Sant Santaji Maharaj Jagnade ![]()
ह. भ. प. कै. धोंडीबा राऊत, कै. दादा भगत, कै. शरद देशमाने, आश्रयदाते अर्जुनशेठ बरडकर या जाणत्या मंडळींनी पालखी सुरू केली. हे सर्वांना माहित आहेच परंतु या सुरूवातीच्या १ ले वर्षात जी धडपड झाली त्यावर पुढील प्रवास सुखकर झाला. यात राऊत बुवांची वणवण धडपड वृत्ती फार उपयोगी आली. दादा भगत हे एक जाणते होते. पुणे व पालखी मार्गावर नाते संबंध होते. त्या गोष्टीचा उपयोग त्यांनी इथे केला. त्यातून बरेच जन सहकार्यास समोर आले.
![]()
शेवटच्या टोकाचे हे बोलणे एैकल्यावर बसलेल्या सर्व मंडळींना माझा राग आला. बाजुचे आचारी व कामगार यांनी राऊतांना मारण्यासाठी कोणी उलथणे, कुणी फाट्या, कुणी काठ्या घेतल्या व ही सर्व खवळलेली माणसे राऊतांच्या अंगावर धावून आली. राऊत एक पाऊलही मागे न सरता म्हणाले, ’’महाराज, तुम्ही चोपदाराकरवी निरोप पाठवून मला बोलाविलेत आपणास माझे मत तळमळीने नम्रपणे सांगितले आपण योग्य न्याय न देता सहकार्यांकरवी अतिरेक करीत आहात, हे आपणासारख्या उच्च पदावरील माणासाला शोभत नाही.
शहराच्या मुख्य रस्त्यावरून आम्ही कस्तुरे चौकात आलो. दादा भगतांच्या घरातील मंडळींनी दर्शन घेतले. विणेकर्यांना नारळ दिला. दादांच्या वाड्यासमोर पांडुरंगाचे मंदिर, त्या मंदिरात पालखी विराजमान झाली. याच राऊळात पालखी दोन दिवस मुक्काम करणार होती. ही बातमी पुण्यातील सर्व समाजबांधवांना समजली सर्वजण दर्शनास येत होते. या सोहळ्याला यथाशक्ती देणगी देत होते.
पुन्हा पालखी पांडुरंगाच्या देवळातून गावाबाहेर निघाली. फाट्यापर्यंत अभंगाचा गजर करीत गावकरी आले. या फाट्यावर निरोप दिल्यावर बाकी उरले पाच सहा लोक. ही मोजकी पण निवडक त्यागाची, जिद्दीची निष्ठेची माणसे उरली. जाणारी येणारी विचारीत जरा थांबत एवढीच माणसे म्हणुन चालू लागत. पण ही माणसे खचली नाहीत. दमली नाहीत. हरली नाहीत की पुन्हा परतली नाहीत. वरून पडणारा पाऊस अंगावर घेत चाकण जवळ करीत होती.
![]()
आपण पुढे होऊन पालखी सुरू कशी करावी. हा ध्यास लागला. लोणंदच्यापुढे जात असताना बरड येथे मुक्काम होता. बरड गाव छोटेच पण या गावात अर्जुनशेठ बरडकर ही धर्मात्मा असामी. हा एकटा माणूस लाखो माणसांना दोन्ही हातानी मदत करणार, वारकरी तृप्त होत. बरड येथे गेल्यावर अर्जुनशेठना सांगावे वाटले. पण कसे सांगावे आपण हे असे ! बरडकर हे असे ! त्यांना सांगावे, का न सांगावे याच विचारात सांगावयाचे राहून गेले.