प्रकाश लोखंडे, अ. नगर
या वेळी देश पातळीवरील तैलिक महासभेची सह विचार सभा सुरू झाली या सभेला महाराष्ट्रा सह देश पातळीवरील समाज बांधव प्रथमच नगर येथे आले होते. सभेची सुरूवात झाल्या नंतर देश पातळीवर अध्यक्षांची निवड सुरू झाली. या वेळी सर्वानुमते कै. केशर काकुची निवड अध्यक्षा म्हणुन झाली. भोजना नंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांची निवड करावयाची होती. काकू, रायपुरे यांनी माझ्या सह एक दोन जना बरोबर चर्चा केली. असंघटीत समाजाला संघटीत करू शकणारा संघटक वृत्तीचा अध्यक्ष हवा आसे सुजान बांधव आमदार रामदास तडस यांच्या शिवाय कोणच नव्हते. आणि या सह विचार सभेत सर्वा समोर हा विषय ठेवला आसता सभेने एक मताने मा. रादास तडस यांची निवड महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदी केली. या वेळी मा. सौ. प्रिया महिंद्रे, कै. नंदु क्षिरसागर, श्री. अशोक काका व्यवहारे, श्री. अंबादास शिंदे व इतर मान्यवर उपस्थीत होते.
- प्रकाश कर्डीले, मा. अध्यक्ष, तिळवण तेली समाज पुणे.
समाज उभा आसतो संघटनेवर संघटना आसते कार्यकर्त्यांच्या बळावर कार्यकर्ते आसतात नेत्याच्या नेतृत्वावर जर समाज संघटीत हवा असेल तर कार्यकर्ते हवे असतात. या कार्यकर्त्यांना संघटीत करणारा व ठेवणारा नेता तेवढाच खंबीर असावा लागतो. याचा जीवंत अनुभव म्हणजे खासदार रामदासजी तडस साहेब आहेत. अहमदनगर येथे अध्यक्ष पदाची जबाबदारी येताच ते आपल्या पदाला न्याय देऊ लागले.
समाजाच्या मतावर धनदांडगे व जातदांडगे मोठे होतात ते निवडणूकी नंतर समाज हिताचा निर्णय घेत नाहीत. उलट समाजाला मत भेदात ठेवून गुंतवत ठेवतात ही खरी आपल्या मागासलेपणाची पाळेमुळे. ही नष्ट करण्याचा विडा तडस साहेबांनी उचलला देवळी नगर पालीकेचे नगर सेवक नगराध्यक्ष १२ वर्षे आमदार व आज खासदार ही वाट त्यांनी निर्माण केली. होय मी तेली आहे. आणि मी तेली म्हणुन निवडणुक रिंगणात आहे मी जिंकणार ते तेली म्हणुन मी झटणारा तेली समाजासाठी ही जिद्द त्यांनी निर्माण केली. ही जिद्द त्यांनी आम्हा सर्वांना दिली.
-: भगवान मिटकर, सचिव म. तेली महासभा औरंगाबाद विभाग
श्री. संत संताजी तिळवण तेली समाज ट्रस्ट ही संस्था पुर्ण मराठवाठ्याची अस्मीता ही गौरवशाली परंपरा विस्तारीत करावयाची होती. आमचे काही प्रश्न होते या व इतर समाजाच्या प्रश्ना बाबत मुंबई येथे मंत्रालयात जावे प्रश्न ते सोडविण्यास सहकार्य करीत. मराठवाड्यातील अनेक प्रश्न कै. काकु व आ. जयदत्त क्षिरसागर यांच्या बरोबर चर्चा करून मार्गस्थ लावत असत.
शिवाजी क्षिरसागर, अध्यक्ष सेवा आघाडी
माझी सर्व नोकरी पोलिस खात्यात गेलेली अनेक जबाबदार्या पेलताना माणुस वाचता आला, माणुस समजला. माझा समाज तेली, मी एक तेली ही भावना जीवनभर जपलेली. या वाटेवर तेली महासभा भेटली, मा. खासदार तडस साहेब भेटले. रामदासजी हे एक पैलवान पैलवान हे जरा तापट आसतात. पण विदर्भ केसरी असलेले हे बांधव अतिशय शांत स्वभावाचे मला त्यांच्या जवळ वावरता आले व काम ही करता येते हे त्यांचे वैशिष्ठ.