मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
या देशाच्या मुख्य प्रवाहात 85 टक्के मागासवर्ग यावा या साठी केंद्र शासनाने नचिअप्पन रिपोर्ट शासनाला सादर केला. परंतु हा रिपोर्ट सर्व पक्षीय असलेल्या क्षत्रिय व ब्राह्मण जातींनी गुंडाळुन ठेवण्यात देशप्रेम मानले आहे. हा रिपोर्ट काय आहे याची साधी तोंड ओळख सुद्धा देत नाहीत. काँग्रेस प्रणीत व भाजपा शासनाने या विषयी तोंडावर बोट व हाताची घडी ठेवली आहे. कारण हा रिपोर्ट म्हणजे हा खरा लोकशाहीचा गाभा आहे.
मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
मराठा हे आमचे भाऊ आहेत. पण मराठा पण उरात बाळगुन जे अन्याय करतात ते आमचे भाऊ होऊ शकत नाहीत. कारण या मंडळींनी आपल्या भावकीचा विकास होऊ दिला नाही. सत्ता स्वत: भवती राबवली. गावचा सरपंच,पाटील, तेली, तांबोळी, गुरव आशा जातीचा नको या साठी या मंडळींचा प्रखर विरोध नंतर लबाडी सुरू करून या देशाची संवीधान दुर केले आहे. या विषयी जो कोण आवाज उठवेल त्याला साम दाम भेद या मार्गाने संपवणे याचे जिवंत उदाहरण आपण जागो जागी पहातो. याची खरी सुरूवात ब्राह्मण्या पासून सुरू होते मंडलला प्रखर विरोध करून कमंडलला प्रतिष्ठित करून एक मानसिकता निर्माण करणे आपण हिंदू आहोत तसे पाहिले तर 52 टक्के ओबीसी मध्ये 44 टक्के हिंदू ओबीसी आहेत.
मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
आज शालेय शिष्यवृतती एक तर मिळणार कशी नाही या साठी लायक खरा ओबीसी डावलला जातो. त्या नंतर मराठा - कुणबी जातीला प्रथम प्राधान्य कारण संस्था चालक मराठाच त्यांनी ओबीसी कोठा पुर्ण भरताना मराठा - कुणबी प्रमाणपत्र पहिले जवळ ठेवले असते. यातुन प्रवेश व शिष्यवृतती नाही. आणि जरी प्रवेश मिळाला तरी देणग्यांचा भस्मासुर सोडत नसतो.
मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
ओबीसींचा विकास करावा या साठी मंडल आयोगाने 13 शिफारसी सादर केल्या त्यातील ओबीसींचा आर्थीक विकास ही एक बाब मंडलच्या शिफारशी शासनाने स्विकारल्या नंतर मंडल कोर्टत नेहणारे ब्राह्मण्य होते. या ब्राम्हण्याने तो कयदेशीर बाबत संपविण्याचा प्रयत्न केला तरी ओबीसी अर्थीक बाबत विकास ही बाब बचावली केंद्राचा व राज्याचा सहभागातून 4 टक्के दराने कर्ज वाटप. ओबीसींचे पारंपारीक धंदे, ओबीसींच्या कलाकुसरीची परंपरा त्याच्यातील सुशीक्षीतांसाठी उद्योग धंदे यासाठी महामंडळ तयार केले. वाजत गाजत ढोल बडवत भाजपा व सेना शासनाच्या काळात महाराष्ट्रात 18 वर्षा पुर्वी हे महामंडळ स्थापन झाले.
मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
या भाजपाने कमंडलने मंडल गाडण्यासाठी मोदी प्रोजेक्ट केले. मोदींना पुढे करताना विकासाचा चेहरा जेवढा त्यांचा होता. त्या पेक्षा त्याचा ओबीसी जन्म महत्वाचा होता. कारण क्षत्रिय जातीत गुंतुन पडलेल्या त्या जाती पासुन त्रासलेल्या समाजांना आपला आधार वाटला हा भ्रमाचा भोपळा आज फुटू लागला. कारण देशात जाट, मराठा, पटेल या जातींनी मंडलला प्रखर विरोध केला. आज हेच समाज दांडगाईने ओबीसीं बनु पहातात.