Sant Santaji Maharaj Jagnade
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे संताजी युवक मित्रमंडळाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माजी सरपंच नामदेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उपसरपंच शेखर कर्डिले, कैलास व्यवहारे, अरुण केदार, ए. टी. शिंदे, राहुल केदार आदीसह मान्यवर उपस्थित होते.
चांदवड : येथील संताजी मंगल कार्यालयात श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल, प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, कृषी उत्पन बाजार समितीचे उपसभापती नितीन आहेर, चांदवड मचंट बँकेचे अध्यक्ष अॅड. नरेंद्र कासलीवाल,
चंद्रपूर दि. ०८ : सन २०१९ मध्ये राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करणे या कार्यक्रमांतर्गत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवार दि.८ डिसेंबर २०१९ रोजी आपल्या कार्यालयात व आपल्या अतिरिक्त सर्व कार्यालयात साजरी करण्यात यावी असे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. ज. पु. ति. २२१८/ प्र. क्र. १९५//२९ दि.२६ डिसेंबर २०१८ परिपत्र काढण्यात आले आहे.
किन्हीराजा. दि. 8 तेली समाजबांधवाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ८ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,
यावर्षी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती सर्व शासकीय निमशासकिय कार्यालयात इतर महापुरुषाच्या जयंती प्रमाणे ही जयंती सुध्दा साजरी करावी असे आदेश शासनाने प्रथमच सर्व शासकिय तसेच निमशासकिय कार्यालयांना दिले. या आदेशान्वये येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक नालींंदे याचे हस्ते संत जगनाडे व
अधिकारीपदाधिकाऱ्यांची दांडी शासकीय, निमशासकीय कार्यालयातअन्य राष्ट्रसंताप्रमाणे श्री संत जगनाडे महाराजाची जयंती साजरी करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यामुळे श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती कार्यक्रमाला अधिकारी, पदाधिकान्यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते. तरीही किन्हीराजा ग्रामपंचायतीचे अधिकारी, सरपंच, उपसरपंच व काही सदस्यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे तेली समाजबांधवांमधून रोष व्यक्त केल्या जात आहे.