Sant Santaji Maharaj Jagnade
पारतंत्र्य म्हणजे गुलामगीरी ही सामाजीक, आर्थीक, सांस्कृतीक व राजकीय असु शकते. गुलामाला गुलामगीरीची जाणीव झाली की तो काय करू शकतो याचे जीवंत उदाहरण म्हणजे अस्तगांव, जि. नगर येथील स्वा. सैनिक तुकाराम हरिभाऊ गाडेकर हे होत. त्यांचे अप्रकशित आत्मपरिक्षण हस्तलिखीत स्वरूपात मिळाले ते त्यांचे चिरंजीव काशिनाथ तुकाराम गाडेकर यांनी मला प्रकाशित करण्यास परवानगी दिली.
![]()
श्री. पोपटराव पालखी बरोबर पंढरीला जात. या वेळी अडानी पण खर्या सुशिक्षीत असलेल्या आईला एक गोष्ट पटत नव्हती. माझा संताजी ज्या पालखीतून मिरवत जातो. ती इतर संतांच्या पालखी सारखी दर्जेदर नाही. ही उनिव मुला समोर मांडली श्री. पोपटरावानी यावर स्वत: विचार केला. आणि संताजी साठी पालखी स्वखर्चाने बनवुन देतो असे सांगितले. रोख पैसे न देता अंदाजे एक लाख रूपयांची पालखी स्वत: बनवुन दिली. आईची इच्छा पूर्ण केली.
मग सर्व एकत्र आले. पालखी सुरूवात करणे जेवढे कष्टाचे होते तेवढेच, नव्हे जास्तच, त्याचे सातत्य टिकविणे अवघड होते. या अवघडपणावर चर्चा झाली. कार्यातले दोष झिडकारून सोहळा निर्दोष करण्यावर विचारविनिमय झाला. प्रत्येक वर्षी पालखीला भरीव स्वरूप येऊ लागले. तेव्हा पालखीसोहळ्याची पहिली कार्यकारीणी तयार केली.
![]()
पालखी वाल्ह्याच्या मार्गाला लागली. वाल्हे या ठिकाणचे पवार व इतर समाजबांधव स्वागताला गावाबाहेर उभेच होते. स्वागत व पूजन केले. संध्याकाळी दमलेल्या बांधवांना जेवण दिले. सकाळी गरम पाणी आंघोळीला दिले. चहापाणी झाल्यावर विश्वनाथ सोपान, विष्णु, सुरेश यांनी पालखी शिवराम पवार यांच्या घरी आणली दत्तात्रय तुकाराम पवार इ. मंडळींनी पालखी गाव वेशीपर्यंत नेली या मुक्कामात पुन्हा चार वारकरी आमच्यात आले.
![]()
‘‘ आपणास दशम्या हव्यात ना? माझ्याकडे काही आहेत. आपल्याला देऊ घ्या ? ‘‘ महाराज वाटले. त्यांनी त्यांचे पाय धरले. दशम्या देण्याविषयी विनंती केली. त्या वारकर्याने आपल्या गाठोड्यातून दशम्या काढुन राऊताकडे दिल्या. त्यांनी त्या दगडावर ठेवला. परत त्याचे पाय धरले. वारकरी राऊतांना थोपटत व उठवत म्हणाला पंढरपूरच्या वाटेने चाललात या वाटेवर असे भांबावून घाबरून चालणार नाही.