Sant Santaji Maharaj Jagnade
नगरमधील अकोला दुर्गम भाग. अकोला मधील राजुर हे अती दुर्गम. या गावात समाज बर्यापैकी भाऊशेठ पाबळकर हे जागृत बांधव.तेलघानी बारा महिने नसे. इतर वेळी दारातील चार जनवरे डोंगरात घेऊन जावे. दुध मिळे. हे कितीतरी पिढ्या चालले. जुलूमी इंग्रजांनी जंगलेच सरकारी ठरवली. गायरानात बंदी आणली. हा कायदा भंग करण्यास क्रांतीसिंह नाना पाटील यांनी गांधींच्या आदेशावर चरणबिळाशी (सांगली) येथे जंगल सत्याग्रह केला. त्याचे पडसाद येथे ही उमटले. राजूरच्या युवकांनी 1930 मध्ये जंगल सत्याबग्रह करून इंग्रजांच्या कार्याचा भंग केला. त्याबद्दल इंग्रजांनी शिक्षाही दिली. परंतु या जुलूमी राजवटीविरुद्ध जागो जागी बुलेटिन वाटणे, वाचून दाखविणे, आदिवासी लोकांना स्वातंत्र्याचे महत्व सांगणे यात हे आघडीवर होते.
सह्याद्री पर्वताचे उंच शिखर कळसुबाई ते याच भागात सर्वात दुर्गम भाग तो हाच याच अकोले तालुक्यात राजुर हे क्रांतीचे केंद्र इंग्रजांची बारीक नजर एक अटक करावा तर दुसरे दोन निर्माण व्हावेत अशी, अवस्था दत्तात्रय पन्हाळे हे तरूण वयात देश सेवेने भारावून गेले. जंगलातील भूमिगतांना संरक्षण देणे. भाकरी पोहच करणे, प्रभात फेरी व सायंकाळी फेरी काढणे सुरू केले. इंग्रजाच्या वाकड्या नजरेने ते भुमीगत झाले. इंग्रजांची यंत्रणा उडवुन टाकण्यस तारा तोडल्या, भुमिगतांना पकडू नये म्हणुन पूल उडवून टाकले. यातुन 9 महिने शिक्षाही झाली. शिक्षा संपल्या नंतर बुलेटिन वाटणे, जागोजागी सभा घेणे सुरू ठेवले. या वेळी अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, दुर्वे नाना यांचा परिचय यामुळे स्वातंत्र्य यज्ञात काम करता आले.
संगमनेर हे इंग्रजांचे सर्व तर्हेचे केंद्र होते. महात्मा गांधीच्या मुळे हळु हळु वारे चांगलेच जोर धरत होते. 1930 चा लढा हा गावो गावी झाला संगमनेर याबबत आघडीवर जंगल सत्याग्रह हा कायदे भंग इंग्रजांचा एक तडाखा होता. यात वालझाडे यांचा सहभाग होता. संगमनेरच्या युवकांनी 1936 मध्ये ब्रिटिश राजवटी विरूद्ध एक कट तयार केला आणि तो राबविला सुद्धा या कटाच्या सुत्र धारांपैकी ते एक. तो आखणे व प्रत्यक्ष राबविणारे म्हणन त्यांना अटक व शिक्षा झाली. 1942 च्या लढ्ात भूमिगत राहुन इंग्रज राजवट खिळखिळी करीत होते.
डॉ. अमोल वसंत भांडकर :- पाथर्डीच्या वसंत भांऊचे हे डॉ. अमोल चिरंजीव हे मुळात एम.डी. पदवी मिळवलेले आहेत. विमान नगर परिसरातील दर्जेदार हॉस्पीटल मध्ये ते एक तज्ञ डॉक्टर म्हणुन ओळखले जातात. वडगांव शेरी येथिल पाण्याच्या टाकी जवळील सुंदराबाई हायस्कुल समोर स्वत:चा सुसज्य दवाखाना आहे. स्वत: स्किन स्पेशालीस्ट आहेत. नैसर्गीक केसा सारखे ते केस रोपन ही करतात कै. बबनराव भांडकर व श्री. वसंत भांडकर यांची समाजसेवेची एैतिहासिक परपंरा ही चालवत आहेत. पुण्या सारख्या शहरात स्क्रीन स्पेशालीस्ट कमी आहेत यात यांचा पहिल्या पाच मध्ये नंबर लागतो.
श्री. जगन्नाथ चंद्रभान लुटे यांचा जन्म श्रावण शुद्ध पंचमी शके दि. 25/08/1933 रोजी येवला , जि. नाशिक येथे झाला. त्यांचे मुळ गाव वावी, ता. सिन्नर, जि. नाशिक हे असून, त्यांचे बालवाडी चे शिक्षण आळंदी येथे झाले. त्यानंतर त्यांनी वावी येथे शेतकरी शाळेमध्ये चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे चौथीनंतरचे शिक्षण तेली संताजी बोर्डींग नाशिक येथे झाले.
1947 साली वडीलांच्या निधनानंतर वावी येथे त्यांच्या काकांनी त्यांना मुळ किराणा व्यवसायामध्ये उतरवले. त्यानंतर 1949 साली त्यांच्या काकांचे ही निधन झाले. अर्थात त्या नंतर सर्व कुुटुंबाची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. त्या दरम्यान त्यांचा मुळ व्यवसाय असलेल्या किराणा दुकानावर इन्कमटॅक्स व सेलटॉक्सच्या केसेस दाखल झाल्या. त्या कारणावरून त्यांना आपले दुकान बंद करावे लागले.