माझे वडील रंगनाथ सहादु कोटकर त्यांना तीन भाऊ श्री. सावळेराम सहादु कोटकर, श्री. लक्ष्मण सहादु कोटकर, श्री. गणपत सहादु कोटकर असुन सर्व एकत्र कुटुंब होते व व्यवसाय पण एकत्र होता. सन 1960-78 दरम्यान तेली खुंट येथे ऑईल मिल व डाळ मिल चा व्यवसाय करीत होते त्या नंतर व्यवसायात वाढ होत असल्यामुळे जागा कमी पडु लागली म्हणुन आम्ही सरदार चौक स्टेशन रोड येथे भाडे तत्वावर जागा घेतली तेथे ऑईल मिल व एक डाळ मिल चालु केली.
शब्दांकन :- सौ. रूपाली राजेश काळे.
श्री. प्रल्हादशेठ विठ्ठल सिदलंबे (पैठण धर्मशाळा अध्यक्ष) यांचे नातु व कै. रंगनाथ बाकराव काळे यांचे पुतणे विजय वारसाने समाजसेवा मिळावी असे हे व्यक्तिमत्व कै. श्री. बाळासाहेब काळे व कै. कौसल्या यांचे तृतीय पुत्र विजय यांना आई वडिलांचे छत्र जरी लवकर गेले तरी काका कै. सदाशिव काळे व मोठे दोन्ही बंधु श्री. संजय काळे व श्री. राजेश काळे यांचे नेहमीच मार्गदर्शन मोलाची साथ मिळते.
विजय ने 12 वी पर्यंत शिक्षण करूण परिस्थिती मुळे व्यवसायात जम बसविला. तिन्ही भावांचा एकत्रित दुग्ध व्यसायात आज कृष्णाई दुध काळे हे नाव सर्वपरिचीत आहे. मोठा भाऊ माऊली गोशाळेचा अध्यक्ष तर दुसरा साईदास परिवाराचे सल्लागार असे हे धार्मिक व सामाजिक कार्य करणार्या परिवारातले.
- श्री. किशार दिगंबर काळे, श्रीगोंदा, जि. नगर
बौद्ध धर्माची पाया भरणी तेली समाजाने केली हा इतिहास आहे. त्याच्या र्हासा नंतर शंकराचायार्र्ंनी समन्वय साधला यातुन ब्राह्मणी धर्म म्हणजे वैदिक धर्माची सुरुवात झाली. यालाच काही वर्षीनी हिंदु ही बैठक मिळाली. याच काळात काही मुसलीम व्यापारी देशात आले. ते स्थीर स्थावर होत असताना काही सुफी संत ही आले. या संतांचा प्रभाव या देशाच्या संस्कृतीत पडू लागला. मुसलीम राजवटीत जेंव्हा आत्याचार बोकाळला सत्ता संपत्ती व हेकेखोर राजवटीत जेंव्हा अत्याचार बोकाळला. या वेळी संतांनी माणुसकीची शिकवण दिली. त्यापैकी संत शेख महंमद महाराज व संत मदोजी महाराज होत.
हिवरे येथिल श्रीराम ग्रामीण पतसंस्थेच्या उभारणीत सहभाग स्थापने पासुन ते संचालक आहेत. गत दहा वर्ष ते पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन ही आहेत. अहमदनगर जिल्ह्या जे माथाडी बोर्ड आहे. त्या बोर्डच्या कमिटीवर ही सदस्य म्हणुन काम करीत आहेत. श्री. सदाशिव साळुंखे यांचा नेवासा मार्केट कमीटी उभी करण्यात संचालक म्हणून फार मोठा सहभाग. या मार्केट कमिटीवर श्री. देवीदास साळुंखे संचालक म्हणुन काम करित होते. या कार्य काळात ते मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन म्हणुन होते, शेतकरी व्यवसायीक यांच्या व्यवहारा बरोबरच मार्केट कमिटीचा विकास यातील बारकावे वापरल्या मुळे सुसंवाद साधणारे संचालक ही त्यांची प्रतिमा होती. म्हणुन गतवर्षी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्याची नियुक्ती मार्केट कमिटीवर तज्ञ संचालक म्हणुन केलेली आहे.
जीवनाच्या प्रवासत स्थिरता आली मामांच्या मुळे सुदुंबरे व संत संताजी माहित होते. त्यामुळे पुण्यतिथी दिवशी ते सुदुंबरे येथे येत. यातुन ओळखी वाढु लागल्या यातुनच समाज समजुन घेता आला व ते महाराष्ट्र तेली महासभेच्या संपर्कात आले. यामुळे ते मावळ तालुका अध्यक्ष झाले. गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभा त्यांनी यशस्वी पने राबविले. खाने सुमारी करण्यासाठी सोबत्यांना घेऊन तालुका पिंजुन काढला. यातुन समाज संघटन घडले. खाने सुमारी पुस्तक प्रकाशनासाठी जिल्हा कमिटी बरोबर मेहनत घेतली. त्याचे रूपांतर समाजाच्या मेळाव्यात आहे येथे दिसुन आले. पिंपरी चिंचवड येथिल संत संताजी सेवा प्रतिष्ठाण या संस्थेत काम करत आले. सन 2014 च्या वधुवर मेळाव्याचे स्वागतअध्यक्ष पद ही त्यांनी यशस्वीपणे पार पाडले. धडपड, त्याग, निष्ठा व प्रामाणिक पणा या जोडीला सौ. निता यांची साथ सोबत यशो मंदिराकडे घेऊन गेली हे ते अभिमानाने सांगतात.