वेळ समाज कार्यालयात जात असत. खुर्चीच्या मागे न लागता तेथे येणार्या वधु-वर पालकांच्या संपर्कात रहात. शहरातील व आजुबाजुच्या समाजाच्या लग्न समारंभात हाजर आसत. त्या ठिकाणी येणार्या बांधवांना ते जवळ करीत आणी वधुवरांची लग्न जमवुन देत. या साठी पदर मोड ही त्यांनी केली.
संत शिरोमणीतुकाराम महााजांच्या अगोदर पासून चालु असलेली पंढरपूरी वारी सर्व भगवतभक्त वारकर्यांना दरवर्षी या आनंद सागरात यथेच्छ आनंदाने भक्ती रसात डुंबायला मिळते. वारीसाठी तो वयाचा विचार न करता त्यात तन मन धन अर्पुण सामिल होतो. चातका प्रमाण तिची वाट पहातो. त्या वारीचा आनंद काही वेगळाच असतो.
हेचि व्हावी माझी आसा ॥
वारी चुको नेदी हरी ॥
संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याबरोबर जाणार्या आमच्या समाज बांधवांना श्री संत संताजी महााजांचीही पालखी सोहळा असावा अशी मनाेेमन तळमळ होती. कै. धोंडीबा राऊत, कै. रत्नाकर दादा भगत, कै. शरद देशमाने, कै. रावसाहेब पन्हाळे व कै. अर्जुनशेठ बरडकर यांच्य निश्चयातुन 1978 साली सोहळा सुरू झााला. पुणे परिसरातील अनेक महाराजांवर श्रद्धा असणार्य भक्त मंडळींनी आप आपल्या परीने पालखी सोहळा वृध्दींगत होण्यासाठी हातभार लावलेला आहे.
सासवडच्या कावडे घराने एक इतिहास जपला. पण तो आज पुसट केला गेला आहे. कारण छ. शिवरायांच्या स्वातंत्र संग्रामात जी मोजकी दलीत, ओबीसी मावळे होते. तेच मुळात दिडशे. या मंडळींचा साईस्कर विसर पडला गेला आणी उरला फक्त मान सन्मान. शिखर सिंगणापूरचा जीर्णीद्धार शिवरायांच्या घराण्याने केला. या ठिकाणाला त्यांनी दैवत मानुन त्याची सेवा ही केली. छ. शिवरायांनी याच योगदानाला प्रतिष्ठा दिली. स्वराज्यरतील पुरंदर गडाच्या पायथ्याला हाजारो वर्ष राहिलेले कावडे हे तेली समाजाचे या समाजाला त्या काळा पासून शिखर शिंगणापूरच्या मंदिरात कावडीतुन पाणी आणुन पिंडीला स्वच्छ मान ही एैतिहासीक परंपरा आजही सुरू आहे. या एैतिहासीक घराण्यात श्री. अशोक दिगांबर कावडे यांचा जन्म झाला.
Teli Samaj Matrimonial From Mumbai
Mumbai Teli Samaj Vadhu Var Melava From 2016
दि. 02/10/2016 रोजी दुपारी 1.00 ते सायं 8.00 वाजेपर्यंत
म्युपिसिपल स्कुल, ना.म.जोशी मार्ग, पोलीस स्टेशन समोर,
डिलाईल रोड, मुंबई - 400011 येथे करण्यात आले आहे.