शिरपूर, शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये थोर संत, व्यक्ती यांची जयंती साजरी करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाने सुची तयार केलेली आहे. या सुचीमध्ये प्रथमच संत जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर रोजी साजरी करण्याला तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिल्याने या वर्षीपासून संत जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात येणार
संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चाकण या गावी ८ डिसेंबर १६२४ रोजी झाला. संताजींचे वडील विठोबा यांचा परंपरागत असा धान्यापासून तेल गाळून ते विक्री करण्याचा व्यवसाय होता. संताजींचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे पाईक होते. घरात वंशपरंपरेने पंढरपूरच्या विठोबाची वारी अखंडित होती. घरातच ग्रंथांचे वाचन, पारायणे चालत. तसेच कीर्तन, प्रवचन यांना उपस्थित राहण्यात खंड नसे. हे सर्व संस्कार संताजींवर झाले. तत्कालीन परंपरेनुसार अगदी बाल वयातच विवाह होत असत. संताजींचा विवाह त्यांच्या वयाच्या ११ व्या वर्षी खेडच्या कहाणे घराण्यातील यमुनाबाई यांच्याशी झाला.
गडचिरोली : स्थानिक पटवारी भवनात नुकत्याच पार पडलेल्या एरंडेल तेली समाजाच्या बैठकीत समाजाची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी धुडेशिवणीचे भगवानराव ठाकरे, उपाध्यक्ष कवळ समर्थ, चंद्रशेखर मुरतेली, सचिव वेणुदास सहारे, सहसचिव जगदीश्वर ठाकरे, मुख्य संघटक फकिरा भरडकर, कोषाध्यक्ष तुळशिदास करकाडे तर सदस्यपदी सुखदेव कोलते, राजू ठाकरे, युवराज करकाडे, घनश्याम लाकडे, संभाजी ठाकरे, अनिल कोलते, नामदेव कोलते, जीवनदास कोलते, क्रिष्णा भरडकर यांची निवड करण्यात आली.
विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर, शुंभक अंक संताजी डॉक्टर मेघनाथ सहा प्रबोधन मंच, व्यवस्था परिवर्तनासाठी अभियान मासिक, इत्यादी संघटनेच्यावतीने रविवार दिनांक 28 जुलै 2019 सकाळी दहा ते पाच पर्यंत सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक उमरेड रोड नागपुर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजय शेंडे अध्यक्ष विदर्भ तेली महासंघ नागपूर, उद्घाटक माननीय श्रीमती मायाताई मधुकर वाघमारे मार्गदर्शक विदर्भ तेली समाज महासंघ, प्रमुख पाहुणे - माननीय एडवोकेट पुरुषोत्तम घोटाळे ,
प्राचीन भारताचा इतिहास जितका समृद्ध आहे, तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात दक्षिण भारताचा इतिहास समृद्ध आहे. मध्ययुगीन बारावे शतक हे परिवर्तनाचे शतक मानले जाते. आजपासून 900 वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती खूप बिकट होती. माणूसच माणसाचा गुलाम बनला होता. मराठी कष्ट न करता फुकट खाणारा वर्ग समाजात वाढत होता. कष्ट करणारे अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार कष्ट करत होते.