Sant Santaji Maharaj Jagnade
लक्ष्मण महाराज हे तसे मुळचे रहीवासी नागडे गांव ता. येवला येथील होते. परंतु पुढे व्यवसायाचे निमित्ताने शिर्डीला स्थाईक झाले. त्याकाळी मोठे होलसेल किराणा दुकान होते. परंतु त्यांच्या व आमच्या अशा दोन्हीही कुटुंबामध्ये मागील काही पिढ्यांपासुन भगवद्भक्तीचा वारसा चालत आलेला आहे. माझे आजोबा ह.भ.प.श्री.चंद्रभानजी लुटे हे आळंदीला जोग महाराजांनी सुरू केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी होते. त्यांनीच लक्ष्मण महाराजांना आळंदीला जाण्याची प्रेरणा दिली व आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी ठेवले. आमच्या कुटुंबाचा पहिल्यापासुनच बेटावरील सर्व महात्मांशी सतत संपर्क राहीला.
पुणे - खोटी कागदपत्रे व प्रतिज्ञापत्र शासनास सादर करूण बनावट ओबीसींनी मिळविलेले दाखले तात्काळ रद्द करूण, खोटे कागदपत्र व प्रतिज्ञापत्रक दाखल करणारे बनावट ओबीसींचे वर तात्काळ फौजारी दावे दाखल करूण त्यांच्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे. असे विचार ओबीसी सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश भोज यांनी कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरांमध्ये मांडले. ओबीसी सेवा संघाचे पुणे जिल्हा कार्यकर्ता शिबीर पुणे येथे नुकतेच पार पडले. याप्रसंगी खर्या ओबीसींवर होणारा अन्याय या विषयांवर चर्चा करण्यात आली. खोटे ओबीसींचे दाखले मिळवुन तिकीटे मिळवुन निवडुन येतात अणि त्यातच खर्या ओबीसी असणार्या उमेदवारावर अन्याय होतो. ओबीसी समाज हा मध्यमवर्गीय असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या मागासलेला असुन त्यामुळे सक्षम असणार्या उमेदवाराला टक्कर देवु शकत नाही. या प्रसंगी ओबीसी सेवा संघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मोहन देशमाने पुणे जिल्हा काया्रध्यक्ष संदिप थोरात युवा अध्यक्ष विशाल सुपेकर, दिलीप शिंदे, महेंद्र शेलार, लक्ष्मण कावडे, पंडीत चौधरी पुणे शहर अध्यक्ष, चंद्रकांत शिंदे, महिला आघाडी पुणे शहर अध्यक्ष सौ. रेखाताई रासकर, व अनेक कार्यकर्ते हजर होते. या प्रसंगी ओबीसी सेवा संघाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन ही मोहन देशमाने यांचे हस्ते करण्यात आले.
युवकांच्या हाती सत्ता दिली तर ते देशाचा फार मोठा विकास करतील, असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. युवक म्हणजे उत्साहाचा झरा मुर्तिमंत झळाळते चैतन्य युवकांमध्ये फार मोठी शक्ती आहे. मी तुम्हांला आशाच युवकाची आज ओळख करून देणार आहे. त्यांचे नाव आहे श्री. प्रशांत चंद्रकांत भागवत.
पण त्यांनी दिवसभर राब राब राबायचे 24 तास काम करायचे आणि नोकरीत पर्मनंट नाही. हा अन्याय कशासाठी ? त्यांनाही मुले - बाळे आहेत, संसार आहे. नोकरीवरून काढले तर खायचे काय ? त्यांना नोकरीत पर्मनंट केलेच पाहिजे
बंधुभगिनींनो अशा प्रकारे दुसर्यांसाठी भांडणारा झगडणारा हा तरूण. त्यावेळी ते होते 26 वर्षांचे वडिलाच्या शब्दाचा मान राखण्यासाठी कॅडबरी कंपनीत नोकरी केली. युनियन निवडणुकीत उभे राहिले, भरघोस मतांनी निवडुन आले. यावरून त्यांच्याबद्दल कामगारांना केवढा विश्वास होता हे दिसते निवडुन आल्याबरोबर त्यांनी 250 लोकांना पर्मनंट करण्यात सिंहाचा वाटा घेतला. आज त्या लोकांचे संसार सुखात आहेत.
एैतिहासीक परंपरेतील हे गांव याच गावात भागवत पिड्यान पिड्या रहातात. याच गावात याच घरात श्री. अंबादास शिंदे यांचे आजोळ. जवळच सुदूंबरे. श्री. उद्धवराव घडले ते सुदूंबरे व इंदोरीत जमेल तेवढे शिक्षण पुर्ण करून त्यांनी कॅडबरी कंपनीत नोकरी केली. वडील कै. धोंडीबा राऊत यांच्या बरोबर मंदिरात भजनात पखवाज वाजवत होते. श्री. भागवत हे लहानपणापासुन सुदूंबरे येथेे श्री संताजी स्मृती दिनात सामिल होते आहेत. आज सेवा निवृत्त असल्याने बराच वेळ शेती व समाज कार्यात मग्न असतात.
खेड तालुक्यातील चांदूस हे गांव, भाम नदी ओलंडताच ठाकुर पिंपरीचा फाटा, या फाट्या पासूनच डोंगराची सोबत लागते. 4/5 कि.मी. जाताच डोंगर दर्यातला खाच खळग्यांच्या रस्ता. बरेच अंतर चालुन गेल्यावर आड रानात विक्रांत ढाबा व फॅमीली गार्डन रेस्टॉरंट या आडबाजूच्या रस्त्यावर मला श्री. विजय शंकर व्यवहारे भेटले. त्यांच्या सोबत घरी गेलो तेंव्हा एक धक्का बसला. सौ. दगडाबाई शंकर व्यवहारे वय वर्षे 73 होत्या. ओळख होताच सांगीतले मी तळेगावच्या श्री. सहदेव मारूती मखामले यांची मोठी बहिण. मला प्रसंग आठवला सन 1977-78 मध्ये एका साहित्य संम्मेलनाला कविता पाठवली तर सयोजकांनी जिव्हाळ्याचे पत्र पाठवुन निंमत्रण दिले. आणी सहदेव मखामले यांनी प्रथम मला रंगमंचावर उभे केले. माझ्या पुस्तकाला ही प्रस्तावना दिली. तर एका जेष्ठ कवींची या भगीनी त्या जेंव्हा सौ. व्यवहारे म्हणुन चांदूस येथे आल्या तेंव्हा नुसतीच डोंगरे, नुसताच उभा पाऊस. त्या पावसात कशी ही वाढलेली झाडे. व झुडपे श्री. शंकरराव बाळकृष्ण व्यवहारे हे घरचा तेल घाना घेत. तेल पेंड निर्माण करून त्यांची विक्री करी. उशाला बखळ शेतीजमीन तेवढी शेती करित होते. त्यांना 2 मुले व 4 मुली यांचे हे सुखी कुटूंब डोंगर दर्यात वावरत होते.