Sant Santaji Maharaj Jagnade
महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ? (भाग 3 ) एप्रिल 2010
तुमचा पक्ष कोणता ? तुमचा नेता कोणता ? या गोष्टीशी आमची बांधीलकी शुन्य कारण तुम्ही सर्व मंडळी तेली म्हणुन जेंव्हा समाज पातळीवर - येता तेंव्हा तेल्यांच्या विकासाच्या गप्पा मारता पण तेल्यांच्या विकासाच्या संधी समोर येतात तेंव्हा तुमच्या पक्ष नेत्या समोर तुम्ही गप्प आसता हे वास्तव तुम्ही किती ही लपवले तर लपत नाही. महिला आरक्षण राज्यसभेत मंजुर झालेच आहे.
महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ? (भाग 2 ) एप्रिल 2010
इतिहासात फक्त समाजमाता काकुच तेल्यांच्या पहिल्या व शेवटच्या खासदार व आमदार महिला होऊन गेल्या. त्या सुद्धा स्वत:च्या बळावर पक्षाच्या किंवा समाजाच्या नव्हे. गेली १०/१२ वर्ष लोकसभा महिलांना आरक्षण असावे असे वातावरण तापु लागले भाजपा हा ब्राह्मणी विचारांना राबवणारा पक्ष नरेंद्र मोदी जन्माने तेली असेल ? कारण या तेली बांधवाने तेल्या साठी काहीच केले नाही.
महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ? (भाग 1 ) एप्रिल 2010
मार्च २०१० च्या अंकात तैलीकच्या पदाधिकारी मंडळीना जरा वास्तवतेचे भान करून दिले. बऱ्याच बांधवांनी फोन, प्रत्यक्ष भेटी तर काहींनी (वास्तवातेचे भान ठेवणाऱ्या कारभाऱ्याच्या बोंगळ्या कारभारा विषयी बरे लिहीले. परंतू तैलिक बरी आहे म्हणुन चुकावर पांघरून घालून कारभाऱ्यांना सावरणाऱ्या काही बांधवांनी जरा अति लिहीले हा सल्ला दिला कारभाऱ्यांचा नाकर्तेपणा समाजाच्या नुकसानीपेक्षा फार मोठा प्रतिष्ठेचा आहे.
बडोदा (गुजरात) येथे सुरू,नवसारी, अंकलेश्वर, भरूच, अहमदाबाद इ. सर्वच समाज बांधव एकत्र आलेले होते. व "वधु-वर परिचय मेळावा" व "गुणवंत विद्याथ्यांचा सत्कार" असा कार्यक्रम होता. या कार्यक्रमास खान्देशातुन अमळनेरचे माजी नगराध्यक्ष सुभाष अण्ण्ण चौधरी, उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, याचे उद्योगपती जीवन चौधरी, नंदुरबारचे प्रविण चौधरी, चौपड्याचे उद्योगपती जीवन चौधरी, नंदुरबारचे प्रविण चौधरी, मढीचे डॉ. जितू चौधरी, मधुकर चौधरी, अनिल पाटील, अहमदाबादचे नारायण चौधरी, इ. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बालमटाकळी - मुर्ती ही दगडाची असो वा कारागिरांनी बनवलेल्या कोणत्याही धातूची असो तिची विधिवत पूजा करून तिची प्राणप्रतिष्ठा केली जावे म्हणजे तिच्यात प्राणवत रूप प्राप्त होते. त्यामुळे सर्वजण तिच्यापुढे मोठ्या भक्तीभावाने माथा टेकतात म्हणजे तिच्यात सजीव चैतन्य असते हे सर्वजण मानतात परंतु आता सामाजिक सर्व स्तरीय पिछेहाट पाहता समाजात प्राण ओतण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी आ. शिवाजीराव चोथे यांनी केले.