श्री. दिलीप फलटणकर
सर्व धर्मातील, पंथातील, जातीतील अठरा पगड लोक वारीत सहभागी होतात. सामाजिक समतेच आणि एकात्मतेच दुसरं उदाहरण नाही. तिथं कोणी लहान नसतो, मोठा नसतो, श्रीमंत नसतो, गरीब नसतो, तो असतो फक्त वारकरी. तो पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं निघालेला असतो. म्हणून पंढरपुरचा पांडुरंग हा खर्या अर्थानं प्रत्येकाला आपला वाटतो. सात, आठलाख लोक एकत्र येऊन श्रद्धेनं, भक्तीनं, एखाद्या देवासाठी जात आहेत. अशी ही जगाच्या पाठीवर एकमेव घटना असावी.
- पोपटराव गवळी, अध्यक्ष प. महाराष्ट्र
परंतु १५ वर्षा पुर्वी महाराष्ट्र तेली महासभा प्रांतिक अध्यक्ष पद मिळाले हे मिळाल्या नंतर या पदाला न्याय देणे हे ठरवून ते महाराष्ट्रात फिरू लागले. प्रवास, निवास जेवण हे स्वत: करत सुदुंबरे व नागपुर येथिल महामेळावे भरवणे हे अवघड धनुष्य खांंद्यावर घेतले. ते घेताना समाज ढवळून काढण्यासाठी त्यांनी जिल्हा तालुका व गावे पिंजुन काढली किमान चार लाख बांधव हजारो मैलावूरन सुदूंबरे येथे घेऊन येण्याचे दिव्य त्यांनी यशस्वी केले. या झुंजीत लाखो रूपये गेल. पण मागे सरले नाहीत. परंतु महामेळाव्याद्वारे महाराष्ट्रातील बड्या राजकरण्यांची झोप उडवली हा अफाट समाज जर असाच जागा होऊन संघटीत झाला तर आपले राजकारण तेल्याच्या वळचनीला जाईल. या वेळी काही हुशार मंडळींनी तेली आडवा तेली हटवा हा अघोषीत अजंठा राबवला. मी तेली आहे. आणि तेली म्हणुनच निवडून येतो हे ठसवणारे रामदासजी तडस यांच्यासाठी मोर्चे बांधणी केली. त्यातुन आमदारकीत अपयश दिले. हे अपयश खिशात ठेवून ते समाज पिंजुन काढत होते. ते करिताना घराला घर पण देणारी जवळची ५० एकर जमीन घरापासुन दुर गेली हे शेवटी समजले पण ते डगमगले नाहीत हीच त्यांची तेली निष्ठा.
श्री. रामदास धोत्रे, उपाध्यक्ष महाराष्ट्र तेली महासभा
मा. केशारकाकु क्षिरसागर पुण्यात येत तेंव्हा त्यांच्याशी चर्चा करून अनेक प्रश्न सोडवत होतो. समाजा बरोबरचे प्रश्न यांचा मागोवा घेत होतो. मा. जयदत्त क्षिरसागर मा. रामदासजी तडस यांच्या बरोबर मुंबई व इतर ठिकाणी भेटी होत तेंव्हा तेली ताकद व तेली प्रश्न समोर येत आशा वेळी समाजाचा एक न भुतो आसा मेळावा निश्चित झाला. मेळाव्याचे ठिकाण सुदुंबरे हे ठरले अतिरेकी व्यवस्थेच्या विरोधात उभे राहून संत तुकारामांच्या विरोधातील कायदे पायदळी तुडवणारे महान संत संताजी यांच्या समाधी स्थळी सुदूंबरे हे जसे समाधी स्थळ आहे तसेच नजीकच्या देहू याच देहूत संत संताजींनी धन दांडग्या व जात दांडग्यांना तेली ताकद दाखवली. सुदुंबरे येथे महामेळावा निश्चित झाल्या नंतर केशरकांकुचे आशिर्वाद जयदत्त अण्णांचे मार्गदर्शन व तडस साहेबांचे नियोजन हे आम्हा पुणे शहर ग्रामिण बांधवांना आयोजक म्हणुन उपयोगी पडले.
श्री. विजय रत्नपारखी, विभागीय अध्यक्ष, प्रांतिक तेली समाज महासभा
राजकारणामध्ये इतर लॉबीमुळे किती सर्ंघष करावा लागतो, ते नेहमी सांगत आसतात. पण त्यांनी या लॉबीशी लढा देऊन आपले कार्य सिद्ध करून दाखविले. समाजासाठी काहीतरी करावे, समाजातील तरूण पिढीला नेहमी संदेश देतात, की तरूणांनो, संघटित व्हा, चांगले शिक्षण घ्या. चांगल्या हुद्यावर नोकरी करा. व्यवसाय करा. कोणीही मागे पडू नये. असे नेहमीच ते मार्गर्दशन करतात समाजासाठी तळमळ असणारे तडस साहेब नेहमी आमच्यासारख्या तरूणांना मार्गदर्शन करत असतात. समाजानेही अशा आपल्या नेत्यांना साथ द्यावी., त्यामुळे समाजाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. तडस साहेब कधीही समाजातील व्यक्तींचा भेदभाव करत नाहीत. सर्वांशी ते अगदी सलोख्याने विचारपूस करून त्यांच्याशी आपले नाते घट्ट करीत आहेत.
राजश्री भगत, अध्यक्षा अखील भारतीय म. प्र. व अल्पबचत महासंघ
तुका आभाळा ऐवढा वर्धा जिल्ह्यासारख्या छोट्या जिल्ह्यातुन आमच्या समाजाचा माणुस दिल्लीच्या तख्तावर खासदार म्हणुन विराजमान झाल्याचा संपुर्ण समाजाला अभिमान आहे. त्याच्या उज्वल भवितव्यसाठी व दिर्घायुष्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करते. व अखिल भारतीय महिला प्रधान व अल्पगचत प्रतिनिधी महासंघाची अध्यक्षा या नात्याने संपुर्ण प्रतिनिधी महासंघाची अध्यक्षा या नात्याने संपुर्ण भारतातील ५ लक्ष अल्पबचत एजंटातर्फे त्यांचं अभिष्ठ चिंतन करते.