राजगुरुनगर : रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर व संताजी महाराज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. शाळा पांगारी येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हॅप्पी स्कूल प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेश हेडा, सचिव सुधीर येवले, अविनाश कोहिनकर, अविनाश कहाणे, संताजी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव कहाणे आदी उपस्थित होते. उपसरपंच भरत बुट्टे, अविनाश कोहिनकर व अविनाश कहाणे यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश घोलप यांनी सूत्रसंचालन; तर प्रा. संदीप जाधव यांनी प्रास्ताविक केले.
तेली समाजातील महान विभुती (भाग 6) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात पिंपळगाव येथे गोटीरामबाबांचा जन्म झाला. अतिशय हुड असणारा हा मुलगा मंगलदास बाबांच्या सहवासात आल्यावर बदलून गेला. रोज सकाळी सुर्योदयापूर्वी उठायचे 4 मैलांवर असणार्या हमरापूर गावी पोहत गोदावरीत स्नान करायचे आणि ओल्या धोतरावर मारूतीला प्रदक्षिणा घालायची असा त्यांचा क्रम सुरू झाला.
तेली समाजातील महान विभुती (भाग 7) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार पन्हाळा किल्ला पेशवाईत ओस पडला. गडावर नवनाथांपैकी गहिनाथांनी काही दिवस वास्तव्य केले. ते ठिकाणही ओस पडले. एके दिवशी गहिनीनाथांनी त्यांचे शिष्य विश्वनाथ फल्ले यांच्या स्वप्नात येऊन त्यांना गडावर जाण्याची आज्ञा दिली.
रविवार दि.७ जुलै २०१९ पुणे जिल्ह्यातील नंदनवन समजल्या जाणाऱ्या छोटे काश्मीर म्हणून एक आगळी वेगळी ओळख निर्माण करणारा मावळ तालुका येथील तळेगाव दाभाडे मधील गजबजलेल्या वस्तीतील नाना नानी पार्क सभागृहात मावळ तालुका तैलिक महासभेच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला.
संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महारांजाचे शिष्य होते. व ते तेली समाजाचे होते. खरेतर संताना जात नसते. संताचे कार्य अखिल मानव जातीच्या उध्दारासाठीच असते. जगनाडे महाराजाचा जन्म 8 डिसेंबर 1624 मध्ये पुणे जिल्हातील मावळ तालुक्यातील खेड जवळील संदुबरे येथे झाला. संताजी महाराजाचे वडीलांचे नाव विठोबा जगनाडे व आईचे नाव माथाबाई असे होते. हे पांडुरंगाचे निरसीम भक्त होते. त्यामुळे लहानपणापासुन महाराजांच्या बालमनावर धार्मीकतेचा पगडा होता. त्यांचे घरची आर्थीक परिस्थिती चांगली होती. श्री. संताजी जगनाडे महाराजांचे शिक्षण लिहीता वाचता येणे व हिशोब करता येणे एवढेच मर्यादीत होते.