श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे या संस्थेची स्थापना १०० वर्षापुर्वीची आहे. संस्थेच्या वतीने दर वर्षी गरीब विद्यार्थ्यांना रू. १०००/ - शिष्यवृत्ती दिली जात होती. मागील दहा बारा वर्षात शिष्यवृत्ती योजना बंद करण्यात आली होती.
संस्थेच्या वतीने सन २०१५ - २०१६ या शैक्षणिक वर्षापासुन शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे. इयत्ता ११ वी ते पदवीपर्यत शिक्षण घेत असलेल्या तेली समाजातील गरीब विद्यार्थ्यांना रू. १०००/ शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या नमुन्यातील अर्ज भरून त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदरचा अर्ज ३१ जुर्ल २०१५ पर्यंत खालील पत्यावर पाठविण्यात यावा.
तेली समाजाची वधुवर पुस्तीका 2014
तेली गल्ली ह्या तेली समाजाची वधु - वर पुस्तीका तेली समाजाच्या हाजारो वधु - वरांची माहिती.
त्यांनी प्रथम सामुदाईक विवाह सुरू केला यातील अडचनीला सामोरे जाताना वधु-वर मेळावा ही संकल्पना पटली. आगदी पुणे जिल्हा व सातारा, नगर, नाशीक, रायगड मुंबई येथे घरोघरी जावुन संकल्पना पटवून देऊन मेळाव्यात सहभाग वाढवला. एक पुणेकर काय करू शकतात हे सर्वांना पटले गेले.
- पोपटराव गवळी, अध्यक्ष प. महाराष्ट्र
परंतु १५ वर्षा पुर्वी महाराष्ट्र तेली महासभा प्रांतिक अध्यक्ष पद मिळाले हे मिळाल्या नंतर या पदाला न्याय देणे हे ठरवून ते महाराष्ट्रात फिरू लागले. प्रवास, निवास जेवण हे स्वत: करत सुदुंबरे व नागपुर येथिल महामेळावे भरवणे हे अवघड धनुष्य खांंद्यावर घेतले. ते घेताना समाज ढवळून काढण्यासाठी त्यांनी जिल्हा तालुका व गावे पिंजुन काढली किमान चार लाख बांधव हजारो मैलावूरन सुदूंबरे येथे घेऊन येण्याचे दिव्य त्यांनी यशस्वी केले. या झुंजीत लाखो रूपये गेल. पण मागे सरले नाहीत. परंतु महामेळाव्याद्वारे महाराष्ट्रातील बड्या राजकरण्यांची झोप उडवली हा अफाट समाज जर असाच जागा होऊन संघटीत झाला तर आपले राजकारण तेल्याच्या वळचनीला जाईल. या वेळी काही हुशार मंडळींनी तेली आडवा तेली हटवा हा अघोषीत अजंठा राबवला. मी तेली आहे. आणि तेली म्हणुनच निवडून येतो हे ठसवणारे रामदासजी तडस यांच्यासाठी मोर्चे बांधणी केली. त्यातुन आमदारकीत अपयश दिले. हे अपयश खिशात ठेवून ते समाज पिंजुन काढत होते. ते करिताना घराला घर पण देणारी जवळची ५० एकर जमीन घरापासुन दुर गेली हे शेवटी समजले पण ते डगमगले नाहीत हीच त्यांची तेली निष्ठा.
श्री. रामदास धोत्रे, उपाध्यक्ष महाराष्ट्र तेली महासभा
मा. केशारकाकु क्षिरसागर पुण्यात येत तेंव्हा त्यांच्याशी चर्चा करून अनेक प्रश्न सोडवत होतो. समाजा बरोबरचे प्रश्न यांचा मागोवा घेत होतो. मा. जयदत्त क्षिरसागर मा. रामदासजी तडस यांच्या बरोबर मुंबई व इतर ठिकाणी भेटी होत तेंव्हा तेली ताकद व तेली प्रश्न समोर येत आशा वेळी समाजाचा एक न भुतो आसा मेळावा निश्चित झाला. मेळाव्याचे ठिकाण सुदुंबरे हे ठरले अतिरेकी व्यवस्थेच्या विरोधात उभे राहून संत तुकारामांच्या विरोधातील कायदे पायदळी तुडवणारे महान संत संताजी यांच्या समाधी स्थळी सुदूंबरे हे जसे समाधी स्थळ आहे तसेच नजीकच्या देहू याच देहूत संत संताजींनी धन दांडग्या व जात दांडग्यांना तेली ताकद दाखवली. सुदुंबरे येथे महामेळावा निश्चित झाल्या नंतर केशरकांकुचे आशिर्वाद जयदत्त अण्णांचे मार्गदर्शन व तडस साहेबांचे नियोजन हे आम्हा पुणे शहर ग्रामिण बांधवांना आयोजक म्हणुन उपयोगी पडले.