Sant Santaji Maharaj Jagnade
आठवडे बाजाराचे रूपांतर केले दिवटेंनी मॉल संस्कृतीत
पिड्यान पिड्या जोपासलेला तेल घाना घानवडीतुन उपसुन बाहेर ठेवण्याची वेळ आली तेव्हां समाजबांधवांनी पर्याय शोधले. यातील एक पर्याय म्हणजे भुसार मालाची ठोक खरेदी विक्री, गावात शहरात किराणा दुकान, अल्प भांडवलावर परिसरातील आठवडे बाजारात पाल ठोकुण किराणा माल विक्री. या आठवडे बाजारातुन अनेकांनी नंतर झेप जरूर घेतली आहे. परंतु आठवडे बाजार करता करता मॉल संस्कृतीला आपले करून त्या व्यवसायात मांड ठेवून वावरणारे कोणच मला भेटले नाही. हि सत्य बाब जवळ असताना या माझ्या सत्याला मान्य करता येणार नाही अशी वाटचाल संगमनेर येथील दिवटे परिवाराने करून दिली. त्यांच्या या वाटचालीचा मागोवा.
साहू समाज समिति नगरा झांसी के लिए ऐतिहासिक पल 18जून को साहू समाज धर्म शाला नगरा मे नवनिर्मित तीन कक्षो का लोकार्पण क्रमशःश्री सुरेश साहू जी श्री एम एल गुप्ता एडीशनल कमिश्नर सैलटैकस श्री मुकेश साहू जी द्वारा किया गया इस अवसर पर उपस्थित सभी साथियों का हृदय से धन्यवाद इस अवसर पर लगभग 120 छात्र छात्राओं को समिति ने सम्मानित किया इं राम नाथ साहू झांसी महामंत्री साहू समाज समिति नगरा झांसी
जामखेड तालुक्यातील पानाळी गाव या गावातून कै. खंडू देशमाने जामखेडला आले. येथे राऊत मेहुणे होते. देशमाने यांनी प्रथम निवार्याची सोय पाहिली व कुटूंबासाठी झटु लागले. त्यांना 1) बाबासाहेब, 2) दत्तात्रय 3) नवनाथ, 4) जालिंदर, 5) भाऊसाहेब 6) विश्वास ही मुले व 3 मुली असे मोठे कुटूंब ते संस्कारीत करित होते. श्री. बाळासाहेब देशमाने वडिलांच्या बरोबर बैलाचा व्यापार काही काळ केला परिसरात ऊस तोड मजुर होते. त्या साठी त्यांचे बैलगाडी हे साधन होते. त्यामुळे व्यपार बरा होता. परंतु बाबासाहेबांनी जास्त लक्ष संकरीत गाई खरेदी विक्री सुरू केली. यात ही जम बसविला. याच तपनेश्वर मंदिर रस्त्यावर रहात्या घरा मध्ये किराणा मालाचे दुकान सुरू केले. व्यापाराची संस्कृती जोपासत त्यांनी जामखेड मार्केट यार्ड मध्ये आडत दुकान सुरू केले.
तसे शाम कर्पे हे उच्च शिक्षित आहेत. नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा ते व्यवसायाकडे वळले जीवनाची सुरूवात त्यांनी दुध विक्री पासुन केली. सलग 10 वर्ष ते दुध डेअरी चालवित होते या नंतर त्यांनी व्यवसाय बदल करावयाचे ठरविले. जमीन, खरेदी विक्री व बांधकाम या क्षेत्रात ते उतरले. हा व्यवसाय तसा बेभरवशाचा. पण त्यांनी इथे आपली एक पत निर्माण केली आहे. कोणाला अडचणीत नेहुन कुणाला फसवुन चार पैसे कमविण्या पेक्षा त्यांनी इथे सचोटीची मोजपट्टी लावली यातुन चार पैसे मिळालेच पण अनेक सुखी कुटूंबांचा विश्वास हे ते संपादन करू शकले. या मुळे संगमनेर परिसरात कृष्णा इस्टेट ही एक विश्वासाची पत निमार्र्ण करू शकले. स्पषट विचार, स्वच्छ व्यवहार, मी सुखी झालो इतर ही व्हावेत ही प्रणाली यामुळे ते सर्वत्र पर्यंत परिचित झालेत. कर्पे यांच्या वाटचालिस हार्दिक शुभेच्छा.
कृतार्थ कै. नारायण तुकाराम देवकर यांच्या आत्मचरित्राचा काही भाग
12 मार्च 1938 माझा जन्मदिवस. सहासष्ट वर्षांच्या कालप्रवाहांत अनेक सुहृद भेटले, देवासारखी माणसं भेटली, तर काही दानवासारखी देखील. तरी देखील माझ्यातला नारायण अविचल राहिला, सार्या झंझावाताला तोंड देत माग्रक्रमण करीतच राहिला.
भूतकाळातल्या आठवणींचा हा प्रवास, मला घेऊन जातो तो नगर शहराच्या पूर्वेस वसलेल्या बुर्हानगरला. जगदंबामातेचं देवस्थान. तुकाराम भुजंगा देवकर माझे वडिल. आमचं सारं घराणंच भगताचं. भगताचं म्हणजे देवीमातेच्या पुजार्याचं. पण पूजेवर मिळणार्या उत्पन्नातून घर चालविताना वडिलांची ओढाताण व्हायची. मिळणारं उत्पन्न आणि खाणारी तोंडं याचं गणित काही बसत नव्हतं. घरामध्ये दारिद्रयाचा सुखेनैव वावर चालू होता. पोटच्या पोरांसाठी काही तरी करणं भाग होतं. देवीमातेची मनोभावे सेवा करणारे आमचे वडील मग असहाय्यपणे काम करू लागले., तेल्याच्या घाण्यावर. भिंगारच्या मुरलीधर ढवळे यांच्या तेल घाण्यावर रात्रंदिवस कष्ट करणार्या पिताजींनी, बुर्हानगरचा जड अंत:करणाने निरोप घेऊन प्रवेश केला, तो नगर शहरात.