Sant Santaji Maharaj Jagnade
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग3)
सरडाच रंग बदलतो असे नाही. जेंव्हा जेव्हां मी म्हणजे मीच ही भुमीका राजा व धर्म शास्त्राला येते तेंव्हा तेंव्हा दबलेला पिचलेला समाज पर्यायाकडे नजर ठेऊन आसतो. हा समज पर्याय स्विकारतो हा या देशाचा इतिहास आहे. म्हणुन गौतम बुद्धाने समता, बंधुभाव व स्वातंत्र्य म्हणजे धर्म ही जाणीव करून दिली त्या वेळी बुद्धधर्माचा स्विकार करणारे जेजे कोण होते त्यात प्रथम तेली व नाभीक समाजातील होते. शेकडो वर्ष हा धर्म नांदत होता.
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग2)
गुलामगीरीची झळ संत संताजींनी अनुभवली होती, घाण्याचा किरकिर आवाज येतो म्हणुन मावळतीला वसवले होते. त्या वस्तीत तेलघाना घेताना कपडे तेलकट मळकट होत होते म्हणुन तेली आडवा जाणे व तेत्याचे तोंड अशुभ आहे हे सांगणारे ब्राह्मण शाहीच्या शास्त्राने त्यांना पोळले होते. शुद्र व सर्व स्त्री जात अशुभ आहे हे बिंबवले होते. देवाच्या दारात दिवसरात्र तेवणारा नंदा दिप तेल आहे म्हणुन जरी तेवत असला तरी तो तेल उत्पादक अशुभ ठरवणारे शास्त्र संताजींना अस्वस्थ नक्कीच करीत होते.
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग1)
विषमता, अहिष्णुता, भेदा भेद मंगल म्हणजे पारतंत्र्य , मुठभरानी ढिगभरांवर केलेले राज्य म्हणजे गुलामगिरी, खोटा देव निर्माण करणे, खोटी शास्त्रे निर्माण करणे व देवाचा धाक दाखवुन लुटारू वृत्ती म्हणजे देवाचा हुकूम सांगुन राबवणे म्हणजे ब्राह्मण शाही. या असल्या विकृतपणला खतपाणी न घालने. या असल्या अमानवी पणला आपण होऊन अप्रतिष्ठा देणे म्हणजे श्री. तुकारामांचे अभंग भंग न पावणार्या विचाराला जीवंत तर ठेवलेच उलट भर घालुन उद्या साठी शाबुत ठेवणे म्हणजे श्री. संत संताजी.
येरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपुरद्वारा आयोजित
सामुहिक विवाह सोहळा 2016
रविवार दिं17 एप्रिल 2016 रोजी , वेळ सकाळी 11.00 वा. विवाह स्थळ :- गणेश नगर, महावीर उद्यानचे पटांगण, नागपुर
पुणे :- बरोबर 1994 च्या दरम्यान निर्णय सागर दिनदर्शीकेत तेली जात व स्त्रीया यांच्या विषयी हिन लेखन प्रसिद्ध झाल्या नंतर झोपी गेलेला समाज रस्त्यावर उतरला समाजाने उग्र रूप रस्त्यावर येताच निर्णय सागरच्या मालकाला समाजाने शुद्ध तेलाने आंघोळ घतली. संघर्षाचा पवित्रा समाजाने घेताच शासनात मंत्री असेलेल्या श्री. क्षिरसागर यांनी विधानसभेत हा प्रश्न धसास लावला. यामुळे कोणत्याही समाजाला हिन लेखन व असे लेखन असलेली मनुस्मृती, सहदेव भाडळी व इतर धर्म ग्रंथावर कायद्याने बंदी आणली. परंतु तेली मतावर निवडुन गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तेली समाजासाठी चागले काहीच केल नाही उलट समाजाला हिन लेखणार्या मनुस्मृतीला पुन्हा मुद्रित