Sant Santaji Maharaj Jagnade
घरात बाजरीची भाकरी व खर्डा मी जेवलो तसा आज ही या सुखी कुटूंबाचा नेहमी अग्रह मोडता येत नाही. श्री. दत्तोबा यांनी ओळख पाळख नसताना एक समाज बांधव ही साथ दिली. आज ही ते दरवर्षी सुदूंबरे येथे येत असतात. त्या अफाट समाजात त्यांना संताजी भेटतात. तेली समाजाच्या संघटनेत सहभागी होतात. माझा समाजही जाणीव त्यांच्या अंतकरणात कायमची कोरली आहे. समाजातील सर्वात जर हे कोरीव काम झाले तर प्रगती लगेच होईल.
श्री. भागवत कचरूशेठ लुटे, मु. साकुरी, ता. रहाता, जि. अ. नगर, यांचा रविवार दि. 28/6/2016 रोजी वाढदिवस समारंभ संपन्न झाला. श्री. लुटे यांनी विविध पदांवर आजवर कार्य केले आहे. त्याचा अत्पसा परिचय.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 6)
तेली समाजाची देशपातळीवरील तैलिक साहु महासभा 1947 च्या दरम्यान स्थापन झाली. त्यावेळे पासुन सर्व जातींची यादी समाजा समोर होती. परंतु 2014 पर्यंत मोड (मोदी) तेली समाज नावाची पोटजात आहे हे माहित नव्हते. या समाजाशी तेली समाजाशी नाते काय ? हे तेथिल प्रसिद्धी लिखीत माध्यमात झाले आहे याची माहिती तेथील ओबीसी समाजाचे अध्यक्ष श्री. सोळुंकी यांनी दिली. यांनी सांगितलेली माहिती सत्य का असत्य हे शोधण्याची वेळ आता आली आहे. राजस्थान मधील एक राजा होता. त्याचया दरबारात ब्राह्मण समाजा एवढे बनिया समाजाला स्थान होते.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 5)
आज रजिस्टर केलेली तेली समाजाची संस्था या पुर्वी रजीस्टर केली होती. तिचे संघटनेने सभासद, अजिव सभासद बनविलले होते. असे अनेक बांधव स्पष्ट सांगतात. पुन्हा ही संस्था वेगळ्या नावाने रजिष्टर केली गेली. या प्रक्रियेत पहिल्या संस्थेच्या मंडळींनी निबंधाकडे हिशोब सादर केले नसतील त्यामुळे प्रश्न उभे राहिले असतील. हे ही मान्य करु परंतु संस्था नोंदणी करण्याची प्रक्रिया बरेच दिवस सुर होती. त्या बाबत काही मिटींगा ही झाल्या. परंतु संघटनेच्या पदाधिकार्या समोर त्याचे म्हणजे घटनेचे वाचन झाले का ? जर झाले असेल तर ते वादळ विनाकारण आहे. आणी फक्त काही विश्वासु मंडळींना दाखवुन नोंदी केली असेल तर वादळ योगयच म्हणावे लागेल. या ठिकाणी एक मुद्दा पुन्हा मांडतो भारताची राज्यघटना म्हणजे संविधान जर प्रत्येकाने घेऊन वाचन केले तर देश जगात एक नंबरचा होईल.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 4)
फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात एका बांधवांची भेट झाली आगदी त्यांनी दमबाज भाषेत सांगितले. बरे लिहा टिका लिहु नका. जर आसे घडलेच तर ते कुठे अडकवतील व कुठे संपवतील हे सांगता येणार नाही. दहशदवाद जो म्हणतो, दादागीरी जी म्हणतो ती हिच. तेली गल्ली मासिकाच्या सप्टेंबर 2013 च्या अंकात मी मांडले होते. (पवार व चव्हाण या नेत्याबाबत) असल्या दादागीरीचा पुरता तळपाट होतो. मराठा समाजाच्या दादागीरीचा शेवट काय झाला हे आपण पाहिलेत. मग समाज घडवायला निघलोत जाहिर सभेतगर्जना आपण करतो. तेली हा एक आहे हे पटवतो. काळानरुप वागा भेद गाडा म्हणातो पण प्रत्यक्ष काय ? कोयना नगर येथे जो तिळवणचे बोळवण करा सांगितले. पनवेल येथे कुत्र्याची उपमा दिली गेली. कल्याण येथे किडा मुंग्यांची उपमा दिली. ही व्यक्तव्य करणार्या पदाधीकारी बांधवांची भुमीका रास्त आहे ?