Sant Santaji Maharaj Jagnade
शिरवळ, सातारा - मधील श्री संताजी महाराज तेली महिला बचत गट व श्री संत जगनाडे महाराज तेली महिला बचत गट यांच्या मार्फत शिरवळमध्ये श्री संताजी महाराज पुण्यतिथी सजारी करण्यात आली. यामध्ये समाजातील सर्व महिला व तरुण वर्ग सहभागी झाली होती.
सत्यवान शेठ कहाणे हे एक वयाची ७५ वर्षांची वाटचाल पुर्ण करणारे घरातील कै. वसंतराव, श्री. शशीकांत, श्री. मुरलीधर यांना बरोबर घेऊन उद्योगात उभे राहिले. भुसार माल ठोक व करकोळ विक्री करू लागले यातुन ऑईल मिल व इतर व्यवसायात आपला ठसा उमटवला. संघटन, समाज सेवा, त्याग कमावर निष्ठा ही आपली विचार ठेवण निर्माण केलेले बांधव, मंडल आयोगाची राखीव जागा मिळण्याच्या कामा पुर्वी ते खेडगावच्या ग्रामपंचायत सदस्यपदी निवडूण गेले. सामान्य माणसासाठी धडपडणे, त्यांचे प्रश्न सोडवणे त्या साठी प्रसंगी संघर्ष करणे ही प्रणाली वापरली त्यातुन आपला ठसा उमटवला यामुळे खेड तालुक्यातील राजकीय क्षेत्रात आदराचे स्थान निर्माण झाले. या मुळे ओबीसी असुनही राजकीय मडळींना त्यांची नोंद घ्यावी लागली. यातुनच पुणे जिल्हा परिषदेवर स्विकृत सदस्य म्हणुन निवड झाली. खेड व इतर जिल्हा तालुक्यांच्या आर्थिक विकासाची बांधीलकी स्विकारून उभ्या राहिलेल्या राजगुरनगर सहकारी बँकेत ते संचालक म्हणुन निवडून आले या बँके द्वारे गरजुनां व प्रामाणीक खातेदारांना सहकार्याचा केंद्र बिंदु त्यांनी मांडला त्यामुळे ते या बँकेच व्हाईस चेअरमन ही काही वर्ष होते. निष्ठा त्याग व धडपड जवळ असल्याने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या डायरेक्टर बोर्डावर ही ते काम करीत होते.
साकुरी :- तालुका राहाता जि. अहमदनगर येथे श्री. संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त साकुरी येथे तेली समाज बांधवातर्फे सामुदायीक अभिषेक करण्यात आला. महापुजा करून गावातून सजवलेल्या रथातुन संताजी महाराजांच्या प्रतिमेची ढोलताश्यांच्या गजरात पुढे भजनी मंडळ सर्व भगिनींनी, मुलींनी भजन म्हणत, फुगड्या खेळत भक्तीमय वातावरणात आनंद लुटला यावेळी गावात पालखी रस्त्यात सर्वत्र रांगळ्या घालण्यात आल्या होत्या. व ठिकठिकाणी समाज बांधव श्री. संपतराव लुटे व श्री. कैलास लुटे या समाज बांधवांनी सामुदायीक आरती केली. व त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
समाजातील गोरगरीब जनतेसाठी काम करणारा, त्यांना आपले म्हणुन समाजात काम करणारा समाजसेवक यांची समाजाला गरज आहे. समाजात अनेक संघटना काम करतात परंतु समाजाची गरज ओळखुन कार्य करणे गरजेचे आहे. केवळ प्रसिद्धीसाठी कार्य न करता समाजातील गरजु घटक केंद्र बिंदु माणून कार्य करणे गरजेचे आहे.
पुणे - टिळक कट्टर ब्राह्मण्यवादी होते. ते समतावादी नव्हते. याचे जीवंत उदाहरण म्हणजे त्यांनी अथनी येथील जाहिर सभेत सांगतीले तेल्याना तेल काढायला विधी मंडळात जायचे का कुणब्याना नांगर धरायला ? याच दरम्यान राजर्षी शाहु यांनी उपेक्षीता साठी आरक्षण प्रणाली राबवली. त्याच शाहू महाराजा विरुद्ध टिळकानी संघर्ष केला. त्याच्या पुर्ण जीवन चरित्रात त्यांनी कुठेच तेल्या साठी काही केले असा उल्लेख नाही.