Sant Santaji Maharaj Jagnade
श्री. राजेंद्र दशरथ पन्हाळे यांनी या व्यवसायात तसा बर्यापैकी जम बसवला. श्री. अभिजित श्रीराम पन्हाळ हे स्वत: पदवीधर आहेत. नोकरी न करता त्यांनी घरच्या राजुरच्या पेढ्यात लक्ष दिले. आज नुसता फक्त पेढा बनविणस 10/12 कामगार रोज राबत असतात. किमान 1000 किलो पेढा हा शिर्डी येथे जात आसते. दुध खरेदी, पेढा विक्री, पेढा निर्मीती हे सर्व श्री. अभिजीत पन्हाळे स्वत: पहात आहेत. आणी राजुर पेढ्याला प्रतिष्ठा देत आहेत.
श्री. संजय हे पदवीधर आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग नोकरी मागे न जाता त्यांनी व्यवसयात लावला पक्षीय राजकारणा पासुन दुर राहुन व्यवसाय व समाजकार्य करणे हा छंद जोपासला नगर व पुणे येथील वधु-वर मेळाव्याला सक्रीय सहभाग. नगर जिल्हा तेली महासभेचे क्रियाशिल सदस्य श्री. संजयशेठ या माध्यमातुन जामखेड तालुका तेली बांधवांच्या विकासाला हातभार लावतात.
समाजिक कार्याची आवड असल्यामुळे समाजाचे काम करण्याची संधी मिळाली व शिर्डीत मोठा तेली समाज असल्यामुळे सांघीक वातावरण तयार झाले. पुढे तालुका संघटनाचे काम चालु झाले त्यात मला कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली. ती मी जबाबदारीने पुर्ण करत आहे. आज नगर जिल्ह्यात राहाता तालुक्याचे काम मोठ्या आघडीवर आहे. संताजी महाराजांची दिनदर्शिका आम्ही चार वर्षापासुन करत आहोत. प्रतिमा पुजन, नविन उपक्रम चालु केला त्यात सुद्धा यश मिळाले
श्री संताजी प्रतिष्ठाण कोथरूड येथे संघटक म्हणुन काम पहात असुन नुकताच एक वधु वर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे कार्याध्यक्ष म्हणुन जबबदरी पार पाडली. या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रातील कनाकोपर्यातील समाज बांधव हजर होते. या मेळाव्याचे वैशिष्ट्ये म्हणजे मोफत प्रवेश होता.
हे सर्व सामाजिक काम आपली नोकरी सांभाळुन घर संभाळुन कामाचे खाडे न होता आणि विशेष करुन त्यांच्या पत्नीच्या सहकार्याने सौ सुनिता भोज यांच्या मदतीनेच ते करू शकले असे ते अभिमानाने सांगतात अता गरज आहे तुमच्या आशिर्वादाची सहकार्याची आणि प्रेमाची.
शाब्दांकन : सौ. रूपाली राजेश काळे
तात्यांना सुरूवातीपासुन समाजकार्य व राजकारण यांची आवड असल्यामुळे ते सतत समाजकार्यात सहभागी होत. पुढे टी.आर. दारूणकर अहमदनगरचे नगरसेवक झाले. तसेच त्यांनी 1 डिसेंबर 1962 ते 16 डिसंबर 1963 व 21 डिसेंबर 1964 ते 30 जुलै 1965 असे दोन वेळा महाराष्ट्रातुन प्रथमच पहिले तेली समाजाचे नगराध्यक्ष म्हणुन काम पाहीले. त्याचबरोबर जिल्हा क्राँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा सहकारी ग्राहक भांडारचे चेअरमन व एस.टी.बोर्ड मेंबर वगैरे अनेक पद भुषविले त्याचप्रमाणे अखिल भारतीय शाहू तेली समाज दिल्ली या संस्थेत सदस्य म्हणुन ही त्यांनी काम केले. खरंच जीवनात प्रत्येकजन समाजाचे म्हणुन काही देणे लागतो. म्हणुन काही कार्य करतो. पण तात्यांना समाजाविषयी जाणिवच नाही तर तळमळ होती म्हणुन त्यांनी कित्येकांना रोजगार मिळवुन दिले. जमेल त्याप्रकारे ते सर्व समाजबांधवांची तसेच समाजील गरजुंची मदत करायचे तिळवण तेली समाजाच्या अध्यक्ष पदावर त्यांनी सतत 25 वर्षे कार्य केले.