Sant Santaji Maharaj Jagnade
समाजिक कार्याची आवड असल्यामुळे समाजाचे काम करण्याची संधी मिळाली व शिर्डीत मोठा तेली समाज असल्यामुळे सांघीक वातावरण तयार झाले. पुढे तालुका संघटनाचे काम चालु झाले त्यात मला कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली. ती मी जबाबदारीने पुर्ण करत आहे. आज नगर जिल्ह्यात राहाता तालुक्याचे काम मोठ्या आघडीवर आहे. संताजी महाराजांची दिनदर्शिका आम्ही चार वर्षापासुन करत आहोत. प्रतिमा पुजन, नविन उपक्रम चालु केला त्यात सुद्धा यश मिळाले
श्री संताजी प्रतिष्ठाण कोथरूड येथे संघटक म्हणुन काम पहात असुन नुकताच एक वधु वर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे कार्याध्यक्ष म्हणुन जबबदरी पार पाडली. या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रातील कनाकोपर्यातील समाज बांधव हजर होते. या मेळाव्याचे वैशिष्ट्ये म्हणजे मोफत प्रवेश होता.
हे सर्व सामाजिक काम आपली नोकरी सांभाळुन घर संभाळुन कामाचे खाडे न होता आणि विशेष करुन त्यांच्या पत्नीच्या सहकार्याने सौ सुनिता भोज यांच्या मदतीनेच ते करू शकले असे ते अभिमानाने सांगतात अता गरज आहे तुमच्या आशिर्वादाची सहकार्याची आणि प्रेमाची.
शाब्दांकन : सौ. रूपाली राजेश काळे
तात्यांना सुरूवातीपासुन समाजकार्य व राजकारण यांची आवड असल्यामुळे ते सतत समाजकार्यात सहभागी होत. पुढे टी.आर. दारूणकर अहमदनगरचे नगरसेवक झाले. तसेच त्यांनी 1 डिसेंबर 1962 ते 16 डिसंबर 1963 व 21 डिसेंबर 1964 ते 30 जुलै 1965 असे दोन वेळा महाराष्ट्रातुन प्रथमच पहिले तेली समाजाचे नगराध्यक्ष म्हणुन काम पाहीले. त्याचबरोबर जिल्हा क्राँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा सहकारी ग्राहक भांडारचे चेअरमन व एस.टी.बोर्ड मेंबर वगैरे अनेक पद भुषविले त्याचप्रमाणे अखिल भारतीय शाहू तेली समाज दिल्ली या संस्थेत सदस्य म्हणुन ही त्यांनी काम केले. खरंच जीवनात प्रत्येकजन समाजाचे म्हणुन काही देणे लागतो. म्हणुन काही कार्य करतो. पण तात्यांना समाजाविषयी जाणिवच नाही तर तळमळ होती म्हणुन त्यांनी कित्येकांना रोजगार मिळवुन दिले. जमेल त्याप्रकारे ते सर्व समाजबांधवांची तसेच समाजील गरजुंची मदत करायचे तिळवण तेली समाजाच्या अध्यक्ष पदावर त्यांनी सतत 25 वर्षे कार्य केले.
बीड मधील शिरूर येथे किंवा बालम टाकळी येथे डोक्यावर गोळ्या विकणारा मुलगा. पैसे नाहीत म्हणुन शिक्षक होऊ शकत नाही. गावात रोजगार नाही. पुण्याला जाण्यास पैसे नाहीत ट्रक मध्ये बसुन पुण्यात येतो काय ? नाना पेठेतील गंजाच्या मारूती मंदिरात रहातो काय ? आणी स्वत:चे नशीब घडवुन अनेकांचे नशिब घडवीणारे श्री. ताराचंद देवराय खरेच धडपडीचे व्यवहाराचे मानवतेचे वेगळे रसायन आहे.
गावा बाहेर आठरा गुंठे जागा खरेदी करून व्यवसायाला आधुनिकतेचे स्वरूप दिले. नव्या तंत्राने मसाले कांडप करू लागले. गावात वेशी जवळ दुकान सुरू केले. सोबतीला स्टीलभांड्याचे दुकान ही सुर केले. व्यवसायाला गती येण्यासाठी श्री. मनोहरशठे दळवी, श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ, श्री. तुकाराम शेठ दळवी, श्री. ज्ञानेश्वर शेठ दळवी यांचे मार्गदर्शन लाभले अल्प शिक्षीत गाव डोंगर दर्यातील परंतु श्री. मारूती यांनी बंधुंना सोबत ठेऊन लांडे बंधु मसालेवाले ही पत निर्माण केली.