तसा सर्व मराठवाडा आणी या मराठवाड्यातील जालना शहर म्हणजे करडी तेलाचे आगर होते. खेडो पाड्यात तर तेली वस्तीत, तेली गल्लीत, तेली आळीत सुर्यादया पुर्वीच घरोघरी तेल घाना सुरू होत असे. आगदी सुर्य मावळे पर्यंत. करडी तेल व करडी पेंउीची महाराष्ट्राची बाजारपेठ म्हणून जालन्याला नाव मिळाले होते. इथे ही घानी सुरूच होती. तसा सर्व माल इथे विक्रीला येत असे. आणी होलसेल खरेदी साठी महाराष्ट्र जालन्याला येत असत इतकी भरभराट या बाजार पेठेची झाली होती. या बाजारपेठेत श्री. शंकरराव यांचे आजोबा आले. खेडोपाड्यातून आलेला माल आडतीवर विकू लागले. शंकररावाचे वडील आनंदराव हाच व्यवसाय करीत होते. तसा 1972 चा दुष्काळ 1965 पासुनच सुरू होता. त्याने उग्र रूप 1972 ला जरूर धारण केले होते.
संत संताजींच्या मारेकर्यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 3) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
वरिल तीन नावे वाचल्या नंतर जरा वेगळेच वाटले असणार. हे तिघे ही एकाच काळातील. मी तेली आहे. माझे पुर्वज तेली होते. माझ्या नंतरचा वशंज तेली असणार आहे. त्यामुळे या व्यवस्थे विरोधात मी लढणार आणी मी लढून या व्यवस्थेला संपवणार ही ध्येय संताजींची होती. आणि म्हणून त्यांनी ब्राम्हण धर्मानुसार किंवा ब्राम्हण कायद्याप्रमाणे व मुसलीम सत्तेत अधीकार पदावर राहून संत तुकारामांना शिक्षा दिली. या शिक्षेला अपील नव्हती. या शिक्षेला मुसलीम सत्ता ढवळा ढवळ करीत नव्हती तर ब्राह्मणी सरदारांना उलट संरक्षण देत होती. आशा वेळी हा ब्राह्मणी कायदा मोडायचा ठरवला तो प्रथम इतिहासात संत संताजींनी.
संत संताजींच्या मारेकर्यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 2) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
मागेच मी मांडले आहे की वेदांना झीडकारणारे विचार, देव निर्माण करणार्याचे आम्हीबाप आहोत. संताजी उभे राहिले. हे विचार एैकले, लिहीले, जगले व संभाळले किती कडवट सत्य आहे. हे अनेकांना पटणार नाही पण संत संताजींनी जपलेल्या अभंगातून हेच विचार उमटत आहेत. ते फक्त भार वहाणारे होते म्हणजे ते लेखन व संभाळणारे होते ? हे एक अबाधीत सत्य की ते बलुतेदार पैकी होते. ते कारू नारू पैकी होते. ते नामस्मरण, हरी किर्तन, संत संगती, साधे, सत्य आचारण, निती आणीती अनासकती यावर ते उभे होते.
संत संताजींच्या मारेकर्यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 1) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
आपल्या प्रेरणा स्थाना विषयी. आपल्या तेजा विषयी, आपल्या ताकदी विषयी आपल्या शक्ती विषयी जेंव्हा पुर्ण माहिती आसते तेंव्हा आपल्या त्या आदर्श व्यक्ती विषयी जागृत आसतो आणी ही जागृती आपल्याला आपल्या व्यक्तीच्या विचार धारेच्या प्रवाहात नेहते. आपण त्या व्यक्तीच्या कार्यापर्यंत घेऊन जातो आणी ती जर बोथट असेल चुकीची ही असेल तर त्या महामानवाच्या वैचारीक ठेवणीला आपन दफन करून फक्त त्यांच्या नावावर दुसर्यांने जे खपवले त्याचे डावपेच न ओळखता आपन फक्त भार वहाणारे ठरतो. हा भार त्या व्यक्तीच्या नावेे आसतो पण आत जे आसते ते त्या व्यक्तींच्या नावे नसतो या नंतर असा काळ येतो की आपन भक्त बनतो. आणी त्या व्यक्तीला कुटील डावात संपवणार्यांचे पोवाडे गातो. वस्तुस्थीती अशी असते की एकदा का आपन भक्त बनलो की पुजनातच गुंग होतो.
1) संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा करणार दौरा 2) ग्रामीण भागात देणार ज्यास्त लक्ष 3) तेली समाजातील पोट जाती एकाच बॅनर खाली करणार काम 4) संस्थेने महाराष्ट्र राज्यात जुळवले 97 मोफत विवाह 5) संस्था मोफत करते काम समाज बांधवाना कोणत्याही फी वर्गणी नाही 6) महाराष्ट्र राज्यातून मिळतेय सहकार्य 7) संपूर्ण महाराष्ट्र राज्यात संस्थेच्या केल्या कमिट्या स्थापन
बैठकीला उपस्थित संस्थापक अध्यक्ष श्री कुंडलीक देशमाने. प्रदेश जेष्ठ उपाध्यक्ष श्री विजयकुमार शिंदे. प्रदेश महिला अध्यक्षा सौ अनिताताई गायकवाड. प्रदेश मुख्य सचिव श्री राहुल भिसे. प्रदेश उपाध्यक्ष श्री दिलीप चव्हाण. प्रदेश कार्याध्यक्ष श्री पंडित पिंगळे. प्रदेश प्रसिद्धी प्रमुख श्री सुधीर भिसे तेली गल्ली संपादक श्री मोहन देशमाने. पुणे जिल्हा अध्यक्ष श्री निलेशकुमार शिंदे. पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री सचिन देशमाने .नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री महेश चांदवडकर.