Sant Santaji Maharaj Jagnade श्री. विजय रत्नपारखी, विभागीय अध्यक्ष, प्रांतिक तेली समाज महासभा ![]()
राजकारणामध्ये इतर लॉबीमुळे किती सर्ंघष करावा लागतो, ते नेहमी सांगत आसतात. पण त्यांनी या लॉबीशी लढा देऊन आपले कार्य सिद्ध करून दाखविले. समाजासाठी काहीतरी करावे, समाजातील तरूण पिढीला नेहमी संदेश देतात, की तरूणांनो, संघटित व्हा, चांगले शिक्षण घ्या. चांगल्या हुद्यावर नोकरी करा. व्यवसाय करा. कोणीही मागे पडू नये. असे नेहमीच ते मार्गर्दशन करतात समाजासाठी तळमळ असणारे तडस साहेब नेहमी आमच्यासारख्या तरूणांना मार्गदर्शन करत असतात. समाजानेही अशा आपल्या नेत्यांना साथ द्यावी., त्यामुळे समाजाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. तडस साहेब कधीही समाजातील व्यक्तींचा भेदभाव करत नाहीत. सर्वांशी ते अगदी सलोख्याने विचारपूस करून त्यांच्याशी आपले नाते घट्ट करीत आहेत.
राजश्री भगत, अध्यक्षा अखील भारतीय म. प्र. व अल्पबचत महासंघ
![]()
तुका आभाळा ऐवढा वर्धा जिल्ह्यासारख्या छोट्या जिल्ह्यातुन आमच्या समाजाचा माणुस दिल्लीच्या तख्तावर खासदार म्हणुन विराजमान झाल्याचा संपुर्ण समाजाला अभिमान आहे. त्याच्या उज्वल भवितव्यसाठी व दिर्घायुष्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करते. व अखिल भारतीय महिला प्रधान व अल्पगचत प्रतिनिधी महासंघाची अध्यक्षा या नात्याने संपुर्ण प्रतिनिधी महासंघाची अध्यक्षा या नात्याने संपुर्ण भारतातील ५ लक्ष अल्पबचत एजंटातर्फे त्यांचं अभिष्ठ चिंतन करते.
प्रकाश लोखंडे, अ. नगर
![]()
या वेळी देश पातळीवरील तैलिक महासभेची सह विचार सभा सुरू झाली या सभेला महाराष्ट्रा सह देश पातळीवरील समाज बांधव प्रथमच नगर येथे आले होते. सभेची सुरूवात झाल्या नंतर देश पातळीवर अध्यक्षांची निवड सुरू झाली. या वेळी सर्वानुमते कै. केशर काकुची निवड अध्यक्षा म्हणुन झाली. भोजना नंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांची निवड करावयाची होती. काकू, रायपुरे यांनी माझ्या सह एक दोन जना बरोबर चर्चा केली. असंघटीत समाजाला संघटीत करू शकणारा संघटक वृत्तीचा अध्यक्ष हवा आसे सुजान बांधव आमदार रामदास तडस यांच्या शिवाय कोणच नव्हते. आणि या सह विचार सभेत सर्वा समोर हा विषय ठेवला आसता सभेने एक मताने मा. रादास तडस यांची निवड महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदी केली. या वेळी मा. सौ. प्रिया महिंद्रे, कै. नंदु क्षिरसागर, श्री. अशोक काका व्यवहारे, श्री. अंबादास शिंदे व इतर मान्यवर उपस्थीत होते.
![]()
- प्रकाश कर्डीले, मा. अध्यक्ष, तिळवण तेली समाज पुणे.
समाज उभा आसतो संघटनेवर संघटना आसते कार्यकर्त्यांच्या बळावर कार्यकर्ते आसतात नेत्याच्या नेतृत्वावर जर समाज संघटीत हवा असेल तर कार्यकर्ते हवे असतात. या कार्यकर्त्यांना संघटीत करणारा व ठेवणारा नेता तेवढाच खंबीर असावा लागतो. याचा जीवंत अनुभव म्हणजे खासदार रामदासजी तडस साहेब आहेत. अहमदनगर येथे अध्यक्ष पदाची जबाबदारी येताच ते आपल्या पदाला न्याय देऊ लागले.
सौ. मंगल जाधव महिला आघाडी महाराष्ट्र
![]()
मला आठवतो त्यांचा दोन वर्षापुर्वीचा वाढदिवस त्यांनी त्यांच्या गावी वर्धाजवळ, ठेवला होता त्या निमित्त प्रांतिक महासभेची मिटींग व त्यांच्या गावात सामाजिक कार्यक्रम अयोजित केला होता खुप चोख व्यवस्था केली होती.
मेहनत सचोटी व माणुसकी हे गुण त्यांच्या त्या दिवसभराच्या कार्यक्रमात दिसुन आले ही त्यांची तत्व त्यांच्या यशाच बळ आहे.