या समाजाचा तेल बिया गाळप हा परंपरेचा व्यवसाय. तेल बी खरेदी गाळप उत्पादक माल विक्री. व्यवस्था तशी व्यापारी वृत्तीची या समाजात असे ही काही बांधव होऊन गेल की त्यांनी पिड्यान पिड्या मोठा व्यवसाय करणार्या किंवा व्यवसायाचे शंभर टक्के आरक्षण असलेल्या व्यपार्यांनाही मागे सारले. ही किमया कोरेगाव येथिल कै. काशिनाथ तुकाराम विरकर यांना साध्य झालेली होती.
आज सज्जनगडाच्या पायथ्याला आनंदी नावाचे हॉटेल सुरु केले आहे. श्री. सोमनाथ यांचा समाज कारण राजकारणच पिंड यामुळेच त परळी गावचे सरपंच ही होते. गावाच्या विकासात सहभाग घेतात. तेली समाजाचे संघटन व्हावे या धडपडीतुन त्यांनी वाटचाल केली. सातारा समाज संस्थेने वधुवर मेळावे ही संकल्पना रूढ करिताना त्यांनी हवी ती मदत दिली एक वेळ ते मेळावा अध्यक्ष होते. तेली गल्ली या मासिकाच्या धडपडीला त्यांचा हातभार आसतोच.
पुर्वी ही पालखी हिंगण गाव हुन जात असे पण ती राहुरी येथून जावू लागली. खास पालखी साठी बुर्हानगर येथिल देवीच्या भगता कडुनच पालखीचा दांडा येत असतो. ही तयार करण्याचा मान सुतारांचा आसतो. त्या साठी लागणारे खीळे लोहाराकडूनच येतात. जंगम पालखीला गोंडे लावतात हा मान त्या त्या घरातल्याना दिला जातो. तेली समाज हे सर्व करवुन घेतो. व समाज जागेत पालखी ठेवली जाते.
बुर्हानगरच्या बाळोजी भगतांच्या वंशजांनी बनवलेल्या पालखीतच देवीला स्थापन्न करतात. जानकोजी भगतांची समाधीजेथे आहे तेथे एक दिवस ठेवतात रात्री हाजारो गोंधळी, हजारो भक्त सहभागी होतात. शिंलागणास निघण्यापुर्वी पालखी मंदिराच्या होम कुंडा जवळ असते. देवीस दुधाची भोग केली जाते. देवीला पातळे नेसवली जातात नंतर जानकोजी भगत यांच वशंज स्वत:च्या कमरेस बांधुन आनलेला पेंडभाजीचा नैवद्य देवीला दाखवितात.
बुर्हानगर येथे आज ही त्यांचे वंशज आहेत आजचे वंशज श्री. अर्जुन किसन भगत यांच्याशी चर्चा करित असताना काही एैतिहासीक घटना ही सांगितल्या बाळाजी भगत यांचा पराक्रमा प्रमाणे एक कथा ही प्रचलीत आहे. जानकोजी भगत आपला तेल घाना घेत होते. त्यांना मुल बाळ होत नव्हते. देवीला नवस बोलोवा हा विचार करून त्या रात्री झोपी गेले. गाढ झोपेत असताना एक लहान बालिका दिसली. ती जानकोजीच्या जवळ आली. ते मोठ्याने झोपेत ओरडत होते, ए अबिंके ए जागे होताच स्वप्न बायकोला सांगितले