Sant Santaji Maharaj Jagnade
बीड.(प्रतिनिधी) आष्टी .जि.बीड येथील भगवान बाबा महाविद्यालयाची विदयार्थीनी कु.लक्ष्मी भारत शेंदूरकर हिने टारगेट बॉल स्पर्धेत भारतीय टीमचे प्रतिनिधीत्व करीत भुतान येथे झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कसब दाखवत देशाला सुवर्णपदक मिळवत बेस्ट प्लेअर ऑफ द वर्ल्ड हा मान मिळवत आपल्या कर्तृत्वाने जिल्हयाचा देशाचाच नव्हे तर समाजाचाही अटकेपार झेंडा फडकवल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
गोवा-मडगांव (प्रतिनिधी): अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे राज्याचे रा.कॉ.विधीमंडळ उपनेते आ.जयदत्त क्षीरसागर यांची तिसर्यांदा बिनविरोध निवड झाल्याची घोषण मुख्य निवडणुक अधिकारी तथा महासभेचे कार्याध्यक्ष रामलाल गुप्ता यांनी जाहिर केले. राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुक कार्यक्रम विविध राज्यातील सदस्यांचा मागणीवरुन महाराष्ट्राच्या बाहेर गोवा राज्यात मडगांव येथे दि.१७ रोजी घेण्यात आला.
१९४२ सालच्या स्वातंत्र्य लढ्यात महादेव बांदेकर सहभागी झाले होते. या वेळी त्यांना सात महिने करावासही झाला होता. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच पालकमंत्री ना. दिपक केसरकर यांनी बांदेकर यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहुन कुटूंबीयांचे सांत्वन केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार कदम, तलाठी नलावडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत संताजी जगनाडे महाराज या पालख्यांचे स्वागत संताजी ब्रिगेड व जयभवानी टेक्नीकल इंस्टीट्युटच्या वतीने करण्यात आले. येणार्या सर्व वारकरी बंधु आणी भगनींना ४००० बिस्कीट पुड्यांच वाटप करण्यात आले. संस्थेचे पुणे शहर अधयक्ष श्री. संतोषशेठ व्हावळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. पुणे शहरात अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम हि संस्था राबवी असुन गरीब महिलांना मोफत साडी वाटप, मोफत शिलाई मशिन, मुलांचा गुणगौरव, जेष्ठ समाज बांधवांचा सत्कार अरोग्य शिबीर मोफत शालेय साहित्य वाटप चष्मे वाटप असे अनेक प्रकारचे सामाजीक कार्य श्री. संताजी ब्रिगेड पुणे शहर आणि जय भवानी टेक्नीकल इंस्टीट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने राबीवले जातात.
खालील लेखामध्ये तेली गल्लीचे संपादक श्री. मोहन देशमाने यांच्या मागील महिण्याच्या म्हणजे जुलै 2016 च्या अंकातीलकाही भाग व इतर मुद्दे यामध्ये घेतले असुन समाजाने खरे तर याच मुद्यावर चिंतन करणे गरजेचे आहे. हा लेख म्हणजे सध्याची खरी वस्तुस्थिती आहे. समाजाची वाटचाल कोठे व कशी चालली आहे याचे ज्वलंत उदाहरण मोहनराव देशमाने यांनी त्यांच्याच शब्दात प्रखरपणे मांडले आहे. एक प्रकारची समाजजागृतीच त्यांनी आपल्या लेखणीद्वारे केली आहे.
आणि ती पुन्हा थोड्याशा वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि ती सत्य परिस्थिती आहे.