Sant Santaji Maharaj Jagnade
जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाईन, नागपूर येथे दिनांक १२-०६-२०१६ ला सकाळी १०.०० वाजता वर्ग दहावी आणि बाराव्या मध्ये अनुक्रमे ९० आणि ८५ टक्केवारी प्राप्त तेली समाजातील विद्यार्थांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्या तेली समाजातील विद्यार्थ्यांना वरील प्राप्त गुण असल्यास त्यांनी जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाईन, नागपूर या संस्थेशी संपर्क साधावा.
महाराष्ट्रातील तेली समाजाचे आचारविचार आणि रूढी, प्रथा, परंपरा बहुजन समाजासारख्याच आहे. या समाजाच्या राज्यात साधारणत: २८ पोटशाखा आहेत. त्यात पंचम किंवा लिंगायत, कानडे, लाड, गुजर, अयार, कडू किंवा अकरमासे, कंडी, शनवार, शुक वार, राठोड, परदेशी, तिळवण आणि गंधी यांचा समावेश होतो. यापैकी तिळवण किंवा मराठे तेली या पोटजातींची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. तर भारतात 700 पेक्षा अधिक पोटजाती आहेत. या समाजातील लोक सोमवारी काम करीत नाहीत म्हणून त्यांना ‘सोमवार तेली’ म्हणतात. याशिवाय समाजात अनेक पोटजाती आहेत. यात प्रामुख्याने मराठा तेली, देशकर तेली, क्षत्रिय तेली, एरंडेल तेली, बाथ्री तेली, साव तेली, सावजी तेली, छत्तीसगडी तेली, साहू तेली, हालिया तेली, साडिया तेली, एक बादिया तेली, चौधरी तेली आदि तेली जातीच्या उपशाखा आहेत. मुस्लीम धर्मातील तेली समाजाला रोशनदार असे म्हटले जाते. नागपूर भागात प्रामुख्याने एक बैले, दोन बैले किंवा तराणे आणि एरंडे अशा तेली समाजाच्या शाखा पोटशाखा आहेत. वर्धा जिल्ह्यात सावतेली हा समाज आदिवासी जमातीप्रमाणे राहतो, तर एरंडे तेली हे गावाबाहेर राहतात. साहू क्षत्रिय समाज विदर्भात मोठय़ा प्रमाणावर आहे.
तेली समाजाच्या सौ. ऊर्मिला नामदेव खिलारे ह्या 17/04/2016 रोजी झालेल्या पालघर जिल्ह्यातील गोर्हे ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमताने निवडुण आल्या आहेत. संपुर्ण तेली समाजाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. संपुर्ण महाराष्ट्रातुन त्यांचे कौतुक करण्यात आले.
पूर्वी आमच्या आजोबाच्या काळात आमचे आजोबा गावाच्या आजुबाजूच्या परिसरातील गावे, वाड्यांमधून सावकार म्हणून प्रसिद्ध होते. आजोबाच्या काळात सुमारे १२०० एकर शेती होती. सर्व शेती पावसावर अवलंबून होती. परंतु पूर्वी पावसाचे प्रमाण योग्य प्रमाणात असल्याने घरामध्ये धान्याच्या राशी लागत होत्या. आमचे घर म्हणजे १२ खण, ९६ पत्र्यांचा वाडा होता. इतक्या मोठे घर असून धान्य ठेवायला जागा पुरत नव्हती, म्हणून सुमारे १५० पोती ज्वारी तळघरात साठवून ठेवावी लागत असे.
पुणे :- येथील तिळवण तेली समाज कार्यालयात श्री. मोहन देशमाने यांनी लिहीलेल्या महाराष्ट्राची अस्मिता श्री. संत संताजी महाराज या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करिताना मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. श्री देशमाने म्हणाले, संत तुकाराम यांचे लेखनीक हा संत संताजींचा एक भाग आहे. परंतु तुकारामांनी जी सामाजिक क्रांती केली त्या क्रांतीमधील ते एक पहिले प्रमुख आहेत. ब्राह्मणशाही व मोंगलशाही यांच्या आतेरेकी वाटचालीत त्यांनी अभंग जपले व जगाला दिले हे विसरून चालणार नाहीत. समाज बांधवांना अव्हान करिताच मदतीचा पाऊस पडला यातुन आठ हजार प्रती छापल्यात. त्या समाज बांधवांना मोफत दिल्या जाणार आहेत. श्री. संत संताजी तेली संस्था सुदूंबरे या संस्थेचे अध्यक्ष श्री. जर्नादन जगनाडे यांनी श्री. संत संताजींच्या कार्याला उजाळा येईल. श्री. मोहन देशमाने आपल्या सुदूंबरे संस्थेत प्रसिद्धी प्रमुख आहेत. त्यांनी संस्थेच्या कार्याला हे सहकार्य केले आहे. त्यांची उचित जाणीव संस्था नजीकच्या काळात ठेवेल श्री. सुंदुंबरे संस्था अध्यक्ष या नात्याने कारभार करिताना सहकार्य मिळते तद्वत काही सहकार्य करतो म्हणतात पण करित नाहीत यावर ही त्यांनी आपले विचार मांडले.