श्री. संत संताजी महाराज ट्रस्ट, राजगरुनगर तर्फे महिलांसाठी हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ तेली धर्मशाळा, तेली आळी, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे येथे आयोजीत करण्यात आलेला होता. या क्रर्यक्रमांस महिला वर्गाची उपस्थीती लक्षणिय होती. या निमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 8) - मोहन देशमाने
राजेशाही, हुकूमशाही, ब्राह्मण शाही पेक्षा लोकशाही श्रेष्ठ या लोकशाहीत लोकशाहीच्या मार्गाने दबाव गट हा लोकशाही जीवंत ठेवण्याचा हा महत्वाचा भाग हे दबाव गट जीतके जागृत असतात तेवढी लोकशाही बळकट आसते. या दबाव गटाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील महत्त्वांच्या दबावगटाचा आपण विचार करू संसदेत निवडलेल्या सदस्यांना संघटीत समाजाचे नेमके प्रश्न समजण्यासाठी बाहेर जागृती असावी लागते. संघटीत समाजाने आपले प्रश्न मांडून वातावरण निर्माण करून संसद सदस्यांना सभागृहात मांडणी करून प्रश्न सोडवण्यास सहकार्य करावयाचे आसते. हे दबाव गट सत्ताधारी पक्षाचे जसे असावेत तसे विरोधी पक्षाचे ही सुद्धा असावेत.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 4) - मोहन देशमाने
तेली गल्ली मासिक व या मासिकाच्या विचार धारेला बंद पाडा. याचे प्रयोग समाज पातळीवर अनेकांनी करून पाहिले. अगदी जहिराती देऊ नका वर्गणीदार होऊ नका. आसाही प्रचार केला तो खाजगीत व जाहिर सभेत ही झाला. तरी सुद्धा समाजाने आमची भुमीका अभिमाने स्विकारली. हे जेवढे सत्य आहे. तेवढे हे ही एक सत्य आहे की आमची समाजाच्या हित व अहित बाबत खंबीर भुमीके मुळे समाजाचे नेतृत्व सावध होत आहे. सुर्य उगवला पाहिजे तो कोणाच्या डालग्यातील कोंबड्याने बांग दिली ही गोष्टच गौण आहे. काँग्रेसने फसवले भाजपाने ओरबडले ही बाब समाजाला सांगण्याची माणसीकता निर्माण होत आहे.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 3) - मोहन देशमाने
आंबेडकर विद्यापीठाचे शिल्पकार, स्त्रि मुक्तीचे शिल्पकार, ओबीसींचे शिल्पकार म्हणुन पवारांना किती ही मोठे केले. त्यांच्या बरोबर परिषदेमधील समता किती ही जवळ गेली तरी. त्यांचे मराठा पण हे कधीच झाकोळले नव्हते. आणी झाकोळले जात नाही. कारण या सर्व त्यांच्या पाऊल वाटा आहेत. मराठा बाणा ही त्यांची द्रुतगती आहे. या बाबत विचार मांडत असताना पवारांच्या मागे धावणारे त्यावेळी महामेळावे भरवत होते. त्यांना पवारा विरोधात साधा ब्र ही सहन होत नव्हता. पण जेंव्हा समाजाचे म्होरके घरात बसले तेंव्हा कुठे यांना जाग आली. जागे झालेली ही मंडळी नवा आधार स्तंभ शोधत होते. आम्ही 12 टक्के आहोत मागुन देत नसाल तर आम्ही हिसकावून घेऊ अशी गर्जना समाज पातळीवर करीत होते. आपली डरकाळी आपलेच समाज बांधव एैकून घेत आहेत याची काळजी घेऊन टाळ्या घेत होते.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 1) - मोहन देशमाने
संत तुकारामांनी अभंगात ठणकावून सांगितले. मी कोण आहे तर एक शुद्र घरात जन्म घेतलेला एक साधा माणुस आहे. वेद, स्मृती, ब्राह्मण्य, उपनिषदे पाहु शकत नाही तिथे वाचणे दुरच. त्याचा अभ्यासकरुन मांडणे त्या ही पेक्षा दूर आहे. आणी असा मी जरूर असलो तरी तुमच्या शास्त्रमताला झिडकारून सांगतो. की मी कोण आहे तर मी देव निर्माण करणारे म्हणुन जे सांगतात त्यांचे आम्ही बाप आहोत. आसे व्यवस्थेला सुरूंग लावुन उध्वस्त करणारे विचार जपणारे, संभाळणारे व शेकडो वर्षा करिता ठेवणारे महा मानव संताजी, संताजींच्या नावाने संघटना, संताजीचे पुजन करून सभा, बेठका, भाषण बाजी, व जेवणावळी संपन्न होतात. फॉर्म पासून उद्घटना पर्यंत संताजीला समोर ठेऊन वधुवर मेळाव्याचा स्मार्ट समाज उत्सव साजरा करतो. फक्त पुण्य स्मरणा आगोदर व पुण्यतिथी दिवशी जयजयकार.