Sant Santaji Maharaj Jagnade
समाजाच्या नेत्यांची एक पद्धत ठरली आहे. ज्याच्याकडे चार चाकी गाडी आहे. ज्याची गावात शहरात प्रतिष्ठा आहे. ज्याच्याकडे चार प्रतिष्ठीत नातलंगांची साठवण आहे. ज्याला या सोबत वेळ आहे. असा समाज बांधव समाज संस्थेचा अध्यक्ष असु शकतो असा साठवण असलेला बांधव समाज संघटनेत मानासाठी निवडला जातो. या सर्व प्रक्रिया निदान राहुरी शहरात बगल देऊन ज्याच्या जवळ समाज निष्ठा आहे. आशा बांधवालाच तेली महासभेचे अध्यक्ष पद देण्यात आले. यांची सार्थ निवड ही त्यांनी बर्याच बाबत सार्थक लावली हे श्री. दत्तात्रय नरसिंह सोनवणे यांनी सिद्ध केले आहे.
महाराष्ट्राची कुलदैवत भवानी माता दसर्या दिवशी ही भवानी माता पालखीत बसते. ती तुळजापुरात सिमाउल्लंघन करते ती पालखी राहुरीत तयार झालेली इतिहासाच्या पानावरून ती शेकडो वर्ष वाटचाल सुरू आहे. या एैतिहासिक कामात भाऊ सर्वा बरोबर नव्हे तर पुढे असतात हा समाज ठेवा जतन करून समाजाला सोबत ठेवतात. अहमदनगर जिल्हा तेली समाज संघटन होण्यास ते होते. नगर येथे प्रथम जे सामुदाइक विवाह सोहळा व मेळावे झाले. त्यात ते सक्रिय होते.
पुणे :- तिळवण तेली समाजा तर्फे 15 ऑगष्टचे ओचित्य साधुन समाज बांधवांचा सत्कार सामारंभ आयोजित केला होता. सत्काराला उत्तर देताना पोलीस आयुक्त संजय पाटील आपल्या भाषणात म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील आमच्या गावची पाटीलकी ही पुर्वी पासुन आहे. मी जेथे जथे नोकरी निमित्त होतो तेथे समाजाचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत राहुन सोडवले आहेत. कुणाला अडचन असेल मार्गदर्शन हवे असेल तर जरूर भेटा मी सहकार्य करेल. कारण पुणे समाजाच्या कामाची परंपरा आहे. समाजाचे काम महाराष्ट्रात अग्रेसर आहे.
याप्रसंगी जाणिव पुरस्कार विजते प्रा. वसंतराव कर्डीले म्हणाले की, भारतात 6500 जाती असल्या तरी सर्व जातीचा ओबीसी हा कणा आहे . पुर्वी त्याची संख्या 52 % होती. आज ती 65 % च्या पुढे आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी सत्ताधारी होऊ शकतात. मात्र त्यांच्यात एकजुट नाही. तसेच राजकीय जागृती नाही. 1902 मध्ये छत्रपती शाहु महाराजांनी ओबीसीसाठी 50 टक्के प्रथम आरक्षण दिले. 1928 साली सायमन कमिशनपुढे श्येडुल्ड कास्टची यादी आंबेडकरांनी दिली तर श्येडुल्ड कास्टची यादी ठक्कर बाप्पांनी दिली.
वधु वर मेळाव्यातील वाटचालीची मी चिरफाड आनेक वेळा केली आहे. ही चिरफाड चुकीची आहे. हे कोणच सांगत नाही. फक्त बघुन घेऊ आमच्या विरोधात लिहीता ही आसली दमदाटी खरे लिहीले म्हणुन होते. कारण वधू-वर मेळावा ही समाज सेवा मागेच गाडुन टाकली. भव्य दिव्य पणाच्या हौसे साठी त्याला व्यवसायीक स्वरूप दिले. समाज संस्थेला नफा ठेवता हे फक्त काही आहेत पण याच्या किती तरी पट हा एक सामुदाईक पणे समाजाला खिंडीत पकडण्याचा उद्योग झाला आहे.