रविवार दि. ०८/०७/२०१८ रोजी सकाळी १०.३० वा. तेली समाज बांधवांना कळविण्यात येते की, मावळ तालुका तेली महासभेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव समारंभ (इ.१० वी / १२ वी.) आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे. प्रमुख पाहुणे श्री. चंद्रकांतशेत वाव्हळे (विभागीय अध्यक्ष, पुणे विभाग) सौ. चित्रीताई जगनाडे (नगराध्यक्षा, तळेगाव दाभाडे) श्री, सतिशशेठ वैरागी (विभागीय अध्यक्ष, कोकण)
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा रविवार दि. १४/०४/२०१९ रोजी सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत स्थळ - आशिष गार्डन, सव नं. ८२/२४, डि.पी. रोड, शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे ४११ ०३८.
संपर्क कार्यालय व फॉर्म स्वीकारण्याचा पत्ता : श्री संताजी प्रतिष्ठान कोथरुड, द्वारा श्री. विजय रामचंद्र भोज सर्वे नं. ७/१ए, पल्लवी फ्लोअर मील, २८ शिवगंगा परिसर, सहवास कॉर्नर, आंध्र बँकेसमोर, कर्वेनगर, पुणे ४११ ०५२.
चला सुदुंबरे या उपक्रमामागची भूमिका । तेली समाज बांधवांनी एकत्रित यावे, आणि समाजाला एक उन्नत दिशा द्यावी, या उदान्त विचारांनी आदरणीय केशरकाकु क्षिरसागर यांनी पुढाकार घेवून महाराष्ट्राच्या राज्य पातळीवर महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा या नावाची संस्था स्थापन केली.
नागपुरच्या पातळीवर या संस्थेच्या कार्याची जबाबदारी युवा नेतृत्व म्हणून श्री. सुभाष घाटे यांच्याकडे सोपविण्यात आली. नागपूर युवा आघाडीच्या नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत श्री. सुभाष घाटे यांनी, त्यांच्या सहकार्याने समाज कार्य केले. त्यांच्या कार्याची समाजानेही दखल घेतली....
तैलिक समाजाचे आराध्य दैवत संत जगनाडे महाराजांची जयंती मंत्रालय व सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसे परिपत्रक २६ डिसेंबरला सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे. या निर्णयामुळे तैलिक समाजात उत्साहाचे वातावरण असून, समाजबांधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
इ. स. १७७५ ते १७९० या कालावधीत महीपतीबाबा ताहराबादकर (कांबळे) यांनी भक्तिविजय, संतलीलामृत, भक्तलीलामृत आदी संतचरित्रे लिहिलेली आहेत. त्यांनी एकूण २८४ संतांची चरित्रे लिहिलीत. त्यात तुकोबाराय व त्यांचे संतसांगाती संताजी जगनाडे यांच्या कार्याची प्रगल्भता सुंदर वर्णन केलेली आहे.
संतांच्या साहित्याविषयी व संतांविषयी मराठी माणसाच्या मनात अपार प्रेम आहे. केवळ प्रेमच नाही, तर आदरही आहे. श्रद्धा व प्रेम जतन केलेले आहे. संतचरित्र परमपवित्र असतात.